मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - जगदुन्याना परवास* *भाग - ३८

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - जगदुन्याना परवास*

*भाग - ३८*

           दुसरी जगदुन्यानी सफरना येले महाराज नेपल्सले थांबणात. ह्या सयरना अवतीभवतीन सृष्टीसौंदर्य गयरच उत्कृष्ट शे. तेन्हा समिंदरकिनाराना बाजुले धाकल्ल्या धाकल्ल्या बल्ल्या शेतीस, तेस्नावर च्यारीमेय फयझाडस्न्यारांगा, द्राक्षस्ना बगिचा, दूरदूर पसरेल शेत. बल्लास्नावर उच्चावर शोभिवान बंगला बठ्ठीकडे पसरेल शेत. समिंदर जव्हय शांत ह्रास तव्हय देखावान प्रतिबिंब पाणीमा भलतच सुंदर दिसस.'जस काय भूमध्य समिंदरले पडेल सपनच' आस कवी बायरनने एक कवितामा वर्णन करेल शे. रोम मजार राजवाडामा चितरंगस्ना मोठा, अप्रतिम नी सुंदर संग्रोह तेस्नी दखा. तेन्हामा मायकल एंजेलोनी जगप्रसिद्ध चितरंग शेत. 'सेंट पीटर्स' हायी जगदुन्या मजारल बठ्ठास्मा गयरमोठ चर्च नी पोपना' व्हॅचकिन'हाऊ राजवाडा दखा. व्हॅटिकन राजवाडामजारल्या दिवानखानास्नी संख्या पाच हजार शे. मजारला कलासंग्रोह बठ्ठ जगमा मोठा शे. रोममजारल 'कलाॅसस' हायी एक, गयरमोठ प्राचीन प्रेक्षकघर शे. तेन्हा मजार ८७ हजार लोकस्नी बसानी सोय करेल शे. ते इतल इशाल शे तरीबी तेन्ही रचना इतली सोयनी करेल व्हती की,गयरा मोठा समुदाय मजार जाईन तव्हय नी बाहेरयीन तव्हय तेस्ले आडचन येव्हाव नही. फ्लाॅरेन्समा तठला गॅलिलिओ ह्या प्रसिद्ध शास्त्रज्ञना तारास्ना नी ग्रहस्ना अभ्यास कराना करता तयार करेल मनोरा शे, तेल्हे वापरेल दुर्बीण तठे ठेल शे. महाराजस्ले तेस्ना परवास मजार करेल बारीकसारीक करेल गोष्टीस्न निरिक्षण बडोदा सयरनी सुंदर रचना कराना करता चांगला उपयोग झाया.

             मव्हरली सफर मजार लंडन, लॅकेशायर, मॅंचेस्टर, लिव्हरपुल, शेफिल्ड, नी आखो. औद्योगिक सयरस्मा जायीसन तठला मोठ्ठला उद्योगधंदास्नी माहिती गोया कयी. जर्मनीमजाररली 'नॅशनल म्युझियम' मजार परतेक शतकमजारली कलात्मक, औद्योगिक नी आरमारी वस्तु कालक्रमणा परमाने मांडीसन ठेल शेत. त्यामुये औद्योगिक उन्नतीना इतिहास शिकवणारी ती शायाच शे.नाॅर्वे मजारला 'मध्यरात्रीचा सुर्य' हाऊ निसर्गना चमत्कार दखा. नाॅर्वे उत्तर ध्रुव ना नजीक असामुये तठे दिवसमजार २० ते २२ तास सुर्यना प्रकाश मियु शकस. महाराजस्ले त्यायेले रातना अकराले क्षितीजवर सुय्रा दखाले मियना. नाॅर्वेमजार आभायले जायीसन भिडेल पहाडस्न्या दोन मोठ्ठल्या कपारीस्मायीन कोसना कोस पाणीन्याधारा संथपणे वाहत्या ह्रातीस  तेस्ले तठे 'फिओर्द' आस म्हणतस. सृष्टीन भलत शांत नी स्तब्ध स्वरूप आठे दखाले मियस. तेन्हा काचसारख भासणार नीय्यारंगन पाणीम्हायीन होडीस्मा फिरतस तव्हय पृथ्वीवरना बाकीना जीवसृष्टीन आस्तीत्वना भास व्हत नही. बर्जेन मजारला जलसंग्रहालयमा, निय्या, हिरव्या, पिव्व्या नी लाल रंगना सुंदर मासा महाराजस्नी दखात. तठींग जर्मनीमजाररली हॅबुर्ग, बर्लिन ह्या सयरस्ले भेटी दिन्ह्यात. जर्मनीमजार कलापेक्षा सुखसोयीस्ना कडे परवान करता जास्ती ध्यान ह्रास. तठली स्वच्छता नी टापटीप कवतीक करासारखी ह्रास. आसी खास नोंद महाराजस्नी करी ठेल शे.

            मव्हरे तेस्नी सफर स्काॅटलंडले गयी. तठला सुंदर सरोवरस्ना परदेस, डोंगरस्न्या रांगास्मायीन घुसेल खाड्या दखावर युरोप नी आशिया ह्या दोन खंडस्नी संयोगभुमी काॅन्स्टॅटिनोपल आठे येल शे. संयोगभुमीना दोन्ही बाजुस्ले समिंदर पसरेल शेत. तुर्कस्थानना सुलतानना दोन बहुमोल सिंव्वासन तठे व्हतात. तेन्हामजारल एक ले सोनाना मुलामा दिसन असंख्य माणिक रतन जडायेल शेत. दुसर सिंव्वासन चंदन शे, तेल्हेबी हिरामोतीस्मा बसाडेल शे तेन्हा मेघडंबरीले एक सोनानी साखय टांगती ठेल शे, तिल्हे तीन इंचन बुंगर पाडीसन पाचू बसाडेल शे. परतीना परवास मजार महाराजस्नी इजिप्तले भेट दिन्ही. कैरो मजारल प्राचीन पिरॅमिड्स आणि स्फिंक्स दखात. 'ममीज' न मर्म समजी लिन्ह.

         मव्हरे महाराजस्ले युरोपना परवास्नी गोडी लागी गयी. नी महाराजस्ले गरज बी वाटाले लागनी बडोदानी उष्णहवा नी मानसिक ताण येन्हामुये महाराजस्नी झोपमोड, नी संधीवातना तेस्ले तरास चालु व्हयेल व्हता. तेन्हामुये हवाबदल कराना करता महाराज युरोपले ग्यात. तेस्ले बडोदाना राज्याबाहेर जास्त काय जावान पसंत नही व्हत. पण ते अगतिक व्हत, आस त्या व्हाईसरॉय डफरीस्ले पत्रामजार म्हणतस, "परवानले सोडीसन दुर राव्हानी मन्ही नापसंती शे, पण ह्या विश्रांतीमुये माल्हे आराम भेटना ते मी मन्ही गैरहजेरीनी उणीव दोनपट जोशमजार नी मेहनत करीसन भरी टाकस."

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

रविवार, ४ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - जगदुन्याना परवास* *भाग-३७*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - जगदुन्याना परवास*

*भाग-३७*

          श्रीमंत सयाजीराव महाराज येस्नी गयरा सावा युरोप, आमेरीकाना परवास कया. देशदेशस्ना जीवन, कला, वाडयम, संस्कृती, नगररचना नी उद्योगधंदा येस्ना कायजीकरीसन आभ्यास कया. सोतान जीवन समृद्ध कराकरता आणि आप्ला राज्याना च्यारीमेय इकास कराकरता करेलपरवास ना तेस्नी नामी उपयोग करी लिन्हा.

            आप्ला कारकिरदना पयला सात आठ वरीस रातदिन नथकता श्रम करीसन राज्यकारभारले महाराजस्नी वयन लाव. काही महत्वान्या सुधारणा कयात. राज्यानी इसकचेल घडी नेम्मन बसाडी.त्या श्रमना नी पारिवारिक दुःखना वाईट परिणाम तेस्नी तब्बेतवर व्हयना म्हणीसन तब्बेतनी कायजीकरता डाॅक्टर मूर येस्ना सल्लामुये हवाबदला करता युरोप मजार जावान महाराजस्नी ठरायी लिन्ह. त्याकायन्या धरमनीसमजुत प्रमाणे युरोपले जाण म्हणजे अपवथीर नी पाप समजेत. सामान्य लोकस्ले समिंदर परवासनी भिती वाटे तसच ब्रिटिश सरकार महाराजस्ले बंदी करतीन, महाराज आणि तेस्ना संगे जायेल लोक आते बडोदाले येवाव नहीत. हायी कल्पना करीसन बरीच परवान दुःखी आंतरकरन मजार डोयामा आसू आणीसन स्टेशन वर निरोप देवाले उन्हात. पहिला परवासना बाबत महाराज लिखतस, "मना युरोप परवास ना प्रश्न पयदा झाया त्यायेले माल्हे काही जास्ती माहिती नही व्हती, नी मन्हा लोक ते मन्हा पेक्षा अज्ञानी व्हतात. आम्ही आम्हना संगे पंचावन्न मंडयी लेल व्हती. तेस्नामा मानकरी, ए. डी. सी., पुरोहित, शागीर्द, शिपा, न्हायी, पानक, कपडास्नी देखरेख करा साठे व्हॅले, तसच पुरोहितस्ना समाधान करता गायी संगे लेल व्हत्यात. संगे लोकस्ना आवडना पदार्थ लोणच, पापड, हिंग, जिरे ह्या युरोप मजार मियतस नही म्हनीसन संगे त्याबी संगे लिन्हात. दुर्दैवआस की, पुरोहितस्ले विलायतना आचार इचार, बाईस्ना मोक्या पणा, खाणपान, इतल आवडन की, तेन्हामुये आम्ले तेस्ना उपद्रव झाया. "

             २९ मे १८८७ ना दिन मुंबईथाइन *बुरखा*. बोटवर युरोप ना परवासले महाराज निंघनात. संगे महाराणी व्हत्यात. या सफर मजार महाराजस्ना संगे उखाजीकाका, दादासाहेब माने, कृष्णाराव जाधव आखो नजीकना लोक धामणकर, समर्थ नी मोठा आधिकारी, शमशुद्दीन सुलेमानी ह्या वैद्यकीय अधिकारी म्हनीसन संगे व्हतात. बोटवर बाईस्ना करता पडदानी स्वतंत्र येवस्था करेल व्हती. स्वारीना बठ्ठा खर्च गायकवाड सरकारनी कया. या पयली सफर ना खर्च चाळीस लाख रुप्या झाया म्हणजे आज हिसाबमा पंधरा इस कोटी रुप्या. महाराजस्नी ह्या परवासमा अति आधुनिक सुएझ कॅनाॅल, ऐतिहासिक व्हेनिस सयर, तठला कालवाना रस्ता, त्या रस्ताले दोन्ही बाजुले उच्च्या उच्च्या शिखररस्ना सुंदर मंदिर नी मोठ्ठला घुमटना भव्य राजवाडा, तठल श्रीमंती नी मोहकपना दखा. जिनेव्हा नी फ्रान्समजारला साहित्यिक, राजकारणी, मुत्सद्दी येस्ना स्मारक, पुतळा, नामचीन वस्तुसंग्रहालय, चित्रसंग्रालय, दख. युरोपन प्रसिद्ध 'सेंटमाॅरिटझ' सारख रम्य ठिकाण, प्रशांत सरोवरे, पॅरिसमजारला नेपोलियनन्या विजयीकमानी, झाडस्ना भरेल राजरस्ता मोठ्ठला चौक, उच्चा उच्चा आयफेल टाॅवर, आखो दखासारका स्थळ दखात. सौंदर्यवादी कलादृष्टी महाराजस्ले निसर्गमजारत प्राप्त व्हयेल व्हती. ती सवसकार मजार वाढेल व्हती. प्रेक्षणीय स्थळ दखतांना कला नी उपयुक्तता ह्या नजरमा अवलोकन करणारा गयरा कमी प्रेक्षक ह्रातस. महाराजस्नी नजर उपयुक्त असामुये कोणतीबी सुंदर वस्तू नही ते संस्था दखी की, तिन्ही प्रकीकृती आप्ला राज्याना परवान करता पयदा करा देत. सत्ता नी संपत्ती व्हती म्हनीसन तेस्ले ते शक्य व्हत. लंडनमजापल हाईड पार्क, पार्लमेंटनी हायली, वस्तुसंग्रहालय, काचना क्रिस्टल पॅलेस, आगबोचीस्ना कारखाना, नी आरमारनी तटबंदी दखी. ऑक्सफर्ड नी केंब्रिज इद्यापीठ, हॅरो नी ईटन मजारली गुरुकुलसारख्या इद्यापीठस्ले भेटी दिन्ह्यात.

         महाराणी व्हिक्टोरिया येस्नी भेट करता महाराज चिमनाबाईस्ले संगे लिसन विंडसरले ग्यात. महाराजस्नी गाडी विंडसप स्टेशनवर उन्ही तव्हय हिंदुस्थानना परदा पध्दतले मान देवा करता येल आधिकारी बी हाजीर व्हतात. महाराजस्ले स्टेशन फाईन विंडसर पॅलेसलगुन व्हिक्टोरिया महाराणीना च्यार घोडास्नी बग्गीमजार बसाडीसन सोड. हाऊ सन्मान युरोप मजार गयरा कमी लोकस्ले मिये. युरोप मजारला राजाबी महाराजस्ना हेवा करेत. महाराजस्ना स्वागत कराकरता सोता व्हिक्टोरिया राणी राजवाडाना प्रवेशदारलगुन उन्ह्यात. महाराजस्नी हिंदु रिवाजना नुसार महाराणीना पायस्ले स्पर्श करीसन नमस्कार कया. नी भेट म्हनीसन काठेवाडी पध्दतनी चांदी नी गाडी दिन्ही. हाऊ परसंगले महाराणी व्हिक्टोरिया गयय्रा भारायी ग्यात. महाराजस्ले च्यार पाच दिन विंडसर पॅलेस मजार पाहुनच्यार करता थांबाडी लिन्ह. मंग औद्योगिक सयरस्ले भेटी दिसन महाराज परत व्हयनात. बडोदानी परवान नी महाराज सुखीसमाने वापस उन्हात म्हनीसन तेस्ना गयरा मोठा सत्कार कया.

             च्यार सहा महिना युरोप मजार राव्हामुये तेस्ले आराम लागना. तेस्नी आभ्यासुदानत, तेस्न मार्मिक आणि बारिकसारिक अवलोकन, निसर्गसौंदर्यनी चव लेवानी रसिकता ह्या गुण वाखाणण्यासारखा व्हतात. त्यामुये युरोपमजारल्या नया सुधारणा आप्ला राज्यामजार तेस्ना कसा उपयोग करी लेता यीन येन्ह महाराजस्ले चिंतन लागन.

             परवास मजार मन्हा देश, मन्ह राज्य, नी मन्ही परवान, हाऊज इचार तेस्ना मनमा घोयेत ह्राहे. युरोप मजारला प्रेक्षणीय स्थळस्न मंथन करेत तव्हय तठला समाज, कला, वाडयम,न्याय्रा न्याय्रा संस्था, मोठ्ठला प्रार्थना मंदिर, मोठ्ठला राजवाडा, नया शास्त्रीय शोध, नी तेस्ना प्रसार ह्या बठ्ठ्या गोष्टीसवर तेस्नी बारीक नजर व्हती. आस तेस्नी लिखेल प्रवासवर्णनम्हायीन दिशी येस.

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा* *भाग-३६

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा*

*भाग-३६*

      समद्यापरकारन्या सामाजिक सुधारणा लोकस्ना मनमजार रुजाले पाहिजेत म्हनीसन लोकसिक्सननी गयरी गरज ह्रास. तेन्हा करता महाराजस्नी आप्ला राज्यामा सिक्सनपरसार नी वाचनालयस्ना गयरा पसारा वाढावा. ज्या समाजसुधारणा स्वतंत्र भारत मजार आजुनबी नही झायात, त्या समाजसुधारणा महाराजस्नी १०० वरीस पयले आप्ला राज्या मजार करेल व्हत्यात. त्या यशस्वीपणे राबाड्यात. जगदुन्यामा आसा सामाजिक क्रांती घडायी आणणारा पहिला राजा म्हणजे श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्या शेत. सामाजिक क्रांती हायी राजकीय क्रांती सारखी लगेच घडायी आणता येत नही. समाजना तो प्रगतीना परवास ह्रास. स्वातंत्र्योत्तर कायमजार सामाजिक नी राजकीय चयवय मजार मराठी नेतास्नी जर सजाजीरावस्ले प्रेरणास्थान मानतात ते आज महाराष्ट्राना इतिहास सामाजिक, राजकीय बाबत मजार कवतीक करा सारखा ह्राता. हायी निश्चित.

             ह्या उदारमतवादी खान्देशी राजाने आप्ला राज्यामजारला गुजराथी जनताले आप्ल करीसन तेस्ना मजार स्वामिनिष्ठा पयदा करी. तेन्हा बद्दल इतिहासाचार्य राजवाडे महाराजस्न कवतीक करतांना बोलणात, "गुजराथी लोक जिकेल नी मराठी लोक जिकणारा हाऊ भेदभाव मांगला दिडशे वरीस बडोदा मजार जास्ती करीसन भासे. पण हाऊ भेद समदा नायनाट कराकडे महाराजस्नी उत्कट प्रवृत्ती शे. राज्यकारभारना न्यारा न्यारा खातामजार गुजराथीस्नी संख्या वाढतच जायेल शे. इतलज नही, ते लायकीना गुजराथी जर मियना ते तेल्हे मुख्यखाताना मुख्याधिकारी नही ते, परसंगले दिवाणबी व्हयेल शे. हाऊ चमत्कार महाराजस्नी बडोदा मजार घडायी आणा. संस्थानमजारली जनता गुजराथी जरी असनी तरी महाराज साहेब आप्ली जनता नी आपीन एकच शेत ह्या पिरीमभावनामा आणि जिव्हाळा मजारच वागतस. काही काय नंतर ह्या सुधारणास्ना गयरा फायदा व्हयीन. तो आसा की, गुजराथीस्नी व्यापारीवृत्ती मराठीस्मा यीन, नी मराठीस्नी झुंजारवृत्ती गुजराथीस्मा यीन. सारांश, सुयत्रंना, सुव्यवस्था, समदृष्टी, नी न्यायप्रियता ह्या गुण सयाजीराव महाराजस्मा दिसतस., "

