गुरुवार, १ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राजमजार - सिक्सन परसार भाग २३...

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राजमजार - सिक्सन परसार*

*भाग २३...*

१९०७ सालले अलहाबादना लोकस्नी मानपान करा त्या पानंटावर तेस्नी लिखेल व्हत,'भारत मजारला हिंदु राजास्ना सारख तुम्ही परजाहितन काम करीह्रायन्हात तेन्हा नामी काम नी भर म्हणजे आप्ला राज्या मजार करेल सक्तीन फुकटन सिक्सन. ग्यान हायी बठ्ठास्मा पवतीर गोट शे, नादारी, रोग नी गुन्हा ह्या अज्ञान म्हायीनच घडतस,ते सर्व तुम्ही सराव म्हणीसन सुखसाधन तुम्हणी जनताले मियन. आपली कर्म ना फायदा आप्ली जनतालेच मियी ह्रायन्ही आस नही, ते हिंदुस्थान मजार गयरा लोकस्ले आपला फायदा हुयी ह्रायन्हा, आप्ली संस्कृतींना, नी आप्ली देशभक्ती दकीसन आम्ले तुम्ही प्रिय वाटतस. 

             बनारस हिंदू इद्यापीठ करता मदन मोहन मालवीय येस्नी महाराजसकडे एक लाखनी मदत मांगी व्हती. तेन्हावर महाराजस्नी तेस्ले एक सुचना करी, "तुम्ही तुम्हणा इद्यापीठ मजार दोन हरिजन, दोन बौध्द, दोन मुसलमान, दोन बामणस्ना आसा पोर ल्या, तेस्ना राव्हानी, खाव्हापेव्हानी बठ्ठी जिम्मेदारी गायकवाड सरकार करीन, पण मन्ही एक अट शे, हरिजनस्ना दोन पोरस्ना पयकी एकले वेद, नी दुसराले कुराण ना आभ्यास द्या. मुसलमान ना पोरस्ले एकले बायबल, नी दुसराले वेद ना आभ्यास, बामण पोरस्ले एकले कुराण, नी दुसराले बायबल ना अभ्यास, ख्रिश्चन ना पोरस्ले एकले बौद्ध धर्मना, नी एकले वेदस्ना आभ्यास शिकाडा... पंडीतजीस्नी गयरी उशीरा का होईना पण हायी सुचना मान्ही लिन्ही... महाराजस्नी बी एक लाख ना बदला मजार दोन लाखनी मदत करी. सर्व धर्मस्मा सांमजसपना पयदा व्हवो हायी महाराजस्नी तयमय व्हती. तेन्हामुये जगदुन्यामजारला गयरा कुट प्रश्न सुटी जातीन. नी सोपा व्हतीन आस महाराजस्ले वाटे. मालवीयजीस्नी बी महाराजस्ले कुलगुरू पद स्विकारानी इंनंती करी. महाराज असा थोर देशभक्त नी इद्या वर पिरीम करणारा व्यक्ती व्हतात. तसच खाशेराव जाधव, डाॅ बाबासाहेब आंबेडकर आसा गयरा हुशार लोकस्ले महाराज येस्नी इदेश मजार धाडीसन सिक्सन करा करता आर्थिक मदत करीसन सिक्सन करी लिन्ह. त्यामुये तेस्ना व्यक्तीमत्व इकास ते झाया, पण राज्याले बी तेस्ना उपयोग झाया. पाली भाषा ले जीवदान मियो, म्हनीसन पाली भाषा करता मोक्याहातनी आर्थिक मदत करीसन चांगला हुशार पोरस्ले शिष्यवृत्ती दिसन पुणाले फर्ग्युसन कॉलेज मजार पाली भाषा शिकाडाले धाड. 

           बडोदा मजार काॅलेज ना सुवर्ण महोत्सव मजार अध्यक्षीय भासन करतांना महाराज बोलणात, "हायी काॅलेज म्हणजे मन्हा बठ्ठा संस्था मजारली दिपस्तंभ शे आस मी मानस मन्हासमोर बशेल बठ्ठा आजीमाजी इद्यार्थी हायी काॅलेजना उपकार मानतस तेन्हामुये हायी काॅलेजना च्यारीमेर डंका वाजस. मव्हरला काय हाऊ इज्ञान ना काय ह्राहणार शे. पण इज्ञान ना मांगे पयतांना इज्ञान नी ज्ञान माणस्नाकरता शेत येन्ही जान ठेवा. आपीन आप्ला ग्यान उपयोग कसा करतस तेन्हावर अवलंब ह्रास ग्यान इज्ञानमजारल जे उदात्त नी मोठी वारस परंपरा आप्ला कडे येल शे. तो वारसा कोनताबी एक वंस नी एक देस्नी मक्तेदारी नही शे. हाऊ वारसा आप्ला सोताना आप्पलपोट्या परमाने वापराले नही पाहिजे. ते तो जास्तीमा जास्ती विकसित करीसन आप्ला गरीब, श्रीमंत, बठ्ठाच भाऊबहिनीसना कल्याण करता तेन्हा आपीन वापर करो तेन्हा करता तो शे. ह्या गोटनी जानीव हाऊज लोकशाहीना आर्थ शे. लोकशाही काय शे येन्ही जिम्मेदारी तुम्हणा सारखा सिकेलसवरेल तरणा जुवानस्नी शे. आपीन ज्या समाज मजार ह्रातस तो समाज आखो चांगला, जास्ती समर्थ नी जास्ती मुक्त करानी जिद्द हर स्त्री - पुरुष नी पोरस मजार पयदा व्हयीन. तव्हय खरीखुरी लोकशाही उजाया मजार येइन. ग्यान, इद्यान येन्हा केंद्रबिंदू माणुस शे. हर माणुस्नी येन्हा उपयोग सोता पुरता न करता बठ्ठा समाजकरता कराले जोयजे. तेन्हामजारच बठ्ठास्न कल्याण शे आस महाराज नमुदबन बोलनात. "

               महाराजस्नी इंग्लंड, अमेरिका, नी फ्रान्स मजार बी गयय्रा संस्थास्ले देणग्या दिसन मदत कयी नी तेस्ले उपकृत कर. हायी बठ्ठ दख की महाराज येस्नी कितलमहान सिक्सन परसारन व्याप कितला अफाट व्हता हायी ध्यान मजार येस. सिक्सन परसारना तेस्नी ध्यास लेल व्हता. जगदुन्यामजारली, रोगराई, नी संघर्ष जर मिटायना व्हयीन ते सिक्सन हाऊच रामबाण हाऊज उपाय शे अशी महाजस्नी धारणा व्हती. 

