गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

स्त्री सती विधवा व शीलभ्रष्ट ईश्वर एकच आहे असा सांगणारा एकमेव धर्म फक्त हिंदू धर्म आहे

👩🏻‍🦱👱🏻‍♀️👵🏻👩🏻‍🦱👱🏻‍♀️👵🏻👩🏻‍🦱👱🏻‍♀️
  स्त्री, सती, विधवा व शीलभ्रष्ट
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
               
         मी आधीच सांगितले आहे की, जगातील उत्तम, उदात्त धर्म कोणता असेल तर तों आहे हिंदू धर्म, जगातील सर्व धर्म समान आहेत, ईश्वर एकच आहे असा सांगणारा एकमेव धर्म फक्त हिंदू धर्म आहे. तों कसा महान हे मी पुढे सांगणारच आहे. पण हां धर्म रूढी वाल्यानी बदनाम केला. त्याच्या वर समर्थ उत्तर देणारा कोणी समोर येत नव्हता म्हणून तों बदनाम झाला होता. त्यातील अनेक खोट्या आरोपातील एक आरोप म्हणजे हिंदू धर्मात स्त्री स्वातंत्र्य नाही हां एक आरोप आहे.
        स्त्री जन्माची कथा हीं शोषणाची कथा आहे. अगदी देव, धर्म, नियम, कायदे, संस्कार तयार होण्या आधी पासून आणि माणूस व समाज जन्माला येण्या आधी पासूनची हीं शोषण कथा आहे. माणूस जेंव्हा जनावर होता तेंव्हा पासूनची हीं गोष्ट आहे.
          निसर्गातील सजीव सृष्टीत प्रत्येक प्राण्याच्या बाबतीत एक समान धागा आहे तों म्हणजे शारीरिक दृष्ट्या नर हां मादी पेक्षा बलवान असतो. या बलाढ्य असण्या पासूनच शोषणाला सुरवात होते.
*माणसाला माणूस खाई इथे दुबळ्यांची धडगत नाही.*
         पुढे माणूस जन्मला, समाज तयार झाला, देव आला, धर्म आला, कायदा आला, न्याय संस्था उभ्या राहिल्या तरी स्त्री हीं दुबळीच राहिली. आणि पुरुषी संस्कृती तीच शोषण करत राहील. हां प्रकार प्रत्येक देशात, धर्मात आणि संस्कृतीत आहे. अनेक वर्ष हे शोषण सुरु राहिले. त्यात हळू हळू बदल होतं गेले. पाश्चात्य जगात बरीच वर्ष स्त्रियाना मताचा अधिकार नव्हता. आजही 57 इस्लामिक देशात स्त्रियांना संपूर्ण अंग झाकून लपवून फिराव लागतं. तिथे स्त्रीनें नख दखविणेही हराम आहे.
         तशीच पूर्वीच्या काळी हिंदू धर्मातील स्त्रियावर हीं काही बंधने होती. ती लोक रूढीतून तयार झाली होती. त्याचा देव धर्माशी काहीही संबंध नाही.
*सतीप्रथा*-स्त्रिया नवऱ्याच्या प्रेता बरोबर चितेवर स्वतःला जिवंत जाळून घेत असत. हीं अत्यंत अघोरीं आणि अमानुष प्रथा होती. पण याला धर्माचे कोणतेही अनुष्ठान नाही. तसेच सती जाणे हे बंधन नसून ती ज्याची त्याची ऐच्छीकं बाब होती. यात कोणतीही जबरदस्ती नव्हती.
         दशरथ राजाच्या तीन बायका होत्या त्यातील एकही राणी सती गेली नाही. पंडुराजाच्या दोन बायका होत्या. कुंती आणि माद्री. यातील माद्री सती गेली कुंती गेली नाही. अलीकडे जिजामाता या सती गेल्या नाहीत. छ शिवाजी राजाच्या 8 राण्या होत्या. त्यापैकी सईबाई महाराजा आधीच वारल्या होत्या. सात राण्यापैकी एकट्या पुतळाबाई सती गेल्या. ईतर सहा राण्या सती गेल्या नाहीत. पेशव्यांच्या एक रमा बाई फक्त सती गेल्या. पेशव्याची ईतर कोणीही स्त्री सती गेली नाही. होळकराच्या अहिल्यादेवी सती गेल्या नाहीत.
*सती कोण स्त्रिया जातं होत्या?*