             जातपातना इरुध्द महाराजस्ना इचार कितला प्रगल्भ व्हतात नी आचार कसा निरमय व्हतात हायी श्रीपाद जोशी येस्नी 'तरुण भारत' मजार प्रकरणे मांडेल शेत. त्या म्हणतस," चातुर्वर्णास्मा उतरंडीमा बामणस्ले जे बठ्ठास्मा उच्च स्थान देल शे,ते गयरच तकलादू नी पोकय, फसव ह्राहीसनबी बामण समाज त्या बेगडी मोठपणवर खुष हुयीसन ह्राहेल शे आणि इमाने - इतबारे बाकीना समाजस्नी सेवा करत ह्रायन्हा. या वस्तुस्थितीनी कल्पना बडोदाना राजा सयाजीराव महाजस्ले असीन. म्हणीसन तेस्नी कोणतीबी जातना इरुध्द तक्रार न करता बठ्ठा समाजना उत्थाननाकरता बठ्ठ्या जातीजमातीस्नी मदत लिन्ही. तेस्ना त्याग, सेवाभावना, सामाजिक बांधिलकी ह्या बठ्ठ्याज गोष्टी इतल्या अदभुत नी आदरणीय व्हत्यात की, तेस्ना कडे बठ्ठास्नी तयमयमा दख. आमुक एक जातना, भाषाना त्या पुढारी शेत, आस तेस्ना गुजराथी जनताले कव्हयज वाटन नही. पण तेस्ना मनना तो मोठेपणा, तेस्नी दृष्टीनी विशालता आम्ले पेलावनी नही, आणि त्या दुर्लक्षित नी आनुल्लेखित ह्रायन्हात. "

पिडित, दलित आणि उपेक्षितस्नी मुक्तीनी नी प्रगतीनी महाराजस्नी तयमय फक्त संत ज्ञानदेवयेस्ना सब्दस्माज सांगता यीन.

  दुरितांचे तिमीर जावो विश्वस्वधर्म सुर्य पाहो/

जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात//


*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा* *भाग.. ३५*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा*

*भाग.. ३५*

         अमरेली आठे सत्कार समारंभ मजार बोलतांना वाईट चालीरिती आपीन झटकी देवाले जोयजेत आस महाराजस्नी आवरजीसन सांग. तव्हय त्या बोलणात, "आप्ला धर्मग्रंथस मजार जर काही चुकीन्या गोष्टी दिसण्यात त्या गोष्टी काढानी आपीन हिंमत दाखाडाले जोयजे. बराज दिनफाईन चालत येल रितीरिवाजस्मा काही हानीकारक गोष्टी व्हतीन त्या सोडाले जोयजेत. सदविवेक बुध्दीना इचार करीसन काही चांगल्या गोष्टी पदरमजार पाडाले जोयजेत. पण नुसता देखावा म्हनीसन काही गोष्टी चुकीन्या येत असतीन त्या टायाले जोयजेत. आस जर तर तरच आपीन ह्या शर्यतना जमाना मजार तग धरसुत. बाईस्ले सिक्सन देव्हानी गरज शे. पण पाश्चात्य देशस्माजसा बाया माणस्ना स्वातंत्र्यना नाववर आतिरेक व्हस तो आप्ला नही व्हवाले जोयजे. तेन्ही आपीन कायजी लेवानी गरज शे. बाईस्ले माणस्ना इतलज स्वातंत्र्य मियाले जोयजे, तेन्हा करता आपीन प्रयत्न कराले जोयजे. बाईस्ना आंगे जे सामर्थ्य शे ते आप्ल कोणज ध्यानमा येत नही. माणस्नी आपला जोये जी शक्ती शे ती बाईस्ना सुख मजार भर टाकाकरता खर्च कराले जोयजे. त्यामुये त्या वर्गाले समानता प्राप्त व्हयीन आशी मन्ही समज शे.

               "व्यक्ती आणि समाज येस्ना येरमेरशी घट्ट संबंध शेत, नी त्या येरायेरवर आवलंबी शेत. व्यक्कीना इकास म्हायीन समाजना इकास घडायी आणता यीन. पण हाऊ इकास कायदा करीसन नही व्हवाव. तेन्हा करता लोकस्ना मन वयाळान, तेस्ले एखादी गोट पटायी देवान आणि तेस्नी बठ्ठी समाजशक्तीनी पातयी उंचावन हाऊज खरा रस्ता शे. जेस्ले समानता जोयजे तेस्नी सोता समानता आचरण मजार आणाले जोयजे. नुस्त्या तोंडन्या वाफा वाया घाला पेक्षा येवाया वायबार घाला पेक्षा आशी सुधारणा घडायी आणाकरता प्रत्यक्ष कृती करेल माल्हे आवडस. "

        बडोदा मजार सयाजीविहार क्लब उघाडा. तेन्हा उद्घाटनना येल्हे धाकल्ला संस्थानस्ना समाजजीवन मजार कस महत्व ह्रास हायी सांगतांना महाराज बोलणात," आश्या सामाजिक संस्थास्ना मुख्य उपयोग समाजमा प्रेमय विचारविनिमय नी परस्पर स्नेहसंबंध पयदा व्हावा हाऊ शे, तठला सभासद या क्लब मजार यीन तव्हय आप्ला वायबार मनोविकार ठिसन नी तठींग बाहेर जायीन तव्हय मजारल प्रेमय इचार लीसन जातीन आशी आस शे."

             महाराज सोता आप्ली गुजराथी जनतामा गयरा प्रिय व्हतात. कारण तेस्नी गुजराथी, मराठा, बामण आसा कोणताबा भेदभाव तेस्ना धोरनस्मा येवु दिन्हा नहीत. सेवाभाव, सामाजिक बांधिलकी ह्या गोष्टी इतल्या आदरणीय व्हत्यात की, तेन्हामुये महाराजस्नाकडे बठ्ठास्नी आत्मियता मजारच दख सुवर्ण महोत्सवस्ना समारंभ मजार न्यारा न्यारा जातना लोकस्नीज इचार व्यक्त करात. पारशी समाजना मानपान पत्रा मजार लिखेल व्हत..

   "महाराज, आपण आमच्या लहानशा जातीचे रक्षक आहा."

अंजुमन - इस्लामना मानपान ना पत्रा मजार म्हणेल व्हत...

