"ज्योतिबांचा अनुयायी म्हणवुन घेण्यात मला यापूर्वीही कधी लाज वाटली नाही. आत्मविश्वासाने मी आज असे म्हणु शकतो की मीच तेवढा खरा आज ज्योतिबांना एकनिष्ट राहिलो आहे. आणि मला अशी खात्री आहे की या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला. त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी ज्योतिबांचे धोरण, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे यावे लागेल. तोच एक खराखुरा लोकशाहीचा मार्ग आहे."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
(नाशिक येथील भाषण, "जनता" ०८/१२/१९५१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा