शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹
आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजमजा करतात. शेतकरी सालदार बदलतात. त्यांना नविन कपडेलत्ते देतात. सादर आहे लेवा गणबोलीतील माझी कविता-

   शेतकऱ्याची आखजी

आली आखजी आली 
आली दुष्काया पावली
दिस आशे केविलवानी
पिवू आसवाईचंच पानी 
          सासरच्या कामामंधी
          पोर माही पिसोयली 
          माहेरच्या सावलीले
          लेक माही आसोयली 
लेक माहेरी आन्याले
कोनी धाळा रे मुऱ्हाई
चार दिस कवतिकाचे
भोगू दे माह्या बाई
          भरा घागर पितराईची
          घरी नशेना का दाना
          रीण काढीसन धन्याचं 
          तेल तूप घरी आना 
तया सांजऱ्या करंज्या
झोका निंबोनीले बांधा
रोज कोल्ळी भाकर 
आज गोळ धोळ रांधा 
          जरा ईसरा संसार 
          घरी गोकुय भरवा 
          चार दिस सुखाचे
          बाकी जगनं वनवा

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
  (२२.०४.२०२३)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

मन्ही अहिरानी मन्ही अहिरानी

🙏🌷श्रीराम समर्थ🌷🙏🔆दै.तरुण भारतने सविस्तर दखल घेतली या सुंदर सोहळ्याची ,सदरहु वार्तांकन करणारे प्राध्यापक श्री भूषण बिरारी सरांचे मनापासून आभार,या सर्वांस कारण ठरलेले सन्माननीय अहिराणी कस्तुरी परिवार🤹‍♀️👩‍🎨👩🏻‍💼👩🏻‍💼👩‍🎨यासाठी या परिवाराने एकाच गावातील दोन भूमी पुत्रांना🤹‍♀️कान्हदेस अहिराणी भाषा 🔆रत्न🔆पुरस्कार देऊन गौरव केला हे खरचं आपरुक आहे अर्थात जबाबदारीपण वाढली आम्ही दोघे अहिराणी भाषेचा प्रचार निकराने करु,सगळ्यांचे पुनश्च धन्यवाद🙏🌷जय कान्हदेस जय अहिरानीमाय जय शिवराय🌷🙏


🌿मन्ही कविता मन्हा स्वास मन्हा ध्यास🌿

  🔆मुक्तछंद🔆

मन्ही अहिरानी
मन्ही अहिरानी,
सात भाषास्नी ,
पवथीर हायी रानी,

आशी गोड से अहिरानी १
मन्ही अहिरानी,
जशी सात पुड्यास्नी,
बनायेल पाटोड्यास्नी,

भाजीसारखी चव इन्ही २
काय सांगू मायबोलीन,
आपरुक भाऊबहिनिस्वोन तुम्हले,
मराठीतून से हायी जूनी,

म्हाईत से,आनभूक लागीन आपले.३
आत्ते नका दखा मांघे फिरी,
जथीतथी तिल्हे से मिरावानी,
बोलाम्हा अहिरानी,

चालाम्हाबी तीच वानी.४
आते गाडी चुकायनी,
जस नजर हटी,
समजील्या दुर्घटना घटी,

करा जागरसाटे खटपटी.५
लिखाम्हा,भाषनम्हा,
गा मायनाज महिमान,
तशीच मांडा दुन्याम्हान,

 वाढना मान तोच सन्मान.६

अहिरानीमायना धाकलूसा भोप्या🙏
मझिसु✍️🌷प्राचार्य मगन सुर्यवंशी

बात सांगते लाखाची

बात सांगते लाखाची
सत्यावर असत्य हे
आले करितच मात
त्यात केला शपथेने
       पहा आणखी आघात॥धृ॥
शपथेने सत्यतेचा
केला पुरताच घात
वेश सत्याचा घेऊन
           खोटे मिरते जगात॥१॥
खरे रहाते केवळ
रडगाणे गात गात
सत्यतेच्या संघर्षाची
        अशी होते वाताहात॥२॥
सत्य सत्याचे पटेना
कधी जनमानसात 
एक दिवस सत्याचा 
        पण येतो प्रकाशात॥३॥
मग रहावे लागते  
असत्याला भर्कटत
खोलवर कोसळते
        अंधाराच्या गर्ततेत॥४॥
गती तून अधोगती 
खोटे असते साधत
सोडा म्हणून जन हो
  अशी खोट्याची आदत॥५॥
सदा लाभते खोट्याची
अशी अपुरीच साथ
एक लाखाची सांगते
      पहा मंगला ही बात॥६॥
   --निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
=×=×=×=×=×=×=×=×=×=×=×=×=×=

मन्ही कविता मन्हा स्वास मन्हा ध्यास नको कसटन्या लिवू

🌿मन्ही कविता मन्हा स्वास,मन्हा ध्यास🌿

नको कसटन्या लिवू

पापी धोतरा नको इतल्या कसटन्या लिवू, हाडमासना त्याबी जीव तेस्लेबी रहासरे,
सोडीदे आडदांडपना आत्तेतरी सुधर ,
यक दिन तुल्हेबी राम देना सेरे.१

ताडगा व्हथात तव्हय त्या तुन्हा गुंता,
आभाय खाले उतारी त्या तुन्हा सोम्मर लयेत,
 तुन्हा सबत आजिबात खाली नयी पडू देयेत,
सोयताना जीव मारी तुन्हा लाड पुरायेत.२

आता तेस्ना हातपाय काय पडनात,
तू काय तेस्नी हिना करी रहायना,
धोड्या,इतल पाप कसरे तू फेडशीन,
आजूबाजूले देख शाना तू व्हयना.३

ध्यानमान ठेव न्हींगी जाथीन तेस्ना दिन,
लाता झटकी सरगले तरीबी पवचथीन,
पन तुल्हे कुत्रबी सुंगाले येव्हाऊ नयी,
दुन्यादारी देखेल मी सांगी रहायनू हिंमततून.४

आत्तेज मायबापले शाना बनशीन ते देव मानीले,
देवज रहाथस हायी कायी नयी नवलाई,
तुन्हा साराखा उखडेलना कान टोचानाज पडथीन,
त्याशिवाय मन्हासारखाले चैनज पडाऊ नयी.५

अहिरानीमायना तिरंदाज भोप्या🤠
मझिसु✍️🌷प्राचार्य मगन सुर्यवंशी

 ये वाया नको घालू

शिर्षक = ये वाया नको घालू...
आजना दिन मन्हा से
ये नको घालू वाया...
दिन से भलताच कामना
दिन जावावर कोनीच राहत नही साया...!!