"जो हक थे रयते सुन्निके, कुछ तो दिये है, कुछ दवोगे /

सबपर है निगा महाराजाकी सुभान अल्लाह, सुभान अल्लाह //"

                 आसा सब्देस्मा आप्ले महाराजस्नी समानता मजार वागामुये महाराजस्ना आभार मानात. उत्तर देतांना भाषणमजार महाराज बोलणात, "आप्ला मजार दिसणारा धर्मना मी जातना कितला बी फरक ह्रायन्हा तरी आप्ली संकुचित जातनी नजर टाकी देव्हानी गरज शे. आप्ल्या गंजलागेल चालीरितीस्ना त्याग करीसन आप्लामदारला उपयुक्त रिवादस्ना जतन कराले जोयजे. परकी संस्कृतीमदारला चांगला भागस्ना आपीन जरूर आनुकरन करा. आस कर ते आप्ल कल्याण नी आप्ली प्रगती नक्की व्हयीन. "

              सयाजीरावस्ले ज्या वातावरण मजार आणि ज्या काय मजार सामाजिक सुधारणा करण्या व्हत्यात तेन्ह एक गंमतन उदाहरण - बडोदाले पयला सावा आगीनगाडी सुरु झायी तवयस्नी गोट शे. बडोदा मजारला, नी आजुबाजुना खेजास्ना बामण लोक नवलकरत आगीनगाडी दखाले येल व्हतात हायी गोट सनातनी बामनस्ले सहीन झाय नही. त्या ज्या यवनस्नी आगीनगाडी दखाले जायेल बामण व्हतात तेस्ले जात बाहेर काढी दिन्ह. ह्या उदाहरणवरथाईन महाराजस्न सामाजिक सुधारणास्न कार्य कीतल कठीण व्हत येन्ही कल्पना येस.

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा* *भाग.. ३४

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा*

*भाग.. ३४*

     सोवळापणाना बाबत मजार महाराज आप्ला एक जुना आनुभव तेस्नी एक व्याख्यानमाला मजार सांगा.त्या बोलणात, "मी पयले चांगला लोकस्ले जेवण ले बलाऊ लागनु, त्यायेले मन्हा सामने गयय्रा आडचणी येव्हाले उन्ह्यात. त्याकायले आप्ला लोकस्ना मन मजार गयय्रा खोल समजुती व्हत्यात. आप्ला जातना लोकस्ना संगेबी त्या जेवाले बसेत नही, तयारबी व्हयेत नही. नी बाकीना सामाजिक येवहार ठेवाले बी त्या खालनी पातयी समजेत. ज्या शामियाना मजार जेवणनी येवस्था करेल ह्राहे तेन्हा कपडाना परदा, जेवणन्या खुर्चीस्ना खाले टाकेल सतरंज्या नी टेबलवरना कपडा ह्या गोष्टीस्ले त्या इटाय मानेत. आसा परसंगले जेवणन पक्वान्न आणि वाढन येस्ना बाबत पाहुणास्नी मी समजूतले मान देव्हान काम तेन्ही तजवीज माल्हे करनी पडे. तरी बी मी देल निवतालेबी काही लोकस्ले जातन बंधन मोडाना प्रयत्न नी शक येत ह्राहे. पण ह्या कामले मी चिकाटी धरीसन ठी. मन्ह निवत लेवानं मी कोणलेज जबरदस्ती करी नही. नी मन्हा निवताले नकार दिन्हा तरी मी तुम्हणावर नाराज नही आसा सब्द देवु. लोकस्ना मत जरी माल्हे आवडना नहीत, तरी मी तेस्ना मानपान नी कायजी लेत ह्रावु. आशी जव्हय पंगती व्हयेत तव्हय मी न्यारा न्यारा जातीस्ना न्यारा सयपाक, न्यारी पंगत, न्यारा वाढपी, तेस्ना पान न्यारा मांडानी मी येवस्था करु. जेस्नी इच्छा ह्राहे तेस्ना पाटला खालनी सतरंजी काढी टाकुत. हायी चिकाटी मुये मव्हरे माल्हे यस उन्ह. लोकस्न्या चालीयेल समजुतीस्ना इरुध्द तेस्ले जबरदस्तीन वर्तन कराले भाग पाडन ह्या पध्दतवर मन्हा आजिबात भरोसा नही व्हता. हायी ध्यानमा ठेवा. आतेलगुन मी सक्कीना पेक्षा मन वयावयावानी पद्धतच सदानकदा वापरी. माल्हे वाटस सक्तीना वापर अचीतटीलेच वापराले पाहिजे. बाकीना येल्हे मनपरीवर्तननाज रस्ता परिणामकारक ह्रास. खास करिसन बाकीना आधिकारीस्नी हायी गोट ध्यानमा ठेवानी गरज शे, ".

          बडोदा मजार संस्कृत पाठशायना बक्षीस समारंभना पुजाइधीना कारेकम मजार त्या बोलणात," पुजारी लोकस्नी बदलतली परिस्थिती दकीसन आप्ल धोरण बी बदली कराले जोयजे. तेन्हा करता तेस्ले आप्ला कर्तव्यान ग्यान जोयजे. जठे ज्या विधीनी गरज नही त्या अनाठायी इधीस्ले फाटा देव्हानी गरज शे, ते तेस्नी कराले जोयजे. तसज लगीन वयनी मर्यादा, लगीन सोबन ना खर्च, जातपोट जातीस्ना लग्न, परदेस वारी, श्रध्दानी संस्कार, दान नी पध्दत, आखो बाकीन्या गोष्टीस्ना पुजारीस्नी सुक्ष्म इचार करीसन नयी परिस्थितीले धरीसन लोकस्ले आदर्श वाटतीन आश्या पुजाइधी ठेवाले जोयजे, ".

                   बडोदा मजार मराठा सिक्सनपरिषदनी बैठक भरायेल व्हती. सरदार शंभुसिंहराजे मालेगावकर ह्या अध्यक्ष व्हतात. त्यायेले समाजसुधारणांस्नी उपयुक्तता नी आवश्यकता येन्हा बाबत महाराज मार्गदर्शन करतांना बोलणात," छत्रपती शिवाजी महाराज येस्ना इतिहास वरथाईन गयरा बोध लेव्हा सारख शे. प्राचीन नी आर्वाचीन गोष्टीस्ना इचार करीसन इतिहास ना आर्थ ध्यानमा ठेवाले जोयजे. युरोप मजार मार्टिन ल्युथरना येल्हे धर्म सुधारणा झायी. त्याच येल्हे आप्ला कडे संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास नी आखो गयरा महापुरुषस्नी सामाजिक सुधारणा कयात. तेस्ना इतिहास दखा. छत्रपती शिवाजी महाराजस्न नी त्याकायना साधुपुरुषस्ना इचार संकुचित नही व्हतात. तेस्नी बठ्ठा लोकस्नी उन्नती करता काम कय. तसाच तुम्ही बी बठ्ठा देशवासियांनस्ना करता प्रयत्न कराले पाहिजेत., "

                 न्या. रानडे, डाॅ भांडारकर नी सार्वजनिक काका येस्नी महाराजस्ले पुणाले'फिमेल हायस्कुलना' वार्षिकउत्सवले अध्यक्ष म्हणीसन बलायेल व्हत. त्यायेले तठली सामाजिक तणावले ध्यानमा ठिसन महाराज बोलणात," बामण, नी मराठा येस्नामा सध्या जी तेढ तयार व्हयेल शे, ती बठ्ठा समाजस्ले गयरी हानीकारक शे. समाजस्ले प्रगतीना रस्तावर लयी जावा करता बठ्ठ्या जास्तीस मजार एकी ह्राव्हाले जोयजे. आणि सुज्ञ लोकस्नी त्या दृष्टीकोन म्हायीन मनापासून प्रयत्न कराले जोयजे.,". 

