गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

मी ज्योतीराव फुले बोलतो आहे नानाभाऊ माळी मी कोण होतो? काय होतो? मी कुणासाठी झिजलो?आयुष्यभर लढलो!समर्पित भावनेने लढलो!नेटाने लढलो!गावाबाहेर,वेशीबाहेर कुत्र्यासारखे जीवन जगणाऱ्या माझ्या अस्पृश्य बांधवांसाठी लढलो!दीन-दु:खी अतिशूद्र भावंडांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढलो!..लढतं झुंजलो!झिजलो कधी माघार घेतली नाही!

मी ज्योतीराव फुले बोलतो आहे
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
************************
...नानाभाऊ माळी 
मी कोण होतो? काय होतो? मी कुणासाठी झिजलो?आयुष्यभर लढलो!समर्पित भावनेने लढलो!नेटाने लढलो!गावाबाहेर,
वेशीबाहेर कुत्र्यासारखे जीवन जगणाऱ्या माझ्या अस्पृश्य बांधवांसाठी लढलो!दीन-दु:खी अतिशूद्र भावंडांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढलो!..लढतं झुंजलो!झिजलो कधी माघार घेतली नाही!
माझा मार्ग सत्याचा होता!माझा मार्ग न्यायाचा होता!माझा मार्ग अज्ञानी बांधवांना ज्ञानी करण्याचा होता!स्त्री मनात ज्ञानप्रकाश दाखविण्याचं भाग्य मिळालं!अतिशद्रांच्या दारात उभे राहून ज्ञानसूर्य दाखविण्याचं महाभाग्य लाभलं!जातीभेदाच्या पायावर उभा असलेला वर्ग शिक्षणापासून वंचित होता!त्यांनां ज्ञानी करण्याचं भाग्य निर्मिकाणे मला दिलें होते!अथकपणे कष्ट, झुंज, हक्काची लढाई लढत राहिलो!

...मी ज्योतीराव गोविंदराव फुले बोलतो आहे!मी महात्मा फुले बोलतो आहे!मी पुण्यातल्या गंज पेठेतील ज्योतीराव फुले बोलतो आहे!मी कर्मठांच्या पुणे शहरातील फुले बोलतो आहे!सर्व काही सहन करूनही जिद्दीने,ताट मानेनें उभा असलेला मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!...वर्षे कशी भरा भरा मागे निघून गेलीत!!इतिहासाची अनेक महत्वपूर्ण पाने उलटूनी गेलेतं!काही पाने जीर्ण झालीत!शिर्ण झालीत!१७५वर्षं झाली आहेत!इतिहास त्याचं जीर्ण पानातून जीवंत आहे!अजून शोषण जीवंत आहे!शोषणाची पद्धत त्या ठेकेदारांनी बदलली आहे!लढा सुरूच आहे!जातीयवाद अजूनही जीवंत आहे!स्वार्थ अजूनही धर्माच्या आड जीवंत आहे!तुमच्या शक्तीतून माझा लढा सुरूचं आहे!मी महात्मा फुले बोलतो आहे!

जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती माणूस म्हणून जगावा!जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती न्याय हक्काने जगावा!शोषण विरहित जगावा!जगा अन जगू द्या सारखं जगावं!जातीच्या भक्कम भिंती फोडून,तोडून माणूस म्हणून जगावा!उच-निचता समाजाला लागलेली किड आहे,ती गाडून जगावा!वर्णभेदानें फोफावलेंली किड आहे, ती गाडून जगावा!प्राचीन काळापासून समस्त समाजास पोखरत राहिलेंली वाळवी आहे, ती नष्ट करून जगावा!किडेचा नायनाट व्हावा म्हणून माझा लढा होता!लढा आहे!..मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