कठिन टाईम देखात दिनले
कोणीच व्हत नही सादर...
आजना दिन मन्हा से
समजीसन व्हढीले येसनी चादर...!!

येन कर सोन चमकिसन उठ 
ध्यानमा ठिसन लाग जिदले..
आजना दिन मन्हा से
नको ये वाया घालू हट्टाले...!!

आजना दिन मन्हा से
समजीसन काम कर इमादारीन...
दि देवबा आशिर्वाद 
फय दि तूले तूना कर्मान...!!

कालदिसना दिन सरेल र्‍हास 
तो नविथीन परत येत नही...
आजना दिन म्हना से
मांगे फिरी देख नही ते फिरसी दिशा दाही...!!

कोनीच कोन नही या जगमा
नही लेनार तूनी कोन हमीले...
आजना दिन म्हना से
आनभव मी सांगस कोन येत नही कामले...!!

✍️पिएसआय विनोद बी.सोनवणे लंघाणेकर 
     ह.मु.अमळनेर जि.जळगाव 
     दिनांक =२७-०४-२०२३

बुधवार, २६ एप्रिल, २०२३

आला आला उन्हाळा आता तब्येत सांभाळा 

"आला आला उन्हाळा, आता तब्येत सांभाळा " उन्हाळा म्हटले की नुसते कडक ऊन, वातावरण अगदी रुक्ष,जमीन कोरडी,पाण्यासाठी आसुसलेली, कुठेही मन लागत नाही. सगळीकडे अगदी कडक, चमकणारा सूर्यप्रकाश, डोळ्यांनाही नकोसे व शरीरासह मनासही नको वाटणारे असे ऊन..व तीच परिस्थिती शरीरातही (( जे पिंडी ते ब्रम्हांडी या न्यायाने )) 

यांमध्येच जर आपण अगदी 'थंडगार माठातील पाणी' असे जरी उच्चारले तरीही शरीर व मनास आल्हाददायक, तृप्त झाल्यासारखे वाटते... 

उन्हाळ्यात शरीरास पाण्याची आवश्यकता अधिक भासते त्यासाठी वेगवेगळी थंड व आरोग्यदायी पेय जी आपल्याला उन्हाळ्यात उपयुक्त ठरतील. 

1) थंड पाणी - (फ्रीजमधील थंड पाणी नको) माठातील थंड पाणी घ्यावे. माठातील पाण्यात जर वाळा (उशीर) या नावाची आयुर्वेदीक वनस्पती टाकली व ते पाणी नित्य नियमाने पिले तर पित्ताचे त्रास जसे की लघवीची जळजळ, हातापायांची जळजळ, डोळ्यांची जळजळ यांचा त्रास होणार नाही. उकळून थंड केलेले पाणी पचण्यासाठी हलके असते. उकळून थंड केलेले पाणी जास्त वेळ ठेऊ नये व दुसर्‍या दिवशी पिऊ पण नये त्यासाठी आजच्या एका दिवसापुरतेच पाणी उकळून घ्यावे. दुसर्‍या दिवशी नवीन दुसरे पाणी वापरावे. 

2) ताजे गोड लिंबू सरबत- 

उन्हाळ्यात लिंबू सरबत भरपूर प्रमाणात घ्यावे. यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी व इलेक्ट्रोलाइट्स चा समतोल नीट राहण्यास मदत होते. शरीरातील उष्णता कमी करते. लिंबामध्ये Vitamin C भरपूर प्रमाणात असते. 

3) नारळ पाणी - 

नारळ पाणी गोड असून ते तहान कमी करण्यास मदत करते. पचण्यास हलके, थंड, आल्हाददायक व भरपूर प्रमाणात लघवी होण्यास मदत करते. 

4) कैरीचे पन्हे - 

कैरीचे पन्हे अवश्य घ्यावे याने दाह/जळजळ कमी होते. तोंडास चव येते व पचनासही मदत करते. 

5) कोकम सरबत - 

यास 'आमसूल' असेही म्हणतात. स्वयंपाकात चिंचेऐवजी याचा वापर करावा. याच्या फळांचे सरबत तहान कमी करते. ज्यांना पित्तामुळे अंगावर गांधी उठणे इ. त्रास असतात त्यांनी हे अवश्य घ्यावे. 

6) धन्याचे पाणी - 

10 ग्रॅ थोडेसे कुटलेले धने व 60 मिली पाणी रात्रभर पाण्यात भिजत घालावे व सकाळी ते थोडे हाताने कुस्करून घेऊन पाणी गाळून प्यावे. त्यात थोडी खडीसाखर घालून घेतले तरी चालेल. (मधुमेही वर्ज्य) याने लघवीची आग कमी होते. शरीरातील उष्णता लघवीवाटे बाहेर पडते. 

7) वाळ्याचे सरबत- 

अति प्रमाणात व दुर्गंधी युक्त घामाचे प्रमाण कमी करते. 

8) आवळा सरबत- सर्व पित्तामुळे होणार्‍या त्रासासाठी उपयुक्त, शरीरातील उष्णता कमी करते. आवळ्यात Vitamin C भरपूर प्रमाणात असते. 

9) ताजा ऊसाचा रस- 

ऊसाचा रस थंड, बलकारक आहे. परंतु ऊसाचा रस पिताना एक काळजी घ्यावी ती म्हणजे ऊसाचा रस नेहमी ताजा व बर्फ रहित घ्यावा. शिळा ऊसाचा रस घेऊ नये. 

9) ताजे गोड ताक - 

ताक म्हणजे पृथ्वीवरील अमृतच !! ताक पचण्यास हलके, भूक वाढवणारे,रुचीकर, चव देणारे आहे. आंबट ताक घेऊ नये. 

साधारणपणे इत्यादी पेय शरीरास थंडावा देण्याकरिता वापरु शकतो. याचा उपयोग नक्की करावा. 

इतर हवाबंद थंड पेय यांचा वापर शक्यतो टाळावा...... 

चला तर मग खूश राहा,आनंदी राहा, आणि निरोगी राहा.... 

धन्यवाद 🙏🙏 

🖋📗डॉ.शितल यादव-पाटील व डॉ. बालाजी पाटील 

श्री विश्वइंदु आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, आरोग्य नगर, उमरगा.


सोमवार, १७ एप्रिल, २०२३

गांधी नेहरू विरुद्ध आंबेडकर कोण जिंकलं कोण हारलं?