       त्याच मुक्काम मजार मराठा पुढारीसनी महाराजस्ले पानसुपारी दिन्ही. त्या येले वरला बठ्ठा पुढारी हाजार व्हतात. तेस्नी महाराजस्ना नेतृत्वामजार मराठा नी बामन कार्यकरतास्नी दिलजमाई घडायी आनी. त्यायेले महाराज फक्त बावीस वरीस्ना व्हतात. 

            लंडन युनिव्हर्सिटीना मुख्य दिवाणखाना मजार न्यारा न्यारा देशस्ना राजा, इद्वान नी मुत्सद्दी येस्नी जगदुन्यानी शांती करता जागतिक शांतता परिषदन पयल आधिवेसन भरायेल व्हत. त्या समारंभन अध्यक्षस्थान महाराजस्ले देल व्हत. अध्यक्षीय भाषण मजार सामाजिक समतान व्यापक स्वरूप म्हणजे इस्वबंधुत्व हायी तत्व समजाडीसन सांगतांना महाराज बोलणात, "जगमजारला मानवस्ना सामाजिक प्रश्न काही नया नहीत. पण म्हनीसन त्या सोडाले बी सोप्या शेत आस बी नही. तरी बी माल्हे आशी आस शे की, सध्या जागेव्हयेल सद्सद्विवेकबुद्दीनी मदत लीसन बठ्ठास्ना बद्दल पिरीम, सहकार्यांनी भावना पयदा हुयीसन मुख्य प्रश्न सोडाकरता मदत व्हयीन. जदलगुन बठ्ठा मनुष्यजातीना बाबत एकत्वानी नी समतानी भावना आप्ला मजार येणार नही, तदलगुन दुरावा नष्ट व्हनार नही. येन्हा करता जर आप्ला मजारला फरक येरमेरशी न झगडता आपीन समजु शकू नी सहानुभूतीनी एकमत करीसन सहकार्य करसुत तव्हयज ह्या प्रश्न सुटतीन, ". 

*क्रमशः*

          (हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा* *भाग.. ३३

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा*

*भाग.. ३३*

आंधश्रध्दा नी भोयापणामुये लाखो रुप्या ना जो चुराया खिचडी (तांदुय, दाय) ना व्हये, नी दानधर्म करता वाटाये तो महाराजस्नी बंद कया आणि आयसी, भुकटखाऊ लोकस्नी मिजास बंद कयी. सरदार लोकस्ना खास हक्क काढीसन कायदाना सामने बठ्ठा सारखा शेत, हायी तत्व आम्मल मजार आनीसन खरा आर्थ ना सामाजिक न्याय प्रस्थापित कया. धाकल्ला पोरस्ले कारखाना मजार कामले लावान, नी तेस्ले बिडी, तंबाखू इकाले लाव्हन येन्हावर बंदी कयी, नी तसा कायदा कया. तो गुन्हा शे आस बी ठराव. बडोदा संस्थान मजार आफु पेण हाऊ गुन्हा शे आस ठरायीसन गुन्हेगारले सजा व्हवाले लागणी. आफु नी लागवड बी धीरे धीरे बंद करी टाकी.

या काय मजारली आजुन एक सुधारणा म्हणजे 'येडास्ना आश्रम' चालु कया. येन्हा पयले येडास्नाकरता न्यारी आसी सोयज नही व्हती, तेस्ले साधा तुरंगस्मजार कोंडी देत. पण हायी निरदयपन नी पध्दत बंद करीसन १८९६-९७ सालले आसा लोकस्ना करता आरधा लाख रुप्या मोडीसन एक हायली न बांधकाम कये. नी येडास्ना डाॅक्टरस्ना देखरेख मजार तो आश्रम तेस्ना ताबा मजार दिन्हा.

      . मुंबईल् 'हिंदु क्लबन' आधिवेशन भरेल व्हत. त्या वखतले महाराजस्ना सत्कार कया व्हता. त्यायेले स्त्री शिक्षणाबद्दलना आप्ला दृष्टीकोन सांगतांना महाराज बोलणात, ", मी आते आतेज जपान, अमेरिका, युरोप नी आखो बराज ठिकाणवर जायेल व्हतु. त्यामुये न्याय्रा न्याय्रा चालीस्नी वयख कराले माल्हे मियनी. बाकीना लोकस्न्या चालीरीतीस्नी वयख करीसन आपीन आप्ली सुधारणा कराले जोयजे. बाईस्ले सिक्सन देव्हाले पाहिजे येन्हा बाबत आते कोठेबी मतभेद दिसणार नहीत. पण ते सिक्सन म्हणजे नुस्ती परिक्षा दिसन पास व्हनआस नही व्हस. बाईस्ले सवसार करान बी सिक्सन देव्हानी गरज शे. आप्ला कारभारीस्ले तिस्नी येसन पासुन दुर कस ठेवता यीन हायी बी तिस्ले शिकाडानी गरज शे. जर घर मजार बाई शिकेल सवरेल ह्रायन्ही ते ती ग्यानना नी घरसुखसमाधानना उज्ज्वल प्रकाश घर मजार पाडाले समर्थ ह्रास. नी आप्ला आजुबाजुना लोकस्ना निर्दय नी आपमतलबी कपट युक्त्यासफाईन जशी फसस तशी फसणार नही. "