आज ११एप्रिल!माझा जन्मदिवस आहे!आपण माझा जन्मदिवस साजरा करीत आहात!जन्मापासूनचं शेती आणि फुलांची आवड होती!वडिलांचा व्यवसाय होता!वडिलांनी मला शाळेत पाठवलं होतं!मी शाळेत गेलो!काही वर्ग शिकलो!"शूद्रानां शिकण्याचा अधिकार नाही!पाप लागतं"..असं माझ्या वडिलांनां धर्माच्या ठेकेदारांनी सांगितले!शिक्षणाचा उजेड खालच्या स्तरापर्यंत पर्यंत पोहचू दिला नाही!शिक्षणाची दरवाजे बंदिस्त होती!यामुळे मी ही उच्च शिक्षणापासून वंचित राहिलो!उच-नीच,जातीयवादी,भेदाभेदनें मन व्याकुळ झालं होतं!संपूर्ण मानव समाजास यां धर्म ठेकेदारांनी वेठीस ठेवले होते!शिक्षणापासून वंचित ठेवले होते!माझ्यातील शिक्षणाची धग शमली नव्हती!राखेंखालीलं विस्तवागतं धग होती!..सर्वप्रथम माझ्या पत्नीला,सावित्रीबाईंना शिकविले!ज्ञानदानाचा प्रकाश घरात प्रकाशित झाला!त्याचा उजेड समस्त महिलांना पोहचविण्याचे कार्य मी आणि सावित्रीबाईंच्या अथक परिश्रमाने केलें!नवनवीन शाळा उघडून ज्ञानप्रकाश स्त्री मनात पोहचवीला!समस्यां अनेक होत्या!जाणूनबुजून खोडा घातला जात होता!अडथळे येत होती!तोंड देत,मार्ग काढीत ध्येयांकडे वाटचाल सुरूच होती!माझ्या भावा बहिणींनो मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

आपण माझी जयंती साजरी करीत आहात!जन्मोत्सव साजरा करीत आहात!गावोगावी मिरवणूक काढून माझ्या कार्यास उजाळा देत आहात!सत्यशोधकी विचार,सत्यधर्माच प्रसार आपण केलात!आम्ही त्या काळी खऱ्या धर्माची,माणसातील माणुसकीची ओळख करून दिली! ती ज्योत माझ्या सर्व बांधवांनी तेवत ठेवली होती!स्त्री शिक्षणाच्या पेटवलेल्या ज्योतीतून अथकपणे शुद्रादि शुद्रांसाठीचा ज्ञानप्रकाश पोहचत होता"अंधश्रद्धे विरुद्ध लढत होतो!समाजावर धर्ममार्तंडांचां प्रचंड पगडा होता!अस्पृश्य वेशी बाहेर होते!हीन जीवन जगत होते!माणूस मुक्तीचा लढा सुरूचं होता!आज त्या कार्यास १७५ वर्षे झाली आहेत!लढा सुरूच आहे!आज आपण लोकशाहीतं जगत आहात!नवे वारे वहात आहेत!नव्या वाऱ्यातही जातीभेदाच प्रदूषण हळूहळू विष बनून फैलावत आहे!... मला अतीव दुःख होत आहे!जातीभेदाच्या भिंती अजूनही तशाच उभ्या आहेत!जातीच्या नावावर राजकारण होतं आहे!धर्माच्या नावाने राजकारण होत आहे!आधुनिक जगात वावरत असूनही जातीभेदाच्या भिंती ढसाळल्या नाहीत अजून!... मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!

धर्माच्या आडून स्वार्थ साधला जात आहे!शिक्षणाने उच्च शिक्षित होऊन ही जात आडवी येत आहे!अजूनही जातीच्या भक्कम जोखंडातून समाज मोकळा झालेला नाही!माझा त्यावेळेसही मानसिक छळ झाला होता!त्रास दिला गेला होता!मी धाडसाने सामोरा जात राहिलो!आज ही तेचं घडतं आहे!जातीभेदाची दरी वाढते आहे!जातीनिर्मूलन झालेचं नाही पण जातीयवादी शक्ती उघड उघड आव्हान देत आहेत!स्त्री-पुरुष समानता अजूनही आलेली नाही!फक्त कागदावर आलेली आहे!तोच कागद वादळात अधांतरी उडत आहे!जातीयवाद अन वर्गवादाचा अजगर ठेकेदारांकडून पोसला जात आहे!.....मी महात्मा फुले बोलतो आहे!🌹