👴🏻🤴🏻👨🏻‍🎓👴🏻🤴🏻👨🏻‍🎓👴🏻🤴🏻
   गांधी नेहरू विरुद्ध आंबेडकर
     कोण जिंकलं कोण हारलं?
  ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
        गांधी आणि आंबेडकर यांच्यात पहिला खटका सप्टेंबर ते डिसेम्बर 1931 ला लंडन येथे पार पडलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत उडाला. या परिषदेत सुरवातीलाचं गांधीजींनी भाषणात सांगितले की, अखिल भारतीय काँग्रेस हीं सर्व भारतीय लोकांचे प्रतिनिधित्व करते. त्या नंतर गांधीजींच्या या वाक्यावर तीन घटकनी आक्षेप घेतला. त्यात जिनानी सांगितले की, मुस्लिम लीग अल्पसंख्यांक मुस्लिमांसाठी काम करीत आहे. आम्ही त्यांचे प्रतिनिधी आहोत. संस्थानीकांच्या संघटनेने दावा केला की, आमच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाच प्रतिनिधित्व आम्ही करतो. त्या प्रदेशाचा काँग्रेसशी काही संबंध नाही. तर डॉ भीमरावं आंबेडकर यांनी सांगितले की, काँग्रेस फक्त उच्चं जातीच्या लोकांसाठी काम करते. दलितांचं प्रतिनिधित्व मी करतो. म्हणून दलित वर्गाचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलो आहे. त्यामुळे कुठलाही ठोस निर्णय न घेता हीं परिषद पार पडली.
        दुसरा प्रसंग होता लोकप्रतिनिधी गृहात दलितांच्या योग्य प्रतिनिधित्वा संबंधिचा संघर्ष गांधी आंबेडकर यांच्यात उभा राहिला. दलितांसाठी आंबेडकंरांना पृथक मतदारसंघ हवे होते तर गांधीना संयुक्त मतदार संघ हवे होते. पृथक मतदार संघात कोणावरही अन्याय नं होता दलित वर्गासाठी त्यांचं हित जपणारे आमदार खासदार निवडून आणता येत होते. तर संयुक्त राखीव मतदार संघात. Sc वर्ग जेमतेंम 20% पेक्षाही कमी आणि ईतर 80% पेक्षा जास्त मतदार येतात. म्हणजे उमेदवार फक्त दलित पण मतदार ईतर सर्व तें दलित हिताचा उमेदवार निवडून देऊचं शकत नाहीत. शिवाय sc किंवा st राखीव मतदार संघात इतरांना निवडणूक लढाविता येत नाही. म्हणजे हां त्यांच्यावर अन्याय आहे. असा अन्याय बाबासाहेबानी ठरविलेल्या मतदान पद्धतीत नव्हता. पण गांधीजीनी हट्ट केला बाबासाहेबहीं माघार घ्यायला तयार नव्हते. शेवटी गांधीजीनी आमरण उपोषण सुरु केले. त्यातून काही अनर्थ घडू नये म्हणून मग बाबासाहेबाना माघार घ्यावी लागली. इथे वरवर बाबासाहेब हरले आणि गांधी जिंकले अस वाटत असलं तरी, न्याय हरला आणि अन्याय जिंकला हे खरं आहे. तों पुणे करार  24 सप्टेंबर 1932 ला झाला. त्या करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू आले होते असं म्हणतात. मला आजही वाटते की, sc st वर्ग आणि ईतर प्रवर्ग तिघांवरहीं अन्याय करणारा पुणे करार आहे. राजकारणातील आरक्षण अजून लांबणार असेल तर पुणे करार रद्द करून बाबासाहेब आंबेडकर यांनी राखीव मतदार संघाचा जो मूळ मसुदा तयार केला होता तों लागू करावा. तों पुणे करार काय आहे तें बघू पुढच्या भागात. 
क्रमश:
👴🏻👨🏻‍🎓🙏🏻🎓🤴🏻 बापू हटकर
👴🏻🤴🏻👨🏻‍🎓👴🏻🤴🏻👨🏻‍🎓👴🏻🤴🏻

त्रिकाल सत्य आणि कधी कालबाह्य न ठरणारा बाबासाहेबांचा विचार

🎓📚🎓📚🎓📚🎓📚
त्रिकाल सत्य आणि कधी कालबाह्य
  न ठरणारा बाबासाहेबांचा विचार!
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
             खरं तर हां लेख मी 14 एप्रिलसाठी लिहिला होता. पण 14 एप्रिलला सोशल मीडिया वर बाबासाहेब यांना अभिवादनं करणारे खूप संदेश असल्यामुळे हां लेख आता रात्री पाठवत आहे. 
*शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.*  
        तुमची बाजू सत्याची असेल आणि तुमच्या हातात कोणतीहीं साधन नसतील तर तुम्हाला तुमच्यावरील अन्याय निवांरण करण्यासाठी दिलेला महामंत्र आहे हां *शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा!*
        तुम्ही दुबळे आहात अन्याय करणारा प्रबळ आहे, तुमची बाजू खरी आहे, तर तुम्हाला न्यायासाठी त्याच्याशी संघर्ष करावाच लागेल. पण आलं मनात आणि उठले सुटले केला संघर्ष असं चालणार नाही. तस केलं तर ज्याच्याशी संघर्ष करायचा तों प्रबळ असेल त्यामुळे तों तुम्हाला संपवून टाकेल. म्हणून मग तुम्हाला समविचारी लोकांचे संघटन उभ करावं लागेल. पण अशिक्षित अनाडी लोकांचं संघटन करून चालणार नाही. अशी माणसं एकत्र केली तर ते संघटन होणार नाही, ती टोळी होईल. हीं अशिक्षितांची टोळी, स्वतःवरी अन्याय दूर करण्या पेक्षा इतरांवर अन्याय करत सुटतील. संख्या बळाच्या आडदांड पणाच्या जोरावर ते लुटालूट करतील. म्हणून हीं सर्व मंडळी सुशिक्षित असावी. त्यासाठी सर्वात आधी आपण शिक्षण घेतलं पाहिजे. इतरांना सुशिक्षित केलं पाहिजे. मग या सुशिक्षित लोकांचे संघटन करावं, अशा सुशिक्षिततांच्या संघटनेच्या माध्यमातून संघर्ष केला पाहिजे. तुम्ही नक्की जिंकाल. विजयी व्हाल. म्हणून *शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा* हा रामबाण उपाय आहे.