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राजमजार - सिक्सन परसार* *भाग.. २२

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राजमजार - सिक्सन परसार*

*भाग.. २२*

            नाशिक, पुण, सातारा, जयगाव, धुये, कोल्हापुर, मजारल्या शैक्षणिक संस्थांस्ले महाराजस्नी गयरी मदत कयी. बहुजन समाज मजार ज्या शिकेल सवरेल लोक जुना कायमजार हुयी ग्यात तेन्ह बठ्ठ श्रेय सयाजीराव महाराजस्ले जास. महाराष्ट्र मजार तेस्नी प्रेरणामुये नामी करतबगारी पिढी तयार व्हयनी. छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, रावसाहेब थोरात, पंजाबराव देशमुख ह्या बठ्ठास्नी महाराजस्ना कडथाईन स्फूर्ती लिसन महाराष्ट्र मजार सिक्सन परसार न नामी काम कर. महाराजस्नी महाराष्ट्र मजारला नादारी ना पोरस्ना करता बडोदा मजार सयाजी वसतीगृहामजार राव्हानी, नी सिक्सननी सोय करेल व्हती.

        १९१८ ले एप्रिल महिना मजार देवळाली ह्या थंड हवान ठिकाणले महाराज राव्हाले येल व्हतात. त्या येले नाशिक मजार तेस्ना सत्कार नी तेस्ले मानपत्र. अर्पण कर व्हत. त्या समारंभले जिल्हाम्हायीन, बाहेरथाईन गयरा लोक येल व्हतात. रावसाहेब थोरात येस्न भासण झाय, नी लगेच महाराजस्न भासण झाय, तव्हय त्या बोलनात, "आठे जमेल मंडई ना मन मजारला इचार माल्हे समजाव नहीत पण मन्हा मनमा हाऊ समाज, हायी हायली, पोरस्ना कपडा, तेस्नी राहणी, व तेस्ना आचारइचार ना मन्हा मन मजार इचार चालु व्हतात. येस्नी तुलना मी नानातह्रानी करत व्हतु, युरोप, अमेरिका या देशस्नी राहणी, तेस्नी सामाजिक परिस्थिती , तेस्नी उन्नती नी आपली हिनता येन्हा बाबत मन्हा मन मजार नानतह्राना इचार यी ह्रायतांत. येन्ह कारण मी न्यारा न्यारा देशस्मजार फिरेल मुये माल्हे तुलना कराले साधन मियन. देशपर्यटन करण हायी बी एक ग्यान न साधन शे, पट्टा ना खाले उतरेल गोट आपीन वापस पट्टावर आणू शकतस तुम्हणा मजार एकी, नी ग्यान मियानी कटबन इच्छा निर्माण व्हवाले जोयजे. सिक्सन परसारन करता मी ३० ते ३५ वरीस फाइल झटी ह्रायन्हु. तुम्ही ज्या महान इचार दाखाडात की, मराठास्ना करताच हायी संस्था नही, ते बाकीना लोकस्ना करता बी आम्हनी काम करानी तयारी शे, हायी तुम्हण कवतीक करा सारख शे, कारण आपला फक्त इकास झाया म्हणजे बठ्ठास्ना इकास व्हत नही, म्हनीसन आपीन बाकीना लोकस्ले बी मदत कराले जोयजे. मी इतलच सांगस तुम्हणा हात ले यश मियो, तुम्हणी संस्थाले मी १२ हजार रुप्या नी मदत धाडस ती तुम्ही स्विकारो. "टायासना कयकयाट मजार महाराजास्न भासन सरन.

              भारत मजार जर राष्ट्रीय एकात्मता तयार करन्ही व्हयीन ते बठ्ठा जातपात ना लोकस्ले सिक्सन मियाले जोयजे. तेस्ले ते पयदा करी देव्हाले जोयजे. 'न्यु इंग्लिश स्कूल' पुणा मजारला भासण मजार महाराज बोलणात," इद्या हायी एकज वर्गले न मियता बठ्ठा स्ले मियाले जोयजे. तव्हय आप्ल पाऊल मव्हरे पडीन. हायी ध्यानमा ठेवा. बठ्ठा राष्ट्राना लोकस्नी झटाले जोयजे, फक्त एकज समाज झटीसन चालाव नही. धाकल्लास पासुन मोठ्ठलास्ले इद्या मिया करता झटाले जोयजे, तव्हयज राष्ट्र मव्हरे जायीन, जन्मताच कोणीच मोठ ह्रास नही, हायी समजन गरजस्न शे. खेडापाडास्मा इद्यान काम नामी नी चांगल व्हवाले पाहिजे. सरवास्ले जर चांगल, वाईट समजीले लागण तर आप्ली प्रगती दुर नही. हायी समजाले हरकत नही.