                        युवराज फत्तेसिंहराव येस्ना लगीन सोबन ना निमित्तथाईन युरोपना लोकस्ले पंगत दिन्ही. तव्हस्ना परसंगले बाईस्ले समभावमजार वागाले जोयजे आसी तयमय महाराज येस्नी व्यक्त कयी. त्या बोलणात," आम्हणा हिंदु समाज मजार कितल्या तरी जुन्या रुढीस्ना योग मुये बाया आसा समारंभ मजार मिसयतीस नही, हायी गयरी खद करानी गोट शे. तरीबी बाहेरनी पाश्चिमात्य सिक्सन नी इचार येस्नी प्रगती इकडे जल्दी व्हयी ह्रायन्ही. हायी गयरी आनंद नी गोट शे. बाईस्ले बी माणस्ना इतलच स्वातंत्र मियाले पाहिजे तेन्हा करता आपीन खटाटोप कराले जोयजे. बाया माणस कव्हय ना कव्हय माल्हे एकंदर बशेल भेटतीन आसी माल्हे आशा शे. बाया आप्ला संगे शेत, नी त्या आप्ला परतेक सुकदुक मजार सामिल व्हतीन येन्ही माल्हे आस शे, त्या हरएक काम मजार आप्ला संगे समर्थ शेत हायी आस मी संगे लीसन फिरस. बाईस्ना ज्या कलागुण शेत त्या आप्ला हिंदु समाजमुये उजाया मजार येतीस नही. माणस्नी आप्ला जोये जी ताकद शे ती आपल्या बाईस्ना सुकदुक करता खर्च कराले जोयजे. बाया, माणस हाऊ वर्ग सारखाच समसमान शे आसी मन्ही पक्की समज शे. आम्हना धाकला महाराज आप्ली कारभारीना संगे मायाळुपणी वागणुक करतीन नी तिस्ले उच्च दर्जा न सिक्सन देथीन आसी माल्हे आस शे. महाराजस्ना ह्या पुरोगामी इचार त्या १०० वरीस पयले समारंभ मजार हाजीर व्हयेल बामण, मराठा मंडईस्ले जीरना नसतीन, पण कायना ओघ मजार धीरे धीरे तेस्ना पचनी पडेल ध्यान मजार यीन.

             काही समाजस्मा गोषानी गयरी वाईट चाल व्हती. त्यामुये बाईस्न गयर नुकसान व्हयेल शे. गोषा. पध्दत बंद कराना करता सोताना परिवारन्या बाईसपासुन महाराज स्नी सुरवात कयी. महाराणी चिमनाबाई येस्नी धीरे धीरे गोषा पध्दत बंद कयी. त्यामुये महाराजास्वर चांगल्या बी नी वाईट बी टीका झायात. पण टीकास्ले उत्तर देवानी हिंमत तेस्ना मजार व्हती. आप्ले नाव ठेवाबिगर समाज मजार ह्राहता. येत नही, ते गयर कठीण शे. मातर नामी टीका आपीन समजी लेवाले जोयजे. तशी दखल लेव्हाणी गरज शे.

          एक समारंभ मजार महाराज बोलणात, "कोणताबी समाजनी राजकीय प्रगती हायी तेन्हा सामाजिक नी धार्मिक आचरणवर आवलंबी ह्रास. ज्या समाज मजार आपसम्हा द्वेष, झगडा चालु शेत तेस्नी प्रगती ना इचार करालेज. नको. जनता मजार येकी नी ग्यान येस्नी जर वाढ झायी ते तेस्ना मांगेमांगे सुराज्य खात्रीमजार यीन आप्ल बठ्ठास्न महान श्रेय हायी शे की हिंदुस्थान मजार एकराष्ट्रीयत्व पयदा करण हायी शे. हायी करतांना बठ्ठास्न्या भावना सारख्या जोयजेत. नी तश्या त्या व्हवा करता तेस्ना मजार सामाजिक येवहार सुरू व्हवाले पाहिजे. "

        सरदार लोकस्ना खास हक्क काढीसन तेस्ले कायदा मजार आनीसन बठ्ठा कायदा ना सामने समान शेत हायी तत्त्व आम्मल मजार लयनात. धाकल्ला पोरस्ले कारखाना, नी हाटेल मजार कामले बंदी कयी.

           हिंदू समाजनागत जैन लोकस्ना मजार बी गैरसमजुती व्हत्यात, कमी वय मजार पोर पोरीस्ले जबरी करीसन दिक्षा देत तेन्हा मुये मव्हरल आयुष्य त्या मरेल सारख कठेत. म्हणीसन पयले महाराजस्नी जैन धर्म मजार धाकल्ला पोरी पोरस्ले दिक्षा देतस तेन्ह काय धर्मशास्त्र मजार आधार शे का, हायी तपासा करता समिती बनायी. शास्त्र मजार आसा काहीज आधार नही, आसा जव्हय महाराजस्नी खात्री व्हयनी तव्हय तेस्नी कायदा कया. ह्या कायदामुये. देल दिक्षा बेकायदेशीर शे आस ठराव. नी मियकत मजार तेस्ना हक्काले कोणताबी प्रकारनी बाधा येत नही आस ठराव. धाकल्ला पोर पोरीस्ले जर दिक्षा दिन्ही ते ते करणार वर फौजदारी गुन्हा दाखल करीसन जेल मजार टाकेत.आस.प्रकारे महाराजस्नी जुनाट रुढ्या मोडी काढयात. नी कायदा मजार कठोर शिक्षा करान नियोजन कये. ह्या सुधारणास्ना मुये जैन लोकस्ना राग महाराजस्नी आंग वर व्हढी लिन्हा.

     .... सामाजिक सुधारणा करतांना लोकमत दुखावणार नही येन्ही त्या कायजी लेत. गयर धीरगंभीर पणा लिसन तेस्न समाज सुधारणाना काम तेस्नी चालु कय.

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा* *भाग.. ३२

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि - समाज सुधारणा*

*भाग.. ३२*

            समाजन बारीक सारीक अवलोकन, बठ्ठवाचनले स्पर्श करेल नी, गयरा मोठा जगदुन्याना. प्रवासमुये महाराजस्ले आस वाटे की, बठ्ठा सुधारणास्न मुळ समाज सुधारणाज शे. समाजसुधारणा हुयीन तो निस्ता कायदा करीसन व्हनार नही, तेन्हा करता समाज ना भरभक्कम पाठिंबानी गरज शे. तुर्कस्थानना हुकुमशाहा केपालपाशा येस्नी काही समाज सुधारणा कायदाना जोरवर झटपट करी दाखाड्यात. पण काही दिवमजार ते वातावरण तठे टीकन नही. महाराजस्ले धीरे धीरे एकबाजुथाईन लोकमत बनायीसन दुसरीबाजुथाईन समाज सुधारणाना भरभक्कम पाया भरणा व्हता. म्हणीसन तेस्नी धीमी पण टीकनारा रस्ताना स्विकार कया. समाज सुधारणाना बाबत मजार महाराज उतावीळ नी उधय नही व्हतात. तेस्ना इचार ह्या बाबत मजार निश्चित स्वरूपना नी पक्का व्हतात. आप्ला इचार कृतीमजार आणासाठे निश्चयीपना तेस्ना मजार व्हता. तेस्नी समाज मजार होणारा धाकला मोठा दांगडोले वारावांधी न रूप येवु दिन्ह नही. 