         सती जाणे हीं प्रथा ऐच्छीकं तर होतीचं पण ती फक्त उच्चं वर्णीय, राजे महाराजे अती श्रीमंत लोकांत हीं प्रथा होती. हां वर्ग समाजात जेम तेम 5% चं होता. ईतर 95% च्या वर बहुजन स्त्रिया सती जातं नव्हत्या. 5% समाजातील स्त्रिया फक्त सती जातं होत्या आणि त्याही सरसकट नाही. स्वेच्छेनें जातं असत. जबरदस्ती नाही. असं असलं तरी, हे प्रमाण अत्यल्प असलं तरी स्त्रिया सती जातं होत्या ते अघोरीं कृत्य होते त्याला धर्माची मान्यता नव्हती. पुढे राजाराम मोहन रॉय यांनी लॉर्ड बेंटिंग या भारतीय गव्हर्नर जनरला सांगून हीं प्रथा बंद पाडली. सती जाणे हां कायद्याने गुन्हा ठरविला गेला. हिंदू कोड बिला नंतर तर हिंदू धर्मात कोणतीही अनिष्ट प्रथा पाळने गुन्हा आहे.
        दुसरं अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, विधवा विवाह. आता सर्व जातीत विधवा विवाह होतं आहेत. पूर्वी काही उच्चं जाती आणि श्रीमंत घराणी बाल विधवांचं लग्न लावून देत नव्हते. पण आता यात सुधारणा झाली आहे.
        याच एक आदर्श उदाहरणं सांगतो. खांदेशात कुणबी पाटील हीं एक प्रतिष्ठित समाज आहे. आता ते स्वतःला मराठे म्हणवून घेतात. यांचे पूर्वी वाडे माड्या, भरपूर शेतीवाडी असायची यांच्यात एखादी 7/8 वर्षाची बालिका विधवा झाली तर ती मरे पर्यंत माहेरी रहायची. तिला तीच दुःख कळू नये म्हणून तिला खूप मानपान देत. घरातील सर्व आर्थिक व्यवहार तिच्या हातात देत. पण आता हे बदलल आहे.
        स्व उत्तमराव नाना पाटील वाघळीकर असेच उच्चं कुलीन. ते राज्याचे मोठे मंत्रिही होते. त्यांचा मुलगा रस्ता अपघातात वारला. त्याला एक मुलगी होती 7/8 महिन्याची पत्नी फक्त 21 वर्षाची. शिक्षण 11 पर्यंत. हीं विधवा उत्तम नानाची सून. तिच माहेरही तसंच प्रतिष्ठित. तिचे भाऊ दौलतराव आहेर हेही मंत्री होते. उत्तमराव नानानी या सुनेला परत महाविद्यालयात घातली. तिला पदवीधर केली. नंतर एका बँकेत नोकरी लावली. आणि सुनेचं लग्न एका चांगल्या संस्कारीत मुलांशी लावून दिलं. सून नाही म्हणत होती. पण सासऱ्याने समजवल बाळ तुझं वय खूप कमी आहे. आमच्या म्हाताऱ्याचं काय आज आहे तर उद्या नाही. आणि कन्यादान स्वतः सासू सासर्यांनी करून दिलं. म्हणाले पोरी तुझं हे सासर आज पासून तुझं माहेर झालं. तुला आठवण आली तर कधीही येत जा माहेरी. चार दिवस माहेरचा पाहूनचार घेऊन, क्षीण घालवून पुन्हा सासरी जातं जा. माझी नातं. तू तिची आई आहेस. आम्ही तिला तीच लग्न होई पर्यंत सांभाळू. पण तुला वाटेल तेंव्हा तुझ्या लेकीला घेऊन जातं जा.
        यांचा आदर्श घेऊन अनेक लोक आता विधवा घाटोस्फ़ोटीत मुलेंची लग्न लावून देत आहे. ईतर जातीत तर सुरवाती पासून पुनर्विवाह होतं होतेच. पण ज्या जातीत विधवा विवाह होतं नव्हते त्याला देव धर्म जबाबदार नाही. रूढी वाले जबाबदार आहेत. स्वतः प्रभू राम आणि श्रीकृष्णानी असे विवाह लावून दिले आहेत.
        रामानें वालीची विधवा पत्नी तारा हिचा सुग्रीवसी पुनर्विवाह लावून दिला. रावणाच्या मृत्यू नंतर रामानेंच मंदोदरीचा विवाह बिभीषणाशी लावून दिला. महाभारतात दुर्याधनाची विधवा पत्नी भानुमती हिचा विवाह श्रीकृष्णानें अर्जुनाशी लावून दिला होता. म्हणजे हिंदू धर्मात विधवा विवाह होतं होते. बहुजन वर्गातील इतर सर्व जातीत विधवा विवाह होतं होते. त्याला पाट लावणे किंवा गंधर्व लावणे म्हणतं होते. खोट्या प्रतिषठे साठी लोकांनी विधवा विवाह बंद केले आणि बदनाम धर्म झाला.
खुदा तुने बी क्या खूब दुनिया बनाई हैं
बेगुनाह सजा काट रहे हैं और गुनहगार बा-इज्जत बरी हैं!
पुढच्या भागात बघू स्त्री शील भ्रष्ट असतें का?
क्रमश:
👩🏻‍🦱👱🏻‍♀️🙏🏻👵🏻👩🏻‍🦱 बापू हटकर
👩🏻‍🦱👱🏻‍♀️👵🏻👩🏻‍🦱👱🏻‍♀️👵🏻👩🏻‍🦱👱🏻‍♀️