बडोदा राज्य मजार साल्हेर गाव व्हत, तठे आदिवासी लोक जास्त शेत, म्हनीसन नादारी ना आदिवासीस्ना पोरस्ना करता आश्रमशाय जर काढ्यात, ते नजीक बागलाण शे, मालेगाव शे, ते तठला नादारी ना पोरस्ले पुकटन सिक्सन लेता यीन हायी कल्पना महाराजस्ना मन मजार व्हती. मंग ती योजना कशी आम्मल मजार लयतायीन म्हनीसन ते दखा करता फेब्रुवारी १९३८ ले त्या साल्हेर ले उन्हात. महाराजस्न गाव मालेगाव तालुका मजार व्हत म्हणीसन, बागलाण, मालेगाव, कवळाणा ले महाराजस्ना गयरा नातागोता व्हतात. त्यामुये साहजिक बठ्ठास्ना आंग मजार संचार व्हयेल व्हता. साल्हेर मुल्हेर ना नजीक गयर मोठ मयदान सपाट करी टाकेल व्हत. नजीक न्या येहरीसवर इंजीन बठाळीसन नळ लायीसन जागाजागावर पाणी नी येवस्था करेल व्हती. तठे मालट्रका भरीसन तांदुइ, गहुणपीठ, दायासायान्या पोता, तेलमीठ, मसाला आणेल व्हतात. आदिवासीस्नी बी जेवानी येवस्था व्हती. च्यार पाच दिन पयलेज आदिवासी लोक फाटेलतुटेल कपडास्वर झुंग्या न झुंग्या येवाले लागणात. रोज बडोदाथुन अन्नधान्यान्या मालट्रका भरीसन येत नी शेड मजार खाली व्हयेत. मुल्हेर मजारला तरणा जुवान रांधान काम करेत, नी आदिवासीस्न्या पंगती बसाडेत. हजार गणती लोक जेवण करेत. महाराजस्ना करता मलमल ना तंबू व्हता, सामने दाट गर्द निय्यीगार आमराई व्हती. नजिकच आधिकारीस्ना न्हानामोठा तंबू व्हतात. मलमल ना तंबू मजार आधुनिक सुखसुविधा व्हत्यात. दिवाणखाना, बेडरुम, डायनिंग रुम, स्वच्छतागृह, आश्या सहा सात खोल्या व्हत्यात. किडकीस्ले मस्त चुणीदार पडदा लायेल व्हतात. खाले मस्त झाडा गालिचा, रजाया, आथरेल व्हत्यात. इजना गिवास्नी सोय करेल व्हती, मजार चांदीना नय लायीसन खेयत. पाणी व्हत. बाहेर मस्त फुलझाडस्न्या कुंड्या ठेल व्हत्यात. बडोदा सरकार नी इंग्रज सरकारन सैनिक पहारले व्हत, दोनीस्ना आधिकारी व्हतात नाशिक, धुये, जयगाव ना मानपान लोके बी महाराजस्नी भेट लेव्हाले येल व्हतात. महाराज मोटारने साल्हेर ले उन्हात. त्या येल रस्तावर जागाजागावर तेस्न स्वागत झाय, सुवासिनीस्नी ओवायीसन तेस्न दांडग स्वागत कर. च्यार पाच दिन महाराजस्ना मुक्काम त्या भाग मजार व्हता, तठे येल बठ्ठा तालेवान नी आदिवासीस्ना मेढ्यास्नी बैठक लिन्ही. महाराजस्नी स्क्सनसंस्थास्न्या आडचनी समजी लिन्ह्यात. आप्ला इचार मांडात. नी तठेच आदिवासीस्ना मेढ्यास्ले तेस्नी इचार "तुम्ले काही मांगन व्हयीन ते मांगा". आदिवासीस्ना मेढ्या बोलनात, "महाराज आम्हण एकच मांगन शे आम्हना पोरस्ले शाय मजार जाव्हानी बय जबरी नको. नी दारू गायावर जी बंदी शे ती नको," ते आयकीसन महाराज थंडगार पडनात, नजीकच बशेल भाऊसाहेब हिरे नी बिडकर दादा येस्ले महाराज बोलणात," दखा जीवनभर मी येस्ना करता राबनु पैसा मोडा, पण माल्हे पायजे तशी परगती बिचाय्रा दलित आणि मागास समाज नी व्हयनी नही माल्हे हायी गोट नी खत शे. आडानी लोकस्ले आप्ल हित कसामा शे तेबी समजत नही. तुम्हणा सारखा शिकेल सवरेल लोकस्नी हायी काम कराले जोयजे. मी पयसा कमी पडू देवाव नही. आदिवासी इद्यार्थी मजारतुनच कार्यकर्ता तयार व्हवाले जोयजेत. त्याच कार्यकर्ता ह्या समाजनी प्रगती जास्ती जिव्हाळा नी तयमयनी करतीन, आस माल्हे वाटस. "त्यामुये त्या भाग मजार आश्रमशाया चालु झायात, चांगला कार्यकर्ता घडनात.

         बडोदा राज्य मजारला धानक, वाघेर ह्या गुन्हेगार वृत्तीना आदिवासीस्ना पोरस्ले आश्रमशायास मजार सिक्सन मियन नी मव्हरे तेस्ले पोलीस खाता मजार नोकऱ्या दिन्ह्यात त्यामुये तेस्नी गुन्हेगारीनी लत चालनी गयी. महाराजस्नी सातारा मजार श्री छत्रपती शाहू बोर्डिंगले भेट दिन्ही. कर्मवीर भाऊराव पाटील येस्न कार्य दखीसन त्या गयरा भारायी ग्यात. ते दकीसन महाराज बोलणात, "भाऊराव येस्नी आप्ला देश मजारली जातपात वर घाव घाला जातिभेद नी सिक्सनन कार्य तेस्नी इद्यार्थीस्ले स्वावलंबन नी प्रेरणा दिसन करेल शे. मी ज्या गाव मजार पाय ठेवसु त्या गावमजार शायनी स्थापना कपीसनच बाहेर पडसु," हायी तेस्नी आप्ली लेल सपथ खरी करी दाखाडी, येल्हे म्हणतस जिद्द,"


*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे.)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड महाराज येस्ना राजमजार - सिक्सन परसार भाग २१

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड महाराज येस्ना राजमजार - सिक्सन परसार*

*भाग २१*..

बडोदा मजार महाराजास्नी कलाभवन नी स्थापना करामुये महाराजस्ना डंका आख्खा हिंदुस्थान मजार झाया. ह्या संस्था मजार, रंगशाया, चित्रशाया, शिल्पशाया, नी यंत्रइभाग आणि इणकामना वर्ग चालु करात. प्रो. त्रिभुवनदास गज्जर येस्नी हायी संस्था नी भरभराटी कयी. मव्हरे ते कलाभवन मजार इंजिनिअरिंगन सिक्सन बी चालु कर. चांगला हुशार पोर परदेस मजार धाडीसन तेस्ना उपयोग कलाभवन ना भरभराटी साठे करी लिन्हा. न्याय्रा न्याय्रा इद्या, कला शिकासाठे परदेस मजार जाव्हाले पाहिजे, हायी तेस्नी कलकत्ता मजार औद्योगिक प्रदर्शन न उद्घघाटन ना येले सांग व्हत. तव्हय त्या बोलनात, "हिंदुस्थान मजार शास्त्रीय सिक्सन ना बारा वाजी जायेल शे, म्हनीसन आपीन आप्ला देशना पोरस्ले इद्या आणि कला शिकाकरता परदेस जाव्हाले जोयजे. नी तठींग शिकी येव्हानी संधी तेस्ले मियाले जोयजे. देशना जर इकास करना व्हयीन ते नुसता शिकी लिखीसन चालाव नही, ते त्याना ग्यान मजार भर पडाले जोयजे. ग्यान लेव्हाना करता ग्यानवर बठ्ठास्ना हक शे, "

            पयलेपासुनच कलाभवन मजार एक प्रयोगशाय काढेल व्हती. तठे मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर नी आखो गयरा इषय. शिकाडेत. बठ्ठा हिंदुस्थान म्हायीन पोर तठे शिकाले येत. मव्हरे त्याच कलाभवन न नाव, फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अॅड टेक्नाॅलाजी, नावना संस्था मजार झाय. आते तठे डिग्री न सिक्सन देतस. आसा प्रकारनी तांत्रिक सिक्सन नी सुविधा कलकत्ता नंतर भारत मजार कोठेच नही व्हती.