माझं स्वप्न होतं!माझी मागणी होती!माणसाला माणूस बनवायचं होतं!जातीविरहित समाज नजरेसमोर होता!स्वातंत्र्य,बंधुता, समानता, समता,समरसतेवर आधारित समाज रचना असावी असं माझं स्वप्न होत!न्याय हक्कासाठी माझा लढा होता!माणूस कुणाचा गुलाम नाहीये!माणूस जन्माने शूद्र, अतिशूद्र असला म्हणजे श्रेष्ठ नाही का?शिक्षणाने तो सर्व श्रेष्ठ ठरतो!माझा लढा शेतकऱ्यांच्या दरिद्री, दैन्यवस्थेसाठी होता!माझा लढा सत्य शोधनाचा होता!माझा लढा शिक्षणासापासून वंचित असलेल्या स्रि्यांसाठी होता!माझा लढा परित्यक्तां महिलांच्या भवितव्यासाठी होता!शूद्रादिशूद्रांच्या उन्नतीसाठी होता!माझा लढा वर्णभेद,जातीभेद उच्च-कनिष्ठ भेदभाव अन अन्याया विरुद्ध होता!माझा लढा दीन-दुबळ्यांच्या उद्धारासाठी होता!माझा लढा धर्ममार्तंडांच्या अन्यायी कृती विरोधात होता!मी लढत होतो!भांडत होतो!अजूनही लढा संपलेला नाहीये!माझा शिष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशूद्रांच्या दास्यमुक्तीसाठीचा लढा चालूचं ठेवला होता!समानतेचा हक्क, शिक्षणाच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची हाक दिली होती!... मी 
मी संघर्ष केला होता!सावित्रीबाईची साथ होती!सर्वजन साथीला होते!सर्व पद दलितांची साथ होती!आजही माझं स्वप्न अधुरे आहे!अपूर्ण आहे!मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌷

पदोपदी माझा अपमान होत राहिला! उच्चवर्निंयांच्या मिरवणुकीतून बाहेर काढण्यात आलें!माझ्यावर मारेकरू धाडले होते!सावित्रीबाईवरं सतत शेण,चिखल फेक होत राहिली!अन्याय सहन करीत स्त्री शिक्षणकार्य नेटाने सुरूच होतं!अतिशूद्र, सोषितांच्या हक्कासाठी माझा लढा होता!माझ्या घरचा हौद खुला केला होता!त्यांची तहान भागली होती!!माझ्या हृदयातली तहान भागली होती!मी शूद्र होतो!तें अतिशूद्र होते!दोघेही शोषित होतो!दोन्ही एकाचं पातळीवर होतो!माझं काय चुकलं होतं?? मी समस्त शोषित वर्गासाठी लढा उभारला होता!मूठभर स्वार्थ, ज्ञानी समजणाऱ्यांनी माझा कोंडमारा केला होता!माझं जगणं समर्पित होतं!हा माझा गुन्हा होता? प्राचीन जुनाट,खुळंचट परंपरेच्या अभेद्य भिंतीनां सुरुंग लावला होता!एक एक करीत त्या भक्कम भिंती ढासळू लागल्या होत्या!भगदाड पडायला लागले होते!सत्यशोधक समाजाचा सत्य दाखवणारा हा उजेड होता!मी महात्मा फुले बोलतो आहे!🌹

अंधश्रद्धेतं लिप्त ढोंगी धर्म ठेकेदार देवतांची भीती दाखवून लुटमार करत होते!त्यांना सामोरे जात सत्याचा लढा सतत सुरूच होता!माझा लढा खुळचट कर्मकांडाविरुद्ध होता!धर्मविरुद्ध नव्हता!माझा लढा वर्ण आणि वर्गवादाविरुद्ध होता!आम्ही घाबरलो नाही,डागमगलो नाही!सामाजिक न्यायाचा लढा अखंड सुरूच होता!शिक्षणाने माणूस ज्ञानी होतो!ज्ञाननिर्मितीचं केंद्र आमच्याचं घरात होतं!शिक्षण घराघरात पोहचवंत होतो!स्त्री-पुरुष शिकत होते!शुद्रादि अतिशूद्र शिकत होते! ज्ञानकण वेचित ज्ञान प्रकाशात न्हावून निघतं होते!माझा लढा अज्ञानी,दीन-दुबळयांच्या उद्धारासाठी होता!मानसिक जोखंडा पासून मुक्तीसाठी होता!सत्याचा लढा अखंड चालूच ठेवला होता!नंतर ही न्याय हक्कासाठी लढा सुरूचं आहे! शोषित सामाजिक समानतेपर्यंत पोहचत नाहीत तोवर हा लढा सुरूचं राहणार आहे!..मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