मराठी कविता कधी नावास जागशी कवियत्री सौ मंगला मधुकर रोकडे

🌾📖🌾कधी नावास जागशी🌾📖🌾
अवेळीच पावसारे 
ढग तुझे गडगडे
नको तेंव्हा नको तसे
         उगा टाकतोस सडे॥धृ॥
ऐन परिक्षा काळात
कसे वाचावेत धडे
तुझ्या गडगडण्यानं
         लक्ष त्यातूनही उडे॥१॥
तुझ्या असल्या येण्यानं
बळी संकटात पडे
हाती आलेल्या पिकाची
         बघ धुळधाण उडे॥२॥
नको वाजवू उगाच
गडगड चे चौघडे
नको इथे तिथे टाकू
       अवकाळी तुझे सडे॥३॥
नाव पर्जंन्यराजा हे
आम्ही दिले तुला बडे
कधी नावास तुझिया 
       सांग जागशिल गडे॥४॥
      --निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं. ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव. 
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३. 
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

डॉ.बाबासाहेब तुमच्यालेखनीने केली कमालसंविधान लिहून तुम्हीउडवून दिली हो धमाल

डॉ.बाबासाहेब अंबेडकर
 दि.१३/४/२०२३

डॉ.बाबासाहेब तुमच्या
लेखनीने केली कमाल
संविधान लिहून तुम्ही
उडवून दिली हो धमाल..!

कायदा कानूनचे महत्व
पटवून दिले गरीब जनतेला
कोणी वंचित राहू नका 
हे ज्ञान सांगितले समाजाला..!

भारतीय राज्यघटना चे
तुम्हीच खरे शिल्पकार
लिहून ठेवले पुस्तकात
आमचे हे सारे अधिकार..!

आता कोणी नाही लाचार
आजवर होते अंधारात
खुले केली मंदिर गावतळे
आणले सर्वांना प्रकाशात..!


कवी.दिलीप हिरामण पाटील
       कापडणे ता जि धुळे
       मो.नं.९६७३३८९८७३

अहिराणी कविता शापित कवी देवदत्त बोरसे

😢 शापित..😢

दोन डोळास्न धरन
गयं भरी,कोठे सांडू ?
वल्ला दुष्काळी मननी
वेथा कोनपन मांडू ?

बाप मांगे माय गयी
म्हनी शाळले मूकनू
भाऊ बहीन शिकाडी
बाप त्यास्ना मी बननू..!

भाऊ बहिन दोन्हीस्नी
घिदं सम्द बागायीत
नौकरीबी करी त्यास्नी
ठेवं मालेचं पडीत..!

नादारीना सौंसारात
व्हती घरवाली तरी
जल्म लेकरस्ले दीस्नी
तीबी गयी देवदारी..!

दुःख गिळीस्नी सगळं
आख्खी हयाती झिजनू
वाडे लायी पोऱ्या पोरी
माय त्यास्नी मी व्हयनू..!

पंख फुटताच चिडा
गांव सोडी उडनात
जल्मदाता ईसरीस्नी
शहेरमा रमनात..!

सोता रांधस भाकर
खास कोल्लावल्ला घास
कोना आधारनी आते
उरनीच नही आस..!

हात जोडीनी देवले
रोज मांगस मरन
देऊ नको माले कधी
आशी शापित जीवन..!