                   ह्या न्याय्रा न्याय्रा सिक्सन ना संगे भारतीय संगित पाठशाय स्थापन करीसन तेन्हामजार गायन, वादन सारख्या कला शिकाडेत. माध्यमिक, नी उच्च सिक्सन पेक्षा प्राथमिक सिक्सन वर महाराजस्नी जास्त भर व्हती, तशी तेस्नी मनोकामना पण व्हती. सिक्सन नाय महत्व आणि नामी हेतु चरित्रानी जडनघडन ह्रास. बठ्ठ्या परकारन्या सामाजिक सुधारणा लोकस्मा रुजाले जोहिजेत म्हणीसन लोकसिक्सन नी गयरी गरज ह्रास. बडोदा मजार सेंट्रल लायब्ररी नी स्थापना करी मि. बोर्डेन आणि कुडाळकर येस्ना देखरेख खाल वाचनालयनी आधुनिक पध्दतथाईन रचना करी, सेंट्रल लायब्ररी हायी त्या कायले आशिया मजारला बठ्ठास्मा मोठी लायब्ररी व्हती. तिन्ही घडावन बी आधुनिक करेल व्हती. लोखंडना बीम नी काचना स्लॅब बसाजीसन तीन तालनी तयार करेल शे. त्यामुये वर्दळ ना आवाज येत नही आणि वरपासून खालगुन चांगल उजाये पडस. तठे बालइविभाग गयरा चांगला आधुनिक पध्दतनी सुसज्ज करेल शे. त्या कायले त्या लायब्ररी मजार एक लाख ग्रंथ लोकस्ना करता फुकट वाचाले ठेल व्हतात. सेंट्रल लायब्ररी पेट्यामजार धाकल्ला गावस्ले पुस्तक धाडे त्या फिरत्या पेटीस्नी वाचनालये, सयाजी वैभव, आस नाव ठेल व्हत. बडोदा खर वैभव हायी सेंट्रल लायब्ररी शे आस महाराजस्ले वाटे. इतला जिव्हाळा तेस्ले लोकसिक्सन, नी ग्यान परसारना वाटे. बडोदा राज्यानी हायी वाचलयन आप्रुक व्हाईसराॅय लाॅर्ड विलिंग्डन येस्नी मव्हरला सब्देस्मा कवतीक कर व्हत, "मोफत वाचनालयमुये बडोदा संस्थान आगाजा बठ्ठा जग मजार व्हयेल शे, नी आसाज कितला तरी दिन ह्राहीन. ह्या राज्यामजार गावखेडास्ना करता जी फिरती वाचनालय शे ती जगदुन्यामा फक्त स्काॅटलॅड शिवाय कोठेच नही."

             पयले जुना लोक शारीरीक कसरत कडे ध्यान दे नहीत. बुद्धिमान माणस जर शरीर ना निरक नही ह्रायन्हात ते त्या समाजन काम चांगल करु शकतस नही. म्हणीसन महाराजस्नी शारीरीक सिक्सन नी सोय शायस्ना करी. प्रो. माणिकराव येस्ना कडथाइन योजना तयार करीसन ती रावसाहेब दिघे आणि मनोरमाबाई दिघे येस्नी मदत लिसन नामी पद्धत मजार राबाडी. याकाम मजार तेस्नी जुना पहिलवानस्ना उपयोग करी लिन्हा. तेस्नी वाया जाणारी येय नी ताकद राज्या करता वापरी लिन्ही.

*क्रमशः*


(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राजमजार - सिक्सन परसार* भाग... २०

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राजमजार - सिक्सन परसार*

भाग... २०

       प्राथमिक सिक्सन ना कल ज्या गावखेडास्मा चालु शे, त्या खेडास्मा त्या खेडास्मा ज्या धंदा चालू शेत, त्या धंदास्ना बाबत भी पोरस्ले ज्ञान शिकाडाले जोयजे. त्या गाव मजारल्या पंचायतीस्नी शाय मजारल्या उणीवा झामलीसन त्या खाताकडे लगेच कयावयाले जोयजे. धाकल्ला पोरस्ले शाय मजार जास्ती ये कोंडी न ठेवता, तेस्ना कडथाईन वस्तुपाठ ना आधार लिसन सिक्सन देव्हाना प्रयत्न कराले जोयजे. गावखेडास्मा शायमा ज्या पोर येतस त्या शेतकरी,मजुर, पारंपारीक कारारगिस्ना ह्रातस, त्यामुये तेस्ना सिक्सनवर मायबापस्नी ध्यान ह्रात नही, मंग त्या पोर धड आथाना बी ह्रातस नही नी धड थनाना बी ह्रातस नही, म्हनीसन त्या पोरस्ना कडथाईन आंगमेहनत न काम करी लेव्हाले जोयजे, तेस्ले तेस्ना पारंपारिक धंदान ज्ञान देवंहानी जरूरत शे. शाय मजारल्या सुट्ट्या स्थानिक परिस्थितीतले धरीसन असाले जोयजे. राजकारण, न्याय्रा नाय्रा भाषा येन्हा मुये देशमजार स्थिती विस्कळीत व्हस म्हनीसन महाराजस्न मत व्हत, एक देश एक भाषा जोयजे. तेव्हामुये राष्ट्रआभिमान जित्ता राहिन. म्हणीसन तेस्नी बडोदा राज्यामजार हिंदी भाषान सिक्सन सक्तीन कर. न्याय, कचेरीस मजार हिंदी भाषा वापरान हुकुम सोडा.

          महाराजस्नी दुय्यम शायास्नी संख्या इतली जोरबन वाढाई की, पुण हायी इद्या माहेर घर म्हणेत पण पुणान्या हायस्कूल पेक्षा बडोदा न्या हायस्कूल मजार दोन पट पोरीस्नी संख्या जास्त झायी. दुय्यम शायास्नी संख्या वाढा मुये बडोदा राज्यामजार महाविद्यालयस्नी संख्या गयरी वाढत गयी. तेन्हा परिणाम हाऊ झाया की, बडोदा काॅलेजन रुप बदलीसन "महाराज सयाजी युनिव्हर्सिटी "आस झाय.

बडोदा मजार पोरीस्ना करता फक्त पोरीस्नी काॅलेज काढीसन ती काॅलेज महर्षी धोंडो केशव कर्वे येस्नी एस एन डी टी ह्या संस्थाले जोडी. प्राथमिक शायस्ना मास्तरनी तयार करा करता तेस्नी "फिमेल ट्रेनिंग काॅलेज" सुरू कयी. त्या काॅलेज मजार ज्या महिला सिक्सनलेत तिस्ले भत्ता चालु करा. हायी पयल राज्य होत की, महिलास्न करता सिक्सन चालु करिसन अंशतः महिलास्न सिक्सन ना प्रश्न सोडेल व्हता. त्यामुये महाराज ह्या बाकीना संस्थान, आणि ब्रिटिश इंडिया सरकाना पेक्षा गयरा मव्हरे जाईसन वाटचाल करी ह्रायतांत.

        महाराज सदान कदा म्हणेत जर पिढी घडवनी व्हयीन ती भावी पिढी मगिलाज घडावु. शकतीस, म्हनीसन त्या सक्षम पाहिजेत. त्या जर सक्षम झायात ते चांगला नागरीक घडतीन, तस कार्य त्या करु शकतीन. बिगरबुद्दीन्या बाईसमुये सवसार निरस व्हावा नी भय ह्रास. जर महिला शिकेल सवरेल ह्रायन्ही तर मानस्ले मदत करीसन चांगल घर, चांगला पोर, चांगल राज्य, चांगला देश घडू शकस. मुंबई मजारल्या शायस मजार फक्त पोरस्ना इचार करेल व्हता तठे महिलास्नी गरज, तेस्नी मनोकामना, तेस्ना स्वभाव ना कल, येस्ना आजिबात इचार करेल नही व्हता. पोरीस्न्या. शाया चालु झायात पण सिक्सन फक्त पोरस्न. व्हत. येन्हा उलट महाजस्नी महिलास्ना करता उपयोगी, नी तेस्ना मनलेभायीन अश्या महिला पाठशाया काढेल व्हत्यात. घरजीवनशास्त्र, आरोग्यशास्त्र, बालमानसशास्त्र, समाजशास्त्र आसा आखो घरले नी समाजना काम येतीन आसा इसय चालु करात. त्या आभ्यासक्रम मजार वाचन, लेखन, इतिहास, भूगोल, गणित, सयपाक, शिवणकाम, चित्रकला गायन, सामान्यज्ञान, खेय, वस्तुपाठ नी आखो विषयमनोरंजक नी जीवन मजार फायदा ना शेत, कुटुंबवत्सल महिलास्ले घर बशीसन काही काम करता येथीन. म्हणीसन "चिमनाबाई स्त्रीउद्योगालय" न्यारा न्यारा प्रकारना उपक्रम चालू करात. महिलास्ले तेन्हा फायदा बी झाया. तसच महिलास्ना करता नामी फक्त महिलास्ना करता वाचनालय दालन चालु करात  प्रत्येक जण निरक ह्राव्होत म्हनीसन खेय चालु करात, महिलास्ले शरीर कसरत नी आवड पयदा व्हवाले पाहिजे म्हनीसन क्रिडासंनेलन महाराज भरायेत.

              जुना काय मजार राजघराणान्या महिला सिक्सनले कमीपणा समजेत. तत्राप, सनातनी लोकस्न्या टीकास्ले न मानता महाजस्नी महाराणी चिमनाबाई येस्ले शोभेल आसा आभ्यासक्रम चालु कया. नंदाबाई चितळे तेस्ले इंग्रजी शिकायेत, नी सगुनाबाई तेस्ले मराठी शिकायेत. आशी डंगरी शाय (प्रौढ सिक्सन) शंभर वरीस पयले तेस्नी आप्ला परिफाईन सुरु कयी. महाराजस्ना संघे जगदुन्यामा फिरीसन महाराणी चिमनाबाई येस्नी बारीक बारीक गोष्टीस्नी पारख करीसन ग्यान मियाव. तेस्ले नामी सिक्सन मियन म्हणीसनच त्या महाराजस्ना संगे सामाजिक काम करू लागण्यात., पुणा मजार अखिल भारतीय महिला परिषद (१९२७) मजार त्या अध्यक्षीय भाषण मजार बोलण्यात, "बाईस्नीजातले मोहकपना ना सकस मनोविकार, देहविकास, नी बुद्दीविकास व्हावा म्हनीसन बाईस्न सिक्सन न्यार न्यार व्हवाले जोयजे. सिक्सन मुये महिलास्ना न्यारा न्यारा गुणधर्मस्ना विकास बी कराले जोयजे. तसच आप्ली साधी संस्कृती ग्रहण कराणी पात्रता तेस्ना आंगे आनाले जोयजे. म्हणीसन पोरीस्ना करता खास न्याय्रा शाय पाहिजेत हायी उघड शे. पोरस्ली बाकीना इषयनासंगे, आरोग्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, प्रपंचशास्त्र, बालसंगोपनशास्त्र येस्न सिक्सन देव्हाले जोयजे"

       

    *क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राज मजार - सिक्सन परसार* *भाग.. १९

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राज मजार - सिक्सन परसार*

*भाग.. १९*

               श्रीमंत सयाजीराव महाराज येस्ले सत्ता नी संपत्ती तेस्ना भागथाईन मियेल व्हती. पण इद्या तेस्नी तेस्ना कष्टाथाईन मियायेल व्हती. जीवनमजारली सिक्सन नी संधी निंघी जायेल व्हती. फकस्त नशिबखाल आपले परत सिक्सन नी संधी मियेल व्हती, तशी संधी बाकीना लोकस्ले मियाले जोयजे हायी तयमय तेस्ना मन मजार पयदा व्हयनी. आप्ली जनताले तेस्नी शिकाडाना ध्यास धरा. तेस्ना कारभारना पयले त्या कायले बठ्ठा राज्य मजार सात आठ प्राथमिक शाया होत्यात, तठे पोरीस्ना सिक्सन ना प्रश्नज येत नही. फक्त बडोदा सयरमजार एक हायस्कूल व्हती. इतलीच सिक्सन नी परगती व्हयेल व्हती. महाराजस्ना ध्यान मजार उन्ह की, नादारी नी रोगराई येस्न मुय कारण अज्ञान शे. आणि सिक्सन आगाजा हाऊच तेन्हावर उपाय शे. म्हणीसन गाव तठे शाय व्हवाले जोयजे, आसा महाराजस्नी ध्यास लिन्हा. हर गावमजार शायनी स्थापना करीसन लोकस्ना उंबरठा लगुन सिक्सन भिडाले जोयजे. आस धोरण तेस्न व्हत. काही वरीस्ना कायमजार. ३५०० शाया राज्य मजार चालु झायात. लाखो पोर, पोरी सिक्सन लिह्रायंतात, मोठ्ठला गावमजार हायस्कूल चालु कय्रात. तसच बडोदा मजार महाविद्यालय चालु कर. आसा परकारे आधुनिक सिक्सन ना पाया जोर मजार चालु झाया. नवल करानी गोट म्हणजे त्या कायमजार सक्तीन सिक्सन, गरीब मायबाप शाय सोडीसन आप्ला पोरसोर मोलमजुरी कराले लयी जायेत. म्हणीसन आसा नादारीना. पोरस्करता धाकल्ला धंदा चालिकरीसन तेस्नी सिक्सन नी येवस्था करी. आस सिक्सन देवा करता न्याय्रा शाय काढ्यात. कमवा नी शिका हायी कल्पना तेन्हामजार व्हती. महाराज म्हणेत, "गरीब समाजना लोकस्ना पोरे सिकनात, नोकय्रा. करतीन ते माल्हे आनंदच शे. पण आप्ल हित कसामा शे हायी जरी तेस्ले कयन तरी माल्हे समाधान शे.