*महात्मा गांधी म्हणतात खेड्याकडे चला, डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शहरांकडे चला!*

 कोण चूक, कोण बरोबर?
माझ्या मते दोघे बरोबर.
         म गांधीच्या काळातील देश हां कृषी प्रधान भारत होता. भारताची सर्व अर्थ व्यवस्था शेतीवर अवलंबून होती. शेती हीं खेड्यातील लोक करत होते. कृषी प्रधान भारताची अर्थ व्यवस्था 80% शेतीवर अवलंबून असल्यामुळे खेड्याकडे चला हां गांधीजींचा सल्ला योग्य होता. पण त्या खेड्यात दलितांची स्थानं काय होत, याच भान कदाचित गांधीना नसावं किंवा त्याबाबत गांधीजीनी तसा विचार केला नसावा.
         पण बाबासाहेबांच तस नव्हत त्यांना प्रत्येक भारतीया सोबत दलित पीडिताची जास्त काळजी होती. ज्यांनी हजारो वर्ष केवळ अन्याय सहन केला होता त्या लोकांचा बाबासाहेब प्राध्यान्यानें विचार करत होते.
          त्यां दलितांचं खेड्यातील जगण अत्यंत वाईट होतं. गावातील सवर्ण समाज म्हणजे जे अस्पृश्य नाहीत. त्यांच्या पुढे दलितांच्या पिढ्यानं पिढ्या दबून होत्या अशा गावात वर मान करून बोलणं सोडा बघणंहीं शक्य नव्हते. तों बरोबरीच्या नात्यांने गावकऱ्याला राम राम किंवा नमस्कार सुद्धा घालू शकत नव्हता. जोहार मायबाप म्हणत होता. पाणी वरून टाकल जायचं. कोणाला स्पर्श झाला तर विटाळ व्हायचा. आणि मुख्य म्हणजे त्याच्याकडे स्वतःच असं उत्पन्नाच कोणतही साधन नव्हतं. मोल मजुरी करायची तर त्याला योग्य मोबदला नाही. अशा लोकांनी खेड्यात गुलामा सारखं का रहायचं? उलट शहरगावांत कोणताही पाटील जमीदार, वतनदार दबाव टाकू शकेल अशी परिस्थिती नसते. झोपडपट्टीत एखाद्या छोट्याशा झोपड्यात संसार थाटावा लागेलं पण गावात तरी कुठे एवढ्या माड्या हवेल्या होत्या या लोकांच्या? तिथही झोपडीच या झोपडीतून त्या झोपडी हाच फरक. शिवाय रोजगाराला कमतरता नाही. गुलामीच ओझं नाही. शहरात मुक्त आयुष्य जगता येत म्हणून बाबासाहेब म्हणत होते शहरा कडे चला तेही बरोबर होते.
        त्याकाळातील परिस्थितीचं अशी होती की, महात्मा गांधीजीं जे म्हणत होते ते खेड्याकडे चला हेही बरोबर आहे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते शहरांकडे चला. दोघेही आपापल्या जागी बरोबर होते.
       पण आता परिस्थिती बदलली आहे. सर्वांचा शहरांकडे जाण्याचा ओढा वाढला आहे. कारण शहरात सर्व प्रकारच्या सुविधा एका जागी उपलब्ध आहेत. शाळा, महाविद्यालये, दवाखानें, स्वछ रस्ते, रोजगार, मनोरंजनाची साधान, वीज, पाणी, गॅस बाजार सर्व सुविधा जागेवर मिळतात. त्यामुळे सर्वत्र शहरी करण वाढत आहे आणि खेडी ओस पडत आहेत. काही लोक शेतीच्या निमित्ताने खेड्यात रहात असले तरी त्यांची शहरातहीं घर आहेत. त्यात सर्व परिवार राहातो आणि कधी तरी हवा पालट करायला वीक एन्ड घालवायला खेड्यातील घरी येतो. इथे बाबासाहेब यांची दूरदृष्टी जिंकली अस वाटत. पुढच्या भागात बघू या गांधी-नेहरू विरुद्ध कोण जिंकलं कोण हरलं!
🎓📚🙏🏻📚🎓 बापू हटकर 
🎓📚🎓📚🎓📚🎓📚

रविवार, १६ एप्रिल, २०२३

अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं

जय मानवताभिमानी!
     
अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं;

अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं
यानी समाज,कुटुंबनं पिरेमसौख्य उचाट!।।धृ.।। 

बायको नई र्हास ती नवरानी रेंजमा! 
ना बाप-बेटाबी त्या ईचार-संवादमा! 
जोडे हुईस्नीबी हालावतस नई व्हट! 
आशी झाई नातास्ना दुरावानी गोट! 
आशी कोनामुये यार उनी हाई बिप्पात?
अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं..।।१।। 

आक्षी फसवणूकना मेसेज वाचीस्नी
सदा हाणामारीना व्हिडिओ दखीस्नी
प्रत्येकजन घाबरीस्नी अलिप्त, निमूट! 
कोनामुये बरं समाजमा हाई फाटाफूट? 
आशी कोनामुये यार उनी हाई बिप्पात? 
अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं!..।।२।। 

शिकामिषे ती मोबाईल कानले लाईस्नी
ल्हेस सुनावा देखी सजनाले बलाईस्नी! 
मायबाप चकित! कुवारीनं देख्ता पोट!
समदास्नी उतारी संस्कृतीले मौतघाट! 
आशी कोनामुये यार उनी हाई बिप्पात? 
अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं!..।।३।। 

अरे यार हाई मोबाईलनं बोटभर चिपाटं! 
यानी समाज,कुटुंबनं पिरेमसौख्य उचाट!।।धृ.।। 
🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
©️®️गुलाबराव धंजी मोरे,धुळे 
मो. ९४०४१९०४३२
दि. १६. ०४. २०२३

याद तुमले येस हुई …आपली माय नि ते याद तुमलेबी येस हुईयाद येस वो कितली वाटे का बरं चालनी गई…

॥श्री॥

            याद तुमले येस हुई …


आपली माय नि ते याद तुमलेबी येस हुई
याद येस वो कितली वाटे का बरं चालनी गई…

घट्यावर बठेल ती गहू दयता दिससं
घाम गयसं आंगना घट्या तसाज व्हडसं…

मांडीवरनं लेकरू खाले वर वर व्हस
मांडी हालता हालता त्याले झोकाज वाटस …

निजस ते बिनघोर मांडी मायनी ती प्यारी
कष्ट करस माय नी लेकरू निजे बिनघोरी…

रोज दयनं कांडन हरबरा तोर दाय
भरडी कांडी तेल लाई मडकाम्हां भरे माय …

हात पाटलान्या शेवया कुरडाया नि पापड
पोया गुईन्या नरम चुलावर ते खापर …

रशी मायना हातनी लाय गयस आते भी
भज्या लोनिना तो गोया खीर गहूनी चाटू मी..