माझा लढा मानव उद्धारासाठी होता!धार्मिक अवडंबर विरोधात होता!गावाच्या वेशीबाहेरील शोषितांसाठीचं होता!अस्पृशांसाठीच होता!स्त्री शिक्षणासाठीचं होता!पोटासाठी लाचार असणाऱ्या शुद्रादी अतिशद्रांसाठी,पोटग्रस्तांसाठी होता!कुत्र्यापेक्षाही हिन जगणं ज्यांच्या वाट्याला आलं त्यांच्या हक्कांसाठी होता!हा वर्ग संघर्ष होता!हा वर्ण संघर्ष होता!धर्माच्यां निश्चित अर्थासाठी होता!माणूस पशु नाही!माणूस गुलामही नाही!माणसाला बुद्धी आहे!वाचा आहे!तो गुलाम कसा होऊ शकतो?माणूस जन्माने श्रेष्ठ नाही!माणूस कर्माने श्रेष्ठ आहे!माझा लढा अन्यायी रूढी विरोधात होता!तो विरोध तुमच्या रूपातून अजूनही जीवंत आहे!समान न्यायासाठीचा हा लढा अजूनही जीवंत आहे!आपण जातीभेदाच्या भिंतीनां धडका देत रहा!माणसाच्या मानसिक वेठीबिगारी अन गुलामी पासून मुक्ती मिळेल तेव्हांचं खरं स्वातंत्र्य नजरेस दिसेल!माझा लढा हा तुमच्यातून उभा आहे!मी तुमच्यात उभा आहे!तुम्ही लढत रहा!.. मी ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

सत्याचा आग्रह धरून चालतांना "सत्यशोधक समाजाची" स्थापना केली!शोषित वर्गाला न्याय मिळावा म्हणून २४सप्टेंबर १८७३साली पुणे नगरपालिकेचा सदस्य झालो होतो!सार्वजनिक सत्यधर्म पुजाविधी पुस्तक असं अशा अनेक आधुनिक मूल्यांचां प्रारंभ केला होता!आधुनिक क्रांतिची मशाल घेऊन पुढे निघालो आहोत!माझा लढा मानवतावादी दृष्टिकोनासाठी होता! माझा कार्यगौरव म्हणून "महात्मा" पदवीनें सार्वजनिक ठिकाणी गौरविण्यात आल होत!रात्रंदिवस फक्त आणि फक्त शोषितांच्या जगण्यासाठीचा लढा उभारला होता!बालहत्या प्रतिबंधक गृह सुरुवात केली होती!अनेक रात्रशाळा सुरु केल्या होत्या!"ब्राम्हनांचे कसब" पुस्तकातून माझा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट केला होता!माझा लढा आर्थिक उन्नतीसाठी होता!माझा लढा सामाजिक न्यायासाठी होता!स्रिशिक्षणासाठी हंटर कमिशन समोर निवेदन देण्याचा आग्रह होता!"तृतीयरत्न" हे नाटक, "इशारा","अस्पृशांची कैफियत" ग्रंथातून मांडली होती!माझा लढा थांबलेला नाहीये!पुढे असाच समाजाच्या उन्नतीसाठी चालू राहील!तुमच्या कृतीतून चालू राहील!माझा लढा थांबलेला नाहीये अजून!सामाजिक क्रांतीची मशाल घेऊन लढा सुरूचं राहणार आहे!"🌹