               इचार करा महाजस्नी १५० वरीस पयले सक्तीन फुकट सिक्सन आप्ला राज्या मजार जिद्द मजार कर. नी ते चालु ठेव. तेन्हा बद्दल एकसावा भारत सपकारना सिक्सन इषयना सल्लागार जे पी नाईक बोलनात, "सरकारले जर सक्तीन फुकटन सिक्सन देन्ह व्हयीन ते श्रीमंत सयाजीराव महाराज येस्ना आदर्श लेव्हाले जोयजे".

              भारत ना समाज एकगठ्ठा व्हवाकरता बठ्ठा समाजमजार सिक्सन ना परसार जोरमा व्हवाले जोयजे आस महाराजस्ले वाटे. हरिजन लोकस्ना पोरपोरीस्ले हायी संधी मियाले पाहिजे म्हनीसन तेस्नी शेकडेागणती शाया चालु कय्रात. मुसलमानस्ना पोरस्ना करता उर्दू शाया चालु कय्रात. पोरीस्ना करता पडदान्या उर्दू शाया चालु कय्रात. भारत मजारल्या स्त्रिया जर अनाडी राहन्यात ते देशमजार नयाइचारस्नी क्रांती व्हवाव नही. पण जर एक पोय्रा ले सिक्सन दिन्ह ते तो शिकेल लिखेल बनस, पण जर एक पोरगीले. सिक्सन दिन्ह ते बठ्ठा परिवार संवसकारीक व्हस. आस महाराजस्न मत व्हत व्हत. म्हणीसन सनातन लोकस्ना इरोध पचाडीसन पोरीस्ना करता शेकडेागणती शाया काढ्यात. जंगल मजार दुर राहणारा राणी ह्या आदिवासी लोकस्ना पोरस्करता सोनगढ, व्याराले आणी आखो गयरा जागासवर आश्रम शाया काढ्यात. तेन्हामजार इद्यारथीस्न, राहन, खान, नी आभ्यास नी सोय करी. आश्रम शायासले जोडीसन खेती, इनकाम, नी सिवनकला सारखा आखो बाकीना जीवनउपयोगी उद्योग सिकानी सोय करी. पयले हरिजन इद्यारथीस्ना करता न्यारी शाय व्हत्यात, त्या आस्ते आस्ते बंद करीसन, त्या इद्यारर्थी बाकिन्या शायस्मा टाकात, नी भेदभाव नी भावना कमी करी. बिगडी जायेल पोरस्ना सुधारग्रुहसमजार तेस्नी सिक्सन नी येवस्था करीसन तेस्ले माणसमजार आण. आंधा, मुक्का, बहिरा, नी निराधारस्ना करता बडेद नी महेसाणा आठे आश्रम शाया चालु कय्रात. तेस्ना जीवन ना कायापालट करी टाक. आस्या परकारन्या शाय त्या येले हिंदुस्थान मजार कोठेज नही व्हत्यात. त्या फक्त बडोदा संस्थान मजारच होत्या. शायना पोरस्ले शिस्त लागाले जोयजे, नी शिबीर जीवन ना परिचय व्हावा म्हनीसन १९०९ साल ले बालवीर संघटना भारत मजार पयले महाजस्ना संस्थान मजार महाराजस्नी प्रयत्न करीसन बडोदाले स्धापन कर. सिक्सन हाऊ जीवन नी समस्या ना कणा शे, तेन्हा मुये राज्याना प्रश्न सुटन सोप व्हयीन.

          ग्रामीण भाग मजारल्या शायस्ना गुरुजी त्याच गावस्मजारला नेमात. म्हणजे तेन्हा बी खेतीबाडी न उत्पन्न व्हयीन, आप्ला आप्ला गावमजार शाय मजार शिकाडथीन. तेस्नी दुसरा गावमजार बदली करानी नही, म्हणजे तेस्ले आप्ला गावना पोरस्करता कायजी ह्राहीन. नी त्या चांगला करतबगारी बनतील.....

   . *क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी - सुराज्यानी रामपायट* *भाग... १८*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी - सुराज्यानी रामपायट*

  *भाग... १८*

        बडोदा राज्यान करता तज्ञस्नी तयार करेल पाटबंधारा नी औद्योगिक विकास न्या योजना लोकमान्य टिळकांनी टिळकस्नी महाराजसकडे धाडेल व्हत्यात. त्या योजना महाराजस्नी आम्मल मजार लयनात.

        जव्हय राज्यारोहण झाय,तव्हय महाराजास्ना हातमा प्रत्यक्ष सत्ता येल व्हती, त्या येले तेस्नी बौध्दिक पातया शायकरी पोरस्ना पेक्षा जास्ती नही व्हती. पण सदा परिश्रमनी एक पल भी वाया न घालवता आप्ली प्रतिष्ठा वाढाई. शाय काॅलेज मजार जे शिकता उन्ह नही ते तेस्नी रोज ना काम करामा गयरा शिकणात. कोणतबी प्रकरण असो तेन्हा त्या खोलवर इचार करेत. आप्ला मन नी जदलगुन खात्री व्हत नही तदलगुन त्या मव्हरे जायेत नही. हाऊ तेस्ना सभाव बनेल व्हता. हर प्रकरण ना चवकसी करीसन मंग विषय समजी लेत. त्यामुये तेस्ले बठ्ठा खातास्नी माहिती झायी. काम समजाडा करता तेस्ना कडे चतुर, नी चाणाक्ष अधिकारी येत. नी ह्या तज्ञ लोकस्ना संगे वादावादी करणे हायीच तेस्न सिक्सन झाय. तेस्नी शिकाऊ वृत्तीमुये बठ्ठी जगदुन्या तेस्ना करता शाय बनी गयी. मव्हरे तर तेस्ना आसा स्वभाव बनी ग्या की, तेस्नी तपासणी हायी अधिकारीस्ना करता दिव्य शे आस वाटाले लागी गये.