✍️कवी-देवदत्त बोरसे✍️
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.

बुधवार, १२ एप्रिल, २०२३

🌹शानी व्हय पोरी🌹

🌹शानी व्हय पोरी🌹
........................................
तुन्ही माय म्हनस रोजच माले
म्हने ढुंडी लया नवरदेव पोरले!!

तुन्हा नखरा दखिनी कायजी माले
तू आशी वागस,मी काय सांगू तुले

शानी व्हय पोरी,नको झित्रा कापू
मंग तुन्ह्या लगिनन्या पत्रिका छापू

मन्हा जीवले घोर,आलू गयाले दोर
घरमा वर तुन्हा मायना जोर!!

आत्ते करू मी काय?काय सांगू तुले
तू शांती व्हय पोरी,वरदेव ढुंडू दे माले
......... ✍️ रमेश महाले, शहादा

सोमवार, १० एप्रिल, २०२३

मन्ही कविता,मन्हा स्वास,मन्हा ध्यास माय माय तू आत्ते करी रहायना

🌿मन्ही कविता,मन्हा स्वास,मन्हा ध्यास🌿

🤨माय माय तू आत्ते करी रहायना.🤨.

[या रचनाले नासिकले बक्षित भेटेल से,तसच यक पुस्तकम्हा प्रकाशित व्हयेल शे बायाजा कविता संग्रोम्हा]

माय माय तू भाऊ आत्ते करी रहायना

जित्ता पने तू मायले हिंग लाये नयीना

बायकोना तालव्हर तू नंदी बैल व्हयी डोलेना

तिन्हा सिवाय तुन्ह पानबी हाले नयीना

तिन्ह आयकी तू मारक्या बैलना माइक मायकडे देखेना

तिन्हा कोंडमारा करी तू हालहाल करेना

मोठायकी दखाडा करता तू माय माय करी रहायना

पोटम्हा व्हथा तू तव्हय ती जीवले मारेना

खार,आल्न,आंबट,चिंबट खानं तिन्ही सोडी दिंथना

आत्ते तू तिन्हा नावन्या पितरीनी घाली रहायना

तव्हय ते तू मायले बलका बलका करता तरसायेना

ना खाता देवले निवत आत्ते उपेग व्हनार नयीना

म्हनून हातपाय जोडी इनंती तुम्हले मी करसना..

जलमभर मायबापनी करा सेवा,कमी पडाऊ नयीना

मरा नंतर मंदिर बांधी उपेग व्हवाऊ नयीना

आत्तेज इठ्ठल-रखमाई समजी सेवा तेस्नी कराना

सरगनं दार तुम्हले आपेआप खुली जाईना..

नयीते नरक तुम्हना ठयरेल जित्तापने समजी ल्याना

रचनाकार🙏

मझिसु✍️🌷प्राचार्य मगन सुर्यवंशी

सैसांज अहिराणी कवीता

सैसांज अहिराणी कवीता

दिन भर पोटसाठे 
पोटसाठे वनवन,
सरनात आठ तास
तासं सर तन मन.....

कुनबीन बांधे भारा 
भारा गोधनले टाका, 
शेतकरी राजा कशा 
कशा धरतीले वाका..... 

पाखरेस्नी किलकिल 
किलकिल करे चिडी,
दाना आना वाहिसन 
वाहिसन दे खावाडी.....

सूर्य  दिनना व राजा
राजा चाले दिन झाके,
त्याले निरोप जी देता 
देता शेंदूरज टाके.....

गोठाम्हान धन खूर 
खूर जशी वाजे टाया,
दिशे परतेक वाटे
वाटे काढ्यात रांगोयी.....

वना बागे बागे चांद 
धव्यी चांदन्यास्नी शाल,  
पारवर दिम्हयले
दिम्हयले गप्पा ताल..... 

इठायीना मंदिरात 
मंदिरात शिव,गन,
टायकरी रंगनात 
रंगनात जी भजन.....

माय लाये सांजवात
सांजवात तुयशीले,
खेतमया करे झोप
झोप रान गवतले.....

रांधे माय चुल्हावर
चुल्हावर भाकरले,
खाये चटमट जीभ 
जीभ गोडी त्या बट्टाले.....

खोय भरे आभायन 
आभायना भारी गुण,
वनी दुडकत रात 
रात दिन सुनसान.....

काशीकन्या पाटील जालना 
काशीकन्या काव्य संग्रह

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...