जन्माने उच्च अन श्रेष्ठ समजणारे मूठभर ठेकेदार विशाल सागरासं ओंजळीत घेऊ शकत नाहीत!खुळचट धर्म कल्पनांनी जन्माने श्रेष्ठत्व लादू शकत नाहीत!आपण परिपूर्ण ज्ञान समृद्धीने समानतेचा पाया रचत आहात!त्यातूनचं शास्वत सत्यधर्माचा जन्म होतं राहील!उचनीच भेदभाव विरहित माणसाचा जन्म होतं राहील!सत्यासाठी माझा लढा होता!माझा लढा जोखंडापासून मुक्तीचा होता!संपूर्ण परिवर्तनाचा होता!माझा लढा कष्टाळू शेतकऱ्यांसाठी होता!माझी लेखणी न्यायासाठी आक्रमक झाली होती!मी लिहीत होतो!मी तसाचं कृती करीत होतो!मी ताठपणे उभा होतो!माझ्या विरुद्ध अनेक होते!मी विरोधाला जुमानित नव्हतो!माझा लढा स्त्री दास्य मुक्तीसाठी होता!अजूनही त्याच सत्याची वाट पाहत मी उभा आहे!अनेक पुतळ्यातून आपणास उमेदीचा संदेश देत उभा आहे!माझा पुतळा अंधारातून उजेड दाखवत उभा आहे!सामाजिक क्रांतीची मशाल होऊन अनेक ठिकाणी, अनेक शहरात,खेड्यात उभा आहे!तेथे पूर्ण सत्याचा उजेड असेल!वाट पाहत आहे!मी महात्मा ज्योतीराव फुले बोलतो आहे!🌹

सत्य दर्शनासाठी "शेतकऱ्याचा आसूड" लिहावा लागला!अमेरिकेतील शोषित निग्रो बांधवांच्या छळानें "गुलामगिरी"लिहावं लागलं! हा ग्रंथ निग्रो बांधवाना अर्पित केला होता!महाराष्ट्र शूर,धाडसी,लढाऊंचा देश आहे!छत्रपती शिवाजी राजांवर माझी नितांत श्रद्धा होती!रायगडा वरील समाधी शोधली अन पोवाडा लिहून शौर्याची गाथा माझ्या हृदयातून गात राहिलो!... मी महात्मा फुले बोलतो आहे!🌹

************************
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
************************
... नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-११एप्रिल २०२३

अहिराणी अभंग रामना पहारे अभंग वनमाला पाटील जालना काशी कन्या लिव्हस काव्य संग्रह

रामना पहारे {अभंग}


रामना पहारे । दाटी व वसनी ।
पांधी बुंजायनी । वावरनी॥१॥

सुरू जया दिन । सारजा मायना ।
सडा गोतमाना । आंगलम्हा॥२॥

वना वासुदेव । दे सुपड भर ।
मायना बिल्लोर । हात भरी॥३॥

खोपाम्हान उठे । चिडी नी कोकीय।
दये भवजाय । लोकवान ॥४॥
 
जोत्याम्हान गाय । पाजे का-हडले ।
राजा सरजाले । टाक खोंडे॥५॥

पिसन वसले । हिवज पानेस्ले।
न्हावाड झाडेस्ले । चारीमेर॥६॥

तापीनी ती थडे। डोंगरनी आंगे।
पैरे भांगेभांगे । तो आबीर॥७॥

टाक तुयशीले । रांझनमा पानी ।
काने काकडानी । घंटा वाजे॥८॥

सुवासीन उठी । भारी आचपय।
चुल्हाना धुक्कय । डोयाम्हान ॥९॥

माहेरनी याद । हिरदम्हा गाना ।
भाऊ तो पाव्हना । हाड्या सांगे॥१०॥

राम पहारन । चाले कीरतन ।
भारी आवसान । भूईवर ॥११॥

कितल कौतीक । नारायन तुन्ह।
घर भरे मन्ह । उजायान॥१२॥

इठू रोज सक्ती । कथाइन देस।
गया कालदिस । नवा वुना॥१३॥

वनू इनवन्या । करे हात जोडी। 
भक्तीनी बी गोडी । लाइस बा ॥१४॥

 वनमाला पाटील जालना 
काशी कन्या लिव्हस काव्य संग्रह

ज्योतिबांचा अनुयायी म्हणवुन घेण्यात मला यापूर्वीही कधी लाज वाटली नाही. आत्मविश्वासाने मी आज असे म्हणु शकतो की मीच तेवढा खरा आज ज्योतिबांना एकनिष्ट राहिलो आहे. आणि मला अशी खात्री आहे की या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला. त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी ज्योतिबांचे धोरण, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे यावे लागेल. तोच एक खराखुरा लोकशाहीचा मार्ग आहे

"ज्योतिबांचा अनुयायी म्हणवुन घेण्यात मला यापूर्वीही कधी लाज वाटली नाही. आत्मविश्वासाने मी आज असे म्हणु शकतो की मीच तेवढा खरा आज ज्योतिबांना एकनिष्ट राहिलो आहे. आणि मला अशी खात्री आहे की या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला. त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी ज्योतिबांचे धोरण, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे यावे लागेल. तोच एक खराखुरा लोकशाहीचा मार्ग आहे."


- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, 

(नाशिक येथील भाषण, "जनता" ०८/१२/१९५१)

पोटातील भूक दिलीप पाटील कापडणेदुपारचे बारा वाजले होते.नुकताच शाळेतून घरी आलो होतो.आईला म्हटलं वाड मला जेवायला दे गंआई म्हणाली थांब बाळा,मी आताच गरम गरम टाकून देते...!

पोटातील भूक
 दि.१०/४/२०२३
✍️ दिलीप पाटील कापडणे
दुपारचे बारा वाजले होते.
नुकताच शाळेतून घरी आलो होतो.
आईला म्हटलं वाड मला जेवायला दे गं
आई म्हणाली थांब बाळा,
मी आताच गरम गरम टाकून देते...!

घरात बघते तर काय,
डब्यात पिठच नाही.
आई इकडे तिकडे हा डबा, 
तो डबा पाहू लागली.
आईकडे मी एकसारखा बघत होतो.
भूक माझ्या पोटात मावत नव्हती.
आई माझ्या करता‌ किलवाण्या
करत होती.
काय करावं काहीच सुचत नव्हतं.
आई दोन तीन घरी पिठा साठी फिरली ...?

कोणी दिलं नाही हो तशीच,
आई माझी माघारी आली.
आईचा तो नाराज चेहरा, 
बघुन पोटातील भूक पळाली.
आईच्या कमरेला मी बिलगलो,
आईला म्हटलं मला भूक नाही गं...?

मी नाही जेवणार आई,
मी आता नाही मागणार 
दोघं एकमेंकाकडे बघत होतो.
रडू‌‌ आवरले जात नव्हतं.
आई कुरवाळत होती.
मायेने डोक्यावरं‌ हात‌ फिरवात होती.
डोळ्यात अश्रू ‌मावत नव्हते.
खरंच भाकरी साठी तिची, तळमळ दिसली मला.
अशी ‌आई नाही जगात तिचे उपकार नाही फिटणार.
 कवी.दिलीप हिरामण पाटील
        कापडणे ता जि धुळे
        मो.नं.९६७३३८९८७३

अहिराणी कविता तनया आल्या गर्भी अलगदकुंज लता त्या आत्मजामुठ बांधूनी जन्मल्या त्याच वल्लरी आत्मजा