काय काय याद करो जठे तठे ती दिससं
आजूबाजूले फिरस आज आतेबी वाटसं …

माय जीवना जीवडा माय सुगंधी केवडा
मायना करता बठ्ठासना जीव हुई जास येडा…


प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १६ एप्रिल २०२३
वेळ : दुपारी ३/०३

वाचण्यापेक्षा नाचण्यात मजा

वाचण्या पेक्षा नाचण्यात मजा

आजच्या पिढीला वाचण्यापेक्षा नाचण्यात जास्त आनंद आहे . जयंती जोरदार साजरी होते पण महामानवाने दिलेला उपदेश फार कोणी पाळताना दिसत नाही. आज किती जणांनी आंबेडकर वाचले आहेत ? किती जणांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे ? 

आजपर्यंत जे जे संतमहात्मे होऊन गेले. त्यांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करतात. पण त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालणारे कमीच.
उलट राजकारणी, स्वार्थी लोक त्यांच्या मतलबासाठी याचा उपयोग करून घेतात आमचे गांधी, आमचे नेहरू, आमचा नथूराम, आमचे टिळक . अ‍ामचे शिवाजी महाराज, आमचे आंबेडकर, अ‍ामचे फुले, शाहूमहाराज. ही अशी वाटणी करून घेतली आहे. 

गेल्या वर्षी एका मोठ्या सिक्युरिटी कंपनीत मी मॅनेजर म्हणून काम करत होतो. तर आंबेडकर जयंतीच्या दोन दिवस आधी एका लेडी गार्डने मला विचारलं सर मला दोन दिवस सुट्टी पाहिजे. मी विचारलं कशासाठी ? तर ती म्हणाली सर, परवा आमचा सण आहे. मग मला रागच आला. मी तिला विचारलं तुमचा सण म्हणजे काय ? आंबेडकर तुमचेच आहेत का ? आमचे नाहीत का ? *आंबेडकरांनी संपूर्ण भारत देशासाठी कार्य केलेलं आहे. ज्याचा सर्वांनाच आदर असला पाहिजे*. हे ऐकल्यावर तिने मान खाली घातली आणि म्हणाली, सॉरी सर . यापुढे मी असं बोलणार नाही . आणि मग मी तिला एक दिवसाची सुट्टी सँक्शन केली.  

आध्यात्मिक क्षेत्रही याला चुकलेलं नाही कोणी म्हणे आम्ही स्वाध्यायी, कोणी म्हणतं आर्ट ऑफ लिव्हिंग. कोणी म्हणतं आम्ही निर्मलादेवीचे तर कोणी कलावती आईचे. कोणाचा मठ, कोणाचा आश्रम तर कोणाचा आखाडा. समजा एखादा स्वाध्यायी स्वामी समर्थ शिष्या बरोबर चर्चा करत असेल तर ते दोघंही एकमेकाला आमचा मार्गच कसा खरा परमेश्वराच्या जवळ घेऊन जाणारा आहे . हे पटवून देण्याचा मागे असतात. खरं तर एकमेकांच्य‍ा चांगल्या विचारांच‍ा आदर करण्याचीच अ‍ापली मानसिकता असायला हवी. 
  
देवही माणसाने वाटून घेतले आहेत आणि प्रत्येक देवाला त्याचा वार ठरवून दिलेला आहे त्याच दिवशी त्या देवाचं नाव घेतलं की खूप मोठं पुण्य लाभते म्हणे . सोमवारी महादेव लवकर पावतो. गुरूवार दत्ताचा, शनिवार शनिदेवाचं महत्व. मंगळवार,
 शुक्रवार देव्यांचे वार. या दिवशी देव्य‍ांची पूजा केली तर त्या लवकर प्रसन्न होतात का ? 

परमेश्वर म्हणजे काय ? तर तो सद्गुणांचा समुच्चय आहे तुम्ही त्याला मूर्ती बनवून पूजा करा किंवा मनातल्या मनात ठेवा. परमेश्वराची आराधना, पूजा म्हणजे त्याच्यातल्या सद्गुणांची पूजा, आराधना . त्याच्यातले सगळे सद्गुण माझ्यामध्ये येऊ दे आणि माझ्यातले दुर्गुण निघून जाऊ दे ही प्रार्थना करायची हेच खरं अध्यात्म .
अजय बिरारी

अहिरानी प्रेम गीत

शनिवार, १५ एप्रिल, २०२३

मी धाकली व्हतु ना तदय गुढीपाडवा येना ते मना बाबाले सांगु दादा बठा गली मा आपली गुढी मोठी पाहिजे बर इतला लांब दंडा काडी द्या सकाय गुढी पाडवा अस आम्ही गल्लीना पोरी पोरे बठा नदिमा दांडा धवाले जाऊत संध्याकाय ले पाच वाजता जाऊत मी मोठी से दोन भाऊ लहान शेत पण मी ठिकाणे मनी हजेरी राय नदिमा वर आदिनी दांडा पाणी मा सोडाना तो दांडा वाहत वाहत खाले ये आखो तो दांडा धरिसन पाणी मा

मी धाकली व्हतु ना तदय

मी धाकली व्हतु ना तदय गुढीपाडवा येना ते मना बाबाले सांगु दादा बठा गली मा आपली गुढी मोठी पाहिजे बर इतला लांब दंडा काडी द्या सकाय गुढी पाडवा अस आम्ही गल्लीना पोरी पोरे बठा नदिमा दांडा धवाले जाऊत संध्याकाय ले पाच वाजता जाऊत मी मोठी से दोन भाऊ लहान शेत पण मी ठिकाणे मनी हजेरी राय नदिमा वर आदिनी दांडा पाणी मा सोडाना तो दांडा वाहत वाहत खाले ये आखो तो दांडा धरिसन पाणी मा फेकाना अस करत आम्ही भी अर्धा वल्ला वही जाऊत जर रस्तामा दांडा हात माईन सुटी जाय ते आ खो परत नदीमा दांडा धवाले . मग घर उनुत का पाटला वर मनी आजी तो दांडा एक कोप राले उभा करि दे मग मना बाबा पहाटमा गुडी साडे तीन चार वाजानी उभी करी दे मनी मायनी चार वाजानी चुलावर दाय शिजी जाय तवय गॅस वतात पण चहा पुरताज वापरेत सरी जाई मानसेसन गॅस नी हंडी लेवाले जावान बनाऊ नही तवय घरपोच हंडी ये नही आमना समोर माळी समाजना धल्ला राहे तो तीन वाजानी गुडी उभारे मनी आजी सांगे तो भाऊनी तीन वाजानी गुडी उभी राही गई मना बाबा सांगे त्याले काय काम से भकवा ले पंधरा दिनमा चाऊदस ये आणि आमण्या गवराया बसेत सकाय मासात वाजता टिपऱ्या चोमय तांब्या लिसन पंधरा वीस पोरी जाऊत नदिमा पाणी लेवाले त्या पाणी घाई गवराई धुवूत पाणी लयान काय अशी तशी नही आंबाना पानटा तोडूत मज्याना चिं पट दगड नी तई लेऊत कळसनी गत सजा डी गाणा म्हणूत तांब्या घसडू त थडीवर ठेवूत आई थडी न्या पोरी ती थडीन्या पोरीसनी संगे झगडूत दोन तास आमन युद्ध चाले अशी समजा खेळ खेडूत घर येऊ तयारी करी पाय पाय एक बाजू थीन तीन किलो मिटर शाळा मा जाऊत आते कती से गवराई मनी पोरले माहीत भी नही पोरी काय करथीन वीस पंचवीस वर्षे ना काळ मा एवढा बदल व्हई गया नदी भी राहीनी नही पहिले सनीगत मानंस भी राहीना नहीत पहीले गत आभ्यास क्रम भी राहिना नही पहिले काय व्हत धडया खालील प्रश्न उत्तरे गृहपाठ आते पोरे कोणता अभ्यास करतस तेजसमजत नही

हात शेवईची कलामैदा भिजवा पाण्यातसोडा पापडाचा खारमीठ शेंधा कुटण्यात

हात शेवईची कला
दिनांक १४/४/२३

हात शेवईची कला
मैदा भिजवा पाण्यात
सोडा पापडाचा खार
मीठ शेंधा कुटण्यात

एक एक वडी करा
ठेवा ओल्या कापडात
लांब वळी ओढोनिया
शोभे ऐट तबकात

हात चाले भरभर
पीठ धावे भरभर
ओढ येई हातावर
फिरवावी गरगर

सखी स्नेहाची धावते
मध्यावर घाली हात
दोन हात गरगर
जाते बाई टोकरात

हवा असावी घरात
जणू केश कांती भासे
झाली चिप्प हातावर
उडवती सारे हासे

केस लांबसडक ते
भासे शेवयी रुपात
गोरी गोरी लांब लांब
मग शोभे कापडात

दूध शेवयी खायला
सारे कसे जमतात
वेलदोडे केशरात
तुपावर भाजतात

खीर किंवा उकडीचे
दूधातून मजा देई 
वाटीभर खिरीमध्ये
सुके मेवे आई नेई

मस्त अंगत पंगत
भोजनात येई मजा
खीर स्वाद घेण्यासाठी
काढा की थोडीशी रजा

खीर उपमा करावा
नच चरबी वाढावी
आरोग्याच्या पदार्थांना
रुची सदैव जोडावी

डबा लांबट आकार
वर्षभर साठवावा
आले गेले पाहुण्यांच्या
स्वागताला पाठवावा

शेवईची कला न्यारी
भिजवते सुगरण
नयनांच्या भुरळीत
ममत्वाची पखरण

सौ शोभा प्रकाश कोठावदे नवी मुंबई

डाॅ.बाबासाहेब जयंतीप्रकाशाचं दान

डाॅ.बाबासाहेब जयंती

प्रकाशाचं दान
 
बाबासाहेब, माणसांना दिलं जगण्याचं भान
काळोखातल्या आयुष्याला दिलं प्रकाशाचं दान // धृ//

जगणे जेथे मुश्किल होते, दारिद्र्याचा सुकाळ
भीमाबाई आई आणि पिता रामजी सकपाळ
कुटुंबातल्या या गरिबीची होती तुम्हास जाण
काळोखातल्या आयुष्याला...../१/

चिंतनात मनी मार्ग मिळाला, शिक्षण घेण्याचा
जिद्द ठेवुनी सारे मिळुनी, सुशिक्षित होण्याचा
हक्कासाठी लढूया सारे, शिक्षण हे वरदान
काळोखातल्या आयुष्याला....../२/

विचारधारा ज्योतिबांची,  शिरोधार्य मानुनी
वेचले संपूर्ण आयुष्य, संघर्षातच झुंजुनी
लाभली साथ पत्नी रमाची, खंबीर धीरवान
काळोखातल्या आयुष्याला....../३/

शिष्यवृत्ती सन्मान मिळता, परदेशी प्रयाण
घेऊन संधी परदेशात, अव्वलतेचा मान
तरबेज ग्रंथालयी वाचन, चिंतनातले ध्यान
काळोखातल्या आयुष्याला....../४/

मिळविल्यात पदव्या विविधांगी, बहू विषयक
न्यायशास्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ प्रबंधक
राजनीतिज्ञ, हृदयस्थ, समाजसेवक जाण
काळोखातल्या आयुष्याला....../५/

जपले शाहू फुले विचार,  भारतरत्न तुम्ही
दिले भारतीय संविधान, कायमचे ऋणी आम्ही
जरी धर्म भाषा अनेक, दिले ऐक्यनियम ज्ञान
काळोखातल्या आयुष्याला......./६/

दिला संदेश  धर्म , माणुसकी संविधानात
दुमदुमले नाव देशाचे, लोकशाही जगतात
जोवरी सूर्य चंद्र नभी, गाणार तुमचे जयगान
काळोखातल्या आयुष्याला दिलं प्रकाशाचं दान/७/

सुशीला हेमचंद्र पिंपरीकर, नाशिक

शुक्रवार, १४ एप्रिल, २०२३

चारोया घट्यावरन्या चारोळ्या जात्यावरच्या अहिरानी बोली माय माय करु मायमाय मनम्हा वावरेसावरस मी घरले जशी माय वं सावे

चारोया घट्यावरन्या
     [चारोळ्या जात्यावरच्या]
         (अहिरानी बोली)
१]माय माय करु माय
माय मनम्हा वावरे
सावरस मी घरले
           जशी माय वं सावरे॥
२]बाप बाप करु बाप
करु बापना वं जप
जाऊ बापना भेटले
              माहेरले झपझप॥
३]माय माय करु माय
माय सोनानं से नानं
माय बाई मन्हा घर
          तुले पहिला से मान॥
४]भाऊ भाऊ करु भाऊ 
भाऊ मुयं मी बलाऊ
भाऊ सासर माहेर
       दोन्ही कुयंम्हा मिराऊ॥
५]कसं सांगू घट्या तुले 
काय मनम्हा रे दाटे
काटा नितनाच आठे
         मन्हा सासरना वाटे॥
६]नको सोदू शेजीबाई
कशी मन्ही से वं सासू
कांदा चिराना वखत
        डोया दाटतस आसू॥
   --निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे
शब्दसृष्टी, प्लाॅट नं. ७ अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जि.जळगांव. 
दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३.
==============================
सोनानं=सोन्याचं, नानं=नाणं, मन्हा =माझ्या, मुयं=मुळ
कुयम्हा=कुळामधे, मिराऊ=मिरऊ, घट्या=जातं (घरोटा), मनम्हा =मनामधे, काटा=काटे, नितनाच=नित्याचेच, आठे =इथे, वाटे=मार्गात, सोदू=विचारु, शेजीबाई =शेजारीण, वखत=वेळेला, डोयाम्हाना =डोळ्यामधले.
===============================
घट्यावरन्या चारोया
[खान्देशी अहिरानी बोली भाषेतील]
७} काय देऊ लेकी तुले
देऊ सोनाना आईना
नांव अंबरे जाऊ दे
         दुनियाम्हा आईबाना॥
८}मन्ही वहिनी वहिनी
वाटी साखर दहिनी
जशी सोबतीन मन्ही 
        देखा धाकलपननी॥
९}माय ममताना झरा
बाप घरना आसरा
एकमेक ना बिगर
        कोन समायी पसारा॥
१०}माय सारखं ना कोन्ही 
बाप बाहेरना धनी
माय बापना बिगर
     आख्खी दुनिया से सुनी॥
११}कोठे देखताच साप
म्हनतस आरे बाप
माय ममता अमाप
              बाप देखे याप ताप॥
१२}माय माय करु माय
माय बिगर ना घर
नही येस वं कोनले
               माय माऊलीनी सर॥
     --निसर्ग सखी सौ मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं. ७ अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड,एरंडोल जि.जळगांव. 
दूरध्वनी क्र. :- ९३७१९०२३०३.
===============================
तुले =तुला, सोनाना=सोन्याचा, आईना=आरसा, अंबरे=आभाळापर्यंत,मन्ही =माझी, दहिनी=दहिची, सोबतीन =मैत्रिण, धाकलपननी =बालपणीची, समायी=सांभाळेल, आख्खी =सगळी, याप-ताप=व्याप ताप, येस=येते, कोनले=कुणाला. 
॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥

चारोया-घट्यावरन्या
(अहिरानी खान्देशनी बोली भाषा)
१३]माय माय करु माय
जाऊ मायना भेटले
कशी सांगू जान से वं
         सासू सासरा जेठले॥
१४]मनम्हानी हूरहूर 
कोना जोडे वं बोलसू
घट्या बोले घरंघरं
          गोट तठेच खोलसू॥
१५]आखाजीले दिवायीले
याद मायनी वं येस
माय माहेरना गावं 
             मंग पाऊल वयसं॥
१६]बाप बाप करु बाप 
बाप माले बलावस
सने सुदे याद करी
          देखा मुयं बी लावसं॥
     --निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे
शब्दसृष्टी, मास्तरवाडी, नेहरु नगर, देवपूर, धुये. 
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
-----------------------------------------------------------
जानं से वं=जायचं आहे ग, मनम्हानी =मनातली, कोना जोडे =कुणा जवळ, बोलसू=बोलणार, गोट=गोष्ट बात, तठेच=तिथेच, खोलसू=खोलणार बोलणार, आखाजीले =अक्षय तृतीयेला, येस=येते, मंग=मग, वयसं=वळतं, माले=मला,बलावस=बोलावतो, मुयं=मुळ, बी=सुध्दा, लावस=लावतो.
----------------------------------------------------------------

माझी आई अशीच आहे      🌹🌹🌹🌹🌹🌹*******************... नानाभाऊ माळी "श्रीमंतांची मम्मी असतें  गरीबाची माय असतेंआई दोघांची सेम असतेंआई ती आईचं असतें!..🌷

माझी आई अशीच आहे
      
🌹🌹🌹🌹🌹🌹
*******************
... नानाभाऊ माळी 

"श्रीमंतांची मम्मी असतें
  गरीबाची माय असतें
आई दोघांची सेम असतें
आई ती आईचं असतें!..🌷

आई रावणाची असतें 
आई रामाचीही असतें
हृदयाची माया असते
संस्कार शाळा असतें!..🌹

काट्यातील फुल असतें
आई देवासारखी दिसते
बाळाशी गोड हसते
..आई सर्वांचीचं असतें!🌷

आई स्वतःचीचं नसते
ममतेचा बाजार असतें 
गोड बोलण्यात फसतें 
कणकणात आई असतें!🌹

..माझ्या दोन्ही बहीणी पुण्यातल्या कात्रजमध्ये राहायला आहेतं!माझ्या मोठया बहिणीचा मुलगा,माझा भाचा काल अचानक रिक्षा घेऊन आमच्या घरी आला होता!तसा तो पुण्यात रिक्षा चालवतो!त्याच्या सोबत उगवत्या सूर्य साक्षीने गप्पा टप्पा सुरु होत्या अन मला सहज बोलून गेला,'दोन-चार दिवस आजींना कात्रजला घेऊन जातो मामा!आजींना वातावरणात थोडा बदलही होईल!आजींना बरं वाटेल!माझ्या आईलाही बरं वाटेल!..माझं बालपण आजींच्या ममतेच्या सावलीत गेलेलं आहे!माझ्या खोड्यांची जंत्री खूप मोठी होती!आजीमुळे मी कित्येकदा अनेकांचा मार खाण्यापासून वाचलो आहे!मला आजीने घडवलं जगण्याची तालीम दिली!आज मी आजीमुळेचं उभा आहे मामा!आई तर दिवसभर बाजारात भाजी विक्रीला गेलेली असायची!'.. थोडा थांबला अन पुन्हा बोलू लागला ,'मामा आजींना घेऊनचं जातो ना काही दिवस!आजींच्या मांडीवर बरेच दिवस डोक ठेवायला मिळालंच नाही हो मला!आज माझी मुलगी १०वीला आहे!तरी मी लहानच आहे!आजी आहेच अशी!'