              कोणाताबी सामाजिक प्रश्न हाऊ समाजना धार्मिक राजकीय, नी आर्थिक जीवनले चिटकेल ह्रास. सामाजिक प्रश्नना इचार न्यारा करता येतस नही. तेन्हा बद्दल महाराज आर्यसमाजना संमेलन मजार अध्यक्षन भासन करतांना बोलणात, "कोणाताबी समाजनी राजकीय प्रगती हायी तेन्हा सामाजिक मी धार्मिक आचरण वर आवलंबीसन ह्रास. ज्या समाजमजार आप्ला आप्ला मजार वैर, द्वेष, झगडा चालु ह्रातस तेस्नी राजकीय उन्नती व्हावा नी आशा खुडायी जास. जनता मजार एकोपा6, ग्यान येन्हा जर इकास झाया तेस्ना मांगेमांगे सुराज्य चालत येस. जर का कोणाताबी देश मजार सरकार मजार जनतानी भरती करेल व्हयीन, नी ते सरकार जर आप्ली जनता करता सहानुभूती नसीन तर तो दोस जनताना ह्रास. तेव्हा करता पयले आप्ला मजारला दोस काढा ते तुम्ही तुम्हणी सुधारणा करश्यात. तर सरकारबी तुम्हणी प्रगती ना आडे येणार नही."

                 मानवी समाजन बठ्ठ दुक तेन्हा मुळ न्यारा न्यारा थरस्वर विभागेल शे, आस महाराजस्ले वाटे. मुंबई मजार 'आर्यन ब्रदरहूड 'हायी संस्थानी महाराजस्ना सत्कारना येले एक पंगत देल व्हती, तव्हय न्या. चंदावरकर येस्ना स्वागतना भासन नंतर उत्तर देवाणा येल्हे महाराज बोलणात, "आप्ला मव्हरल बठ्ठास्मा पयले श्रेष्ठ ध्येय म्हणजे हिंदुस्थान मजार राष्ट्रीयत्व तयार करण हायी शे. ते करतांना बठ्ठास्न्या भावना सारख्या पाहिजेत. नी त्या होव्हाकरता तेस्ना मजार सामाजिक येवहार चालु व्हवाले जोयजे. सार्वजनिक कामसमजार महिलांस्नी भाग लेन म्हणजे आप्ली प्रगती न लक्सन मी समजस. कारण त्या निमित्ताथाईन माणस्ले दाक्षिण्य सभ्यता यीन., "

             सिक्सन ना संगे नया इचारस्ना समाजनी स्विकार कराले जोयजे. म्हणीसन जुन्या गंजेल गोष्टी महाराजस्नी धीरे धीरे बंद कयात. बालविधवास्ना वापस लगीन लाव्हा करता चालना दिन्ही. सोता पुढाकार लिसन महाराजस्नी आस लगीन घडायी आन. १९१८ सालनी गोट शे. गणेश सदाशिव भाटे नाव ना एक पंडीत नी बायको तरणा वय मजार मरी गयी. दुसर लगीन करता एक वीस वरीसनी तरणी रांडमुंड रूपवान कलावती बाईले तेस्नी लगीन करता तयार करी. भाटे माय बापस्नी गयरा इरोध कया. विधवास्न वापस लगीन करा करता महाराजस्नी भाटेले मदत कयी. महाराज सोता हायी लगीन ले हाजार व्हतात. बॅरीस्टर जयकर बी हाजीर व्हतात. नृत्यतारका रोहिणी भाटे हायी त्या भाटेस्नीजस आंडेर. आसा सामाजिक सुधारणास्ले सनातनी लोक टिंगलटवायी करेत. पण महाराजस्ले तेस्नी फिकीर नही व्हती. सामाजिक सुधारणा पजाले थोडीशी जड जाईन हायी महाराजस्ले माहीत व्हत. 

              महाराजस्नी आप्ला मनथाईन आस ठराव की, धर्म हाऊ हारेक माणुस्नी आवडनी बाब शे. तेन्हावर कोनाबी दबाव नको. आसा दबाव शारीरिक जुलुमस्ना नही ते आर्थिक स्वरूप ना राहु शकस. म्हणीसन १९०१ साल ले 'धार्मिक स्वातंत्र्य निर्बंध' कायदा कया. तेन्हामुये जुलूम करीसन जो धर्मांतर व्हये तेल्हे प्रतिबंध व्हयना. तसच ग्रामपंचायतीस्ले न्याय ना आधिकार देवामुये गावखेडास्मा मजारल्या अन्याय करणाय्रा जातीपमचायतीस्ना नायनाट झाया. बालविवाह नी चाल बंद करी टाकी, नी पोर पोरीस्न लगीन व्हय निश्चित कय. तसा कायदा करीसन त्या कायदा ना काटेकोर पणे आम्मलबजावनी कयी.  ब्रिटीश हिंदुस्थान सरकार नी बी शारदा कायदा पास करीसन बालविवाहले बंदी आनी. पण तेस्ना कायदा नी आम्मलबजावनी नेम्मन झायाज. नही. 

               घटस्फोट ना कायदा पास करीसन महाराजस्नी सामाजिक क्षेत्रा मजार जोरबन क्रांती कयी. दत्तक विधान मजार बी व्यवहार्य आसा कायदाना बदल कया. दत्तक जायेल व्यक्तीले तेस्ना सग्गा भाऊस्ना इस्टन मजार वाटा देव्हाना नही आसी ती तरदुत व्हती. तसज रांडमुंड बाईले तिन्ही इच्छेनुसार जीवन कटता यीन आसा कायदान संरक्षण दिन्ह. परिवार कर्ज फेडीना कायदा कया. गव्हानदी कुटुंब मजारला माणुस्नी जर शिकेल सवरेल ना जोरवर संपत्ती कमायेल. व्हयीन ती तेल्हे, नी तेन्हा वारसस्ले मियाकरता. 'विद्यार्जित धनना' कायदा कया. आसा गयरा कायदा पास कयात. नी त्या कायदा समाजना सुख करता गयरा उपयोगी ठरनात. 

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...