              महाराष्ट्र मजारला एक मोठा इचारवंत नी समाजसेवक मामा परमानंदानी "इंडियन स्पेक्टटर" ह्या इंग्रजी साप्ताहिक मजार अनावृत्त पत्रा लिखीसन काही प्रशासक सुचना दिन्यात. महाराजस्नी त्या पत्रा चिकित्सक पणे वाचेल व्हतात. पयल. पत्र १८८९ मजार मामानी लिख, त्या म्हणतस, "महाराज! आपले उदे्शीसन ह्या पत्रा का बर लिखाले प्रवृत्त व्हयनु? कारण तुम्ही तयगायना लाकस्माईन राजा व्हयेल शेत. बठ्ठा प्राणी मात्रासवर जीव लावण आस आप्ल आंतरमन शे, वरिष्ठ सत्ताना कृपावरी आपले सिक्सन ना लाभ व्हयेल शे, एक नादारी ना परिवार मजार आप्ला जनम व्हयना, प्रजान सुखदुकनी आपले धाकलपासुन जाणीव शे, धाकलपने राजदरबार मजारला काही वाईट संस्कार पासुन आपीन सटकी ग्यात, एखादा जाणता इद्यार्थीनी, "मी राजा व्हयनु ते" हाऊ निबंध लिखत असतांना ज्या कल्पना तेन्हा मनमा येतीस तेन्हा बी पेक्षा कितल्या तरी नामी कल्पना तुम्हणा मन मजार घुमत ह्रातीस. आणि त्या इचार कल्पना, मनमा ठिसन यथाशक्ती तेस्नी अम्मलबजावणी करु शकतस आस हायी न्यार भाग्य तुम्हणा वाटाले येल शे. "नी दुसरा पत्रामजार त्या लिखतस," प्रत्येक आधिकारीले, नी मंत्रीस्ले सोता नी जाणीव होव्हाले पाहिजे. आप्ला ज्ञान ना उपयोग जनता ना कल्याण करता कसा करता येतीन हायी मनोकामना जोयजे. न्यारा न्यारा खाता मजार शिकेल सवरेल, काम मजार तरबेज, शिस्त नी नितीमत्ता असणारा माणस्नी निवड करीसन तेस्नी लायकी नुसार नेमणूक कराले जोयजे. आसा अधिकारीस्ले आप्ली नोकरीनी हमी नी सेवासरस तव्हय तेस्नी पोटपाणीनी सोय व्हवाले जोयजे. नोकरीना काय मजार जर काही चुक झायी ते, शिक्षा व्हयीन हासी तेस्ले भीती वाटाले जाेयजे. तसच तेस्नी जर चांगल काम कर ते, तेस्ले पारितोषिक, बक्षिस मियीन आसा भरोसा वाटाले जोयजे. तेन्हा करता आदिकारीस्नी नेमणूक करतांना कायजी लेव्हाले जोयजे. तसच जेस्नी चांगल काम कर तेस्ले, पदक, पदवी, मानधन, मानपान दिसन तेस्न कवतीक कराले जोयजे. मानपान नी आवड बठ्ठास्ले ह्रास. हायी आपण व्हयखाले जोयजे. "

                मव्हरला एक पत्र मजार त्या लिखतस," आप्ला संस्थान मजारला न्यारा न्यारा इभागससे संबंध ठेवण. धाकला गावस्मा काय चालु शे, जनता न्या कोणत्या नड शेत हायी समजन गयर जरुरी शे. तेन्हा करता लोकजाहीर, नी मोठ्ठला दौरा काढानी गरज नही. जव्हय गरज शे तव्हय मोजका लोक लिसन दौरा करता येस. कव्हय मव्हय ते आगाजा न करता बी गुपचूप फिरता येस. तेन्हामुये खर्च वाचीन, ये नी बचत व्हयीन. आस जर कर ते जनता न्या भावना काय शेत, तेस्न्या महत्त्वाकांक्षा काय शेत, त्या कश्या शेत, तेस्नी प्रगतीले काय आड यीह्रायन्ह हायी बठ्ठ जानी लेन्ह आप्ला सारखा राजान कर्तव्य शे. कोठे रस्ता खराब, कोठे पुल पडेल शेत, कोठे येहरी नही ते तलाव नसामुये पाणीन टंचाई जाणावस. कोठे शायमा जाव्हा ले पोर शेत,पण शायज नही. नी ह्या साध्या गोष्टीस्नी जनताले दुक व्हयेल ह्रास. ते तेस्ले भोगण पडस. फेरफटका मारतस तव्हय जर एखादा खेडाना माणुस भेटना तर तेन्हासी जरुसा वेय बोल तर आप्ले जी माहिती मियस, ती आप्ला टेबलवर येणारा आधिकारीस्ना अहवाल पेक्षा कितला तरी मोलन ह्रास. राज्यकारभार चालवतांना चुका व्हतीस. पण त्या जर कोणी ध्यान मजार आणी दिन्ह्यात ते आपीन सहानुभूतीपूर्वक आयकीसन तेन्ह निरसन कराले जोयजे. आप्ले कोणा आधार नही, आप्ला गाह्राणानी कोठेच रितसर दाद लागत नही नी आप्ला कोणी वाली नही आस राज्य मजारला एक बी व्यक्तीले वाटाले नही जोयजे. जनतान समाधान एखादा सहानुभूती सबद मजार बी व्हस. ते आपण देवाले जोयजे. आम्हना राजा खरज आम्हना बाप सारखा शे, आस प्रत्येकले वाटाले जोयजे. मी त्यामुये आप्ला वारस्ना मव्हरे नी बाकीना राजाराजवाडस्ना मव्हरे एक जित्त उदाहरण ठेवाले जोयजे."

              असा सहानुभूतीपूर्वक मार्गदर्शनना संस्कारक्षम महाराजस्नी आप्ली जनता च्यारी मेर कल्याणकरता मोठ्या कैशल्यानी, आणि कल्पकताना. उपयोग महाराज येस्नी करी लिन्हा. महाजस्ना कारकिर्दीबाबत बडोदा ना कवी देवास्कर म्हणतस, 

     दीना जना निवारा /मातेसमान थारा /

जणु हा दुजा शिवाजी /भूपाल श्रीसयाजी/

प्रगति-पथास नेता /शोभे जनास नेता /

राखी प्रजेस राजी /भूपाल श्रीसयाजी/

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६ 

      *क्रमशः*

बुधवार, ३१ मार्च, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी - सुराज्यानी रामपायट* *भाग.. १६

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी - सुराज्यानी रामपायट*

*भाग.. १६*

महाराज सोता काम करु लागामुये दिवाण ना संगे तेस्ना मतभेद व्हवाले लागीग्यात. पयला संस्थानिकस्ना बद्दल सर टी माधवराव येस्न मत अनुकूल नही व्हत. पण महाजस्ना तेस्ले न्यारा आनुभव उन्हात. तेस्नी तल्लख बुध्दी मुये, नी तेस्ले मियेल सिक्सन मुये तेस्नी प्रगती प्रमाण ना बाहेर व्हयेल व्हती. त्यामुये एखादा वादग्रस्त प्रश्नावर चर्चा व्हये तव्हय दोन्हीस्ना मजार मतस्न समर्थन करण आवघड व्हये. तेन्हामुये दोन्हीस्ना मजार मतभेद तीव्र व्हयी ग्यात. सर टी माधवराव येस्ना बद्दल महाराजस्ना मन मजार आजिबात आदर राहेल नही व्हता. कारण बी तस व्हत, इंग्रज सरकार ना संगे करेल करार मजार इंग्रजस्ले झुकत माप सर टी माधवराव येस्नी देल व्हत. ते महाराजस्ले पसंत पडन नही. सर टी माधवराव येस्नी इंग्रजधार्जिना भुमिका मुये, केसरी पेपर मजार अग्रलेख लिखीसन लोकमान्य टीळक येस्नी कडक टीका करेल व्हती. 