तनया 

आल्या गर्भी अलगद
कुंज लता त्या आत्मजा
मुठ बांधूनी जन्मल्या 
त्याच वल्लरी आत्मजा

कम नशिबी जन्मल्या 
कितीतरी त्या कन्यका
पुन्य असूनही नाही 
कधी पूजल्या कन्यका

किती बाजारी विकल्या 
वित्तासाठी त्या तनया 
उगा चढल्या बोहली 
जळे हुंड्यात तनया

मृत ती माया, ममता
कीव कोणती ना सुता
शोषतात त्या अनेक 
घरीदारी दीन सुता 

जन्म जनकाच्या घरी
रचे स्वयंवर पुत्री
भोग भोगण्यास गेली 
रानी वनी फिरे पुत्री

इथे कापल्या रक्ताच्या 
हातांनीच त्या तनुजा
निखा-यात जाळलेल्या
कडेलोट हो तनुजा 

गर्भ भरून जन्मावी 
आई शिवाची दुहिता 
करे स्वराज्य स्थापन
गती स्वप्नांची दुहिता 

लेखणीस तोंड देई
माझी सावित्री मुलगी
गवसणी होय तीच
गगनाची ती पोरगी 

येवू द्या जन्मास बेटी
गोड गोजरीच लेक
शिव जन्मास घालीन
सुकुमार असे नेक

काशीकन्या पाटील
शब्दांचे ऋण काव्यसंग्रह

अक्षय साहित्याची अखंड वारी,वसंत ऋतूत चैत्रेय आला दारी

अक्षय साहित्याची अखंड वारी,
वसंत ऋतूत चैत्रेय आला दारी :
"""""""""""""""""""""""""""""""""""""""" 
थंडीचे दिवस संपले की, ऋतुराज वसंताचे आगमन होते. फाल्गुनातील होळी रंगांची उधळन करुन जाते. तोच वसंत ऋतुची चाहूल लागते. शिशिराच्या थंडीने गारठून गेलेली सृष्टी नव्या उमेदीनं पुन्हा एकदा जादुगार वसंताचा रंगबहार शेला अंगावर पांघरायला तयार होते. तद्वत साहित्य क्षेत्रालाही एक वेध लागतं. मायबोलीच्या अमृत तरुवर *"चैत्रेय"* विशेषांकाच्या रुपाने नवी पालवी फुटते. अक्षयाची, अक्षराची नवी पालवी. *संपादक आदरणीय प्रा. डाॅ. नरेंद्रजी पाठक* यांनी नुकताच *"चैत्रेय"* प्रकाशित केला. या अंकातील दिग्गज लेखक, कवींसोबत आपलीही हजेरी लागणं, हा अक्षय आनंदाचा क्षण आहे. 

                    फाल्गून पोर्णिमा अर्थात होळी-पोर्णिमेला 'वसंतोत्सव' प्रारंभ होतो. होळीत सर्व दुर्गूणांना जाळून सद्गुणांची पूजा बांधली जाते. तशीच साहित्यातील विविध प्रवाह आणि प्रकारांची पूजा संपादक प्रा. डाॅ. नरेंद्रजी पाठक यांनी "चैत्रेय" मधून बांधली आहे. ते सतत २२ वर्षे हा उपक्रम चालवत आहेत. साहित्य साधनेचं हे असिधारा व्रतच आहे. त्यांच्या या साधनेला वंदन आणि अंकाचे मनःपूर्वक स्वागत.! सरांच्या ऋणातच राहतो !! 

© प्रा.बी.एन.चौधरी
     (९४२३४९२५९३)

अहिराणी कविता माय येना जलदीसांगू काय तुले माडी कस सांगू समजाडी रिती पडनी व मायमनी दिहम्हान कुडी

माय येना जलदी

सांगू काय तुले माडी 
कस सांगू समजाडी 
रिती पडनी व माय
मनी दिहम्हान कुडी

घाल दोनज बलका 
रव जराखज संगे
पदरेना रूमालथी 
तोंड पुशी दे ना मंगे 

घिस मांडीवर जरा
थोपडीस तू निजाड
माडी तुन्हा बगलम्हा 
जरा माले बी वागाड 

माले खिजाव कताव 
पन येक साव बोल
घिस शिराई बुडूखे 
करू मारान व मोल

तुन्हा बोट धरी माले
दुन्या समदी दाखाड
नव निव्हायन करी
माडी माले न खावाड

माय माय कोकावस 
मन्ह जराख आयेक 
कशी गया दुर सोडी
कोमजायानीज लेक

माय ये व परतीस
माले येखल गमेना 
कधी दपी गयी तुले
डोया निहायी पाहेना

कसा देवबा रूसना
मन्ही माय दे वापस
काही नही ती सवाय
माले कर रे सोबत

सांगू पख रे पाखडी
मन्ही माडीले सांगावा
आसे करू रे देवबा
ल्हेवो ना कोना इसावा

काशीकन्या पाटील 
काशीकन्या लिव्हस काव्य संग्रह

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...