             दिवाण आणि महाराज येस्ना वाद न एक उदाहरण देवा सारख शे, १८८२ साल ले पथाजी लालाजी नावना एक माणुस्नी डुंगरशी नावना एक पोय्राना आंगवरना डागिना चोरीसन तेल्हे मारी टाकेल व्हत. खानला कोर्ट नी तेल्हे फाशीनी शिक्षा सुनाडेल व्हती, पण तेन्ही वरला कोर्टमजार अपिल कर नी तेन्ही फाशी रद्द व्हयनी, नी तेल्हे जन्मठेप नी शिक्षा दिन्ही. तव्हय तेन्ही मंजुरी करता हायी काम दिवाण कडे उन्ह, तव्हय तेस्नी वरला कोर्ट नी देल शिक्षा कायम करा करता आप्ला अभिप्राय दिन्हा. पण ते महाराजस्ले पटन नही, नी तेस्नी असा हुकूम करा की, "कागद पत्र दखता आरोपी नी खुन करेल शे, तेन्हामुये जन्मठेप हायी शिक्षा तेल्हे कमी शे, तेन्हामुये खालना कोर्ट नी देल फाशी नी शिक्षाच उचीत शे" ह्या गोटवर दिवाण सर टी माधवराव, नी महाराज येस्ना मतभेद झायात, तसा दिवाण धूर्त, नी चतुर व्हता, तेस्नी दखी लिन्ह मव्हरे आप्ली दाय शिजाव नही, म्हनीसन तेस्नी दिवाण पद ना राजीनामा दिन्हा. महाराजस्नी तो मंजूर करा. 

             सर टी माधवराव येस्ना जागावर काजी शहाबुद्दीन येस्नी दिवाण म्हनीसन नेमणूक करी. त्या सावंतवाडी संस्थान ना रहिवासी व्हतात. त्या कायना महाराष्ट्र मजारला नेता लोकहितवादी, न्या रानडे, नी मामा परमानंद येस्ना संगे तेस्ना गयरा सलोखाना संबंध व्हतात. बडोदा मजार त्या पयले रेव्हेन्यू खाताना मंत्री व्हतात. तेस्न चांगल काम मुयेच तेस्ले दिवाण पदवर बढती मियनी. सर टी माधवराव बडोदा सोडीसन चालना ग्यात, महाजस्नी तेस्ना मन मा तेस्ना बद्दल नी जी आढी व्हती ती काढी टाकी. नी तेस्ना संगे पत्रव्यवहार चालु ठेवा. सरकारी कामकाजना आधिकारी, कर्मचारी येस्ना बद्दल नी आढी महाराज कायम मन मजार नही ठेत. कोणा बदल बी जर रागलोभ झाया ते इसरन थोडस कठीण ह्रास, मव्हरे संबंध ठेवण बी कठीण व्हत, पण महाराज येस्नी ते कसब विचारस्नी, आत्मसंयमनी साध्य करेल व्हत, तसच सर टी माधवराव येस्नी बी महाराजस्ना बद्दल, पिरीम, स्नेह कायम टीकाळी ठेल व्हत. बडोदाले एक काॅलेज ना समारंभना येले, भाषण कराना ओघ मजार, टी माधवराव येस्ना बद्दल बोलनात "त्या येले मन्हा शेजारले दिवाण, नी विश्वासु मित्र सर टी माधवराव ह्या उभा व्हतात. मन्हा जीवन मजार माल्हे ज्या रस्ताले जाण व्हत, त्या रस्ता तेस्नी मन्ह्या वाटचाली करता नामी करी ठेल व्हत्यात. तेस्ना चेहरावरन मुत्सद्दीपणा न तेज नजरमा भरा शिवाय ह्राहे नही. तेस्नी त्या मोजका पाऊल टाकानी पद्धत, पल्लेदार आंगरखा, मद्रासी धोतर, तांबडेलाल ब्राह्मणशाही जुत्ता, मोगलाई पागोट, धव्यपरब जरीकाठन उपरन, नी कानमजारला हिरास्ना कुंडल, नी बोटस मजार हिरास्नी आंगठी, हाउ तेस्ना दरबारी थाट नी गव्हायी व्हती. "

         ब्रिटिश राज्यकारभार समजी लिसन तेस्न्या आदर्श सुधारणा बडोदा राज्य मजार कश्या आणता येतीन, म्हनीसन त्या काही दिन आमदाबादले ह्रायन्हात. तठला शैक्षणिक, औद्योगिक, नी सार्वजनिक स्थळ दखात. नजर मजार येल गोष्टी टाचण करीसन उतारी लिन्ह्यात, नी ह्या गोष्टी आप्ला राज्या मजार कश्या राबवता येतीन, येन्हा इचार पक्का करा. आसा टाचण लिखी काढानी सवय तेस्ले पयले पासुन लायी धरी. तेस्ना आभ्यास ना टेबलवर, जेवाना टेबलवर, झोपान जागावर कोरा कागद, नी दोरा वरी पेन बांधेल ह्राहे. दौरावर ह्रायन्हात म्हणजे हायी पद्धत कायजी करीसन पायेत. आमदाबादना ना दौरा व्हवावर, त्या दोन तीन महिनामजार कलकत्ता ना दौरावर ग्यात. तठे तेस्नी सययर नी रचना दखी, कारखानास्न निरीक्षण कय, तठला कामगारस्नी आर्थिक परिस्थिती, आणि तेस्ना कौसल्यानी माहिती करी लिन्ही, कलकत्ताथाईन वापस उन्हात तव्हय ग्वाल्हेरना जयाजीराव महाराज येस्ना मानपान करीसन स्वागत कर. तेस्नी सयाजीराव महाराज येस्नी बारीक पारख करी. नी रावजी इठ्ठल पुणेकर येस्ले त्या बोलनात, "तुम्हणा महाराजस्नी तल्लख बुध्दी, चौकसपना, नी प्रौढ वागणूक दखीसन माल्हे गयरा हारीक वाटना. आणि आते खरज बडोदा संस्थान ले चांगला दिन येथीन आस मन आंतरमन बोलस", हायी बोलेल पुणेकरस्नी   महाराजस्ले सांग, त्या येले कृतार्थनी महाराजस्ना डोया मजार आनंद ना आसू वायन्हात. 

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...