काळ मागे सरकत असतो!आपण पुढे सरकत असतो!आई दिवाणवर बसली होती!अलीकडे आईला वयोमानानुसार कमी ऐकू यायला लागलं आहे!भाचा माझ्याशी बोलतं होता!आईच्या कानावर एखादा दुसरा शब्द पडतं होता!नातू आल्याचा आनंद आजींच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता!एक वेगळ तेज, झळाळी आईच्या चेहऱ्यावरून दिसतं होती!नातू आल्याचा आंनद काही वेगळाचं होता!!.. सकाळ होती!आईने सुनेला अर्थात आमच्या अर्धांगिनीला प्रथम कळण्याची भाकरी (दोन-तीन डाळी एकत्र करून थोडं मीठ टाकून दळून आणलेलं पीठ)करायला सांगितले!तव्यावर चटका घेतं भाकरी चांगली भाजली गेली!भाकरीची पूड,पोट उघडून,पोपडा काढून आतल्या पोटात तेल तिखट टाकून भाकरी ताटात ठेवून भाऊसाहेबा समोर ठेवली!🌹

भाऊसाहेबाला कळण्याची भाकरी अजिबात आवडत नव्हती!आजीच्या हट्ट रेट्यापुढे त्याने हात टेकला अन कशीतरी गळ्याखाली भाकरी ढकलली!भाकरी खातांना भाऊसाहेब बोलला,'आजी तयारी कर,आपल्याला कात्रजला जायचं आहे!'थकलेली!हातापायांची नाजूक वळकुटी झालेली माझी आई काही वेळ माझ्याकडे पाहत होती!काही वेळ सुनेकडे पाहत होती!काही वेळ नातसूनेकडे पाहत होतीअन रागावून बोलू लागली,'तुम्हाला माझा कंटाळा आला आहे का? माझी ही गलितगात्रे येथेच तुमच्या येथे ठेवून कायमची जाणार आहे!'..आईच्या यां शब्दांनी माझ हळव मन द्रवलं होतं!मनाला खूप वाईट वाटले होते!आई अशी का बोलली? आई ती आईचं असतें!आई देवाकडून मिळालेली जन्माची हृदयातली भेट असतें!टचकनं डोळयांतून पाणी आलं!मी स्वतःला सावरत बोललो,'आई नसेल जायचं तर नको जावू!' पुन्हा भाच्याकडे पाहत बोललो,'भाऊसाहेब जा तू!आजींना यां वयात प्रवासाची दगदग सहन होत नाही!''🌹

भाऊसाहेब हट्टाला पेटला होता,'आजी आमच्याकडे येऊन खूप दिवस झालेत तूला!चल ना आजी!तूला कुठला ही त्रास होणार नाही इतकं फुलासारख जपू!फक्त सात आठ दिवसचं यें'.. आई शेवटी जायला तयार झाली!आईची पिशवी तरी किती मोठी असावी बरं?फक्त दोन साड्या!झालं!!!आई कधीच कोणासाठी ओझं झाली नाही!ती कोणासाठी ओझं होणारच कशी!जन्मोजन्मीचें आभाळभर उपकार आईचे असतात!आईची पिशवी कशी कशी हलकी फुलकी होती!ममतेचे बोल सतत साथ संगत करणारे!... आई नेहमी म्हणत असतें,'आपण सोबत काय घेऊन आलो आहोतं ? मागे ओझं का ठेऊन जावे!सर्व येथेच यां मातीत ठेवून एकट्याने निघून जायचं आहे!हलकं हलकं होऊन निघून जायचं आहे!कोणाला त्रास नं देता निघून जायचं आहे!'.. आईच्या मुखातून अशा निरवानिरवीचें शब्द कानी पडल्यावर मन भरून येत होतं!
अलीकडे आई खुपचं हळवी झाली आहे!१०० वर्षे पार केलीतं तरी उत्तम आरोग्य लाभलेल्या आईसोबत रहाणे आम्हास भाग्य लाभले आहे!🌹

आईचें हात धरून हळूहळू घराच्या पायऱ्या उतरलो!आईने माझा हात घट्ट धरला होता!माझा मानसिक आधार असणारी आई!माझा हात धरून खाली उतरत होती!भाच्याच्या रिक्षात बसवलं!आईच्या मायेचे हात माझ्या डोक्यावरून फिरत होते!रिक्षातच आईच्या पायांवर डोकं ठेवलं!अन आशीर्वाद घेतं असतांना मनोमन देवाला प्रार्थना केली,'माझ्या आईचं आयुष्य स्वतःच्या पायांवर चालते आहे,स्वतःची सर्व कामं स्वतःच्या हातांनी करते आहे तोवर तिला दीर्घायुष्य दे देवा!अजून दहा वर्षांचं तरी आयुष्य वाढवून दे हिचं प्रार्थना करतो !' भाच्याने रिक्षाचा एक्सलेटर पिळला तशी कात्रजच्या दिशेने निघूनं गेली!आई वळून वळून हात देत होती!मी हात हलवत होतो!रिक्षा दिशेनांशी होईपर्यंत मी रिक्षाकडे पाहत होतो!माझे हलणारे हात खाली आलेत!मन भरूनं आलं होतं!आई बहिणीकडे गेली!मी डबडबलेल्या डोळ्यांनी घरी आलो!घरात आईच बसायचं ठिकाण रिकामं होतं!तिकडेच टक लावून पाहत होतो!सौभाग्यवतीनें आवाज दिल्यावर मी भानावर आलो होतो!
माझी आई अशीच आहे!सर्वांचं हृदय घेऊन गेली होती!🌷

आई मानसिक आधार असतें!तिचं हळवेपण आपल्यात आलेलं असतं!आई हृदयाचा ठोका असतें!आई शिवलेला टाका असतें!आई गजबजलेलं गावं असतें!पूर्ण काठोकाठ भरलेलं मन रिते करण्याचं हक्काचं ठिकाण असतें!घरात आल्याबरोबर हसरंमुख असणारीं, जीव भांड्यातं पडल्या इतकं हळवं मन असणारी व्यक्ती आईचं असतें!आई आपल्या जगण्याचा धागा असतें!अन्य फाटकें,तुटकें हृदय आपल्या मायेच्यां धाग्यानीं शिवत असतें!दूर गेलेली कित्येक हृदय आपल्या विशाल ठिगळांनी शिवत नाते जोडत असतें!आई विठाई सारखी असतें!भक्तांसारखे सर्व नाते आपल्या भक्कम खांद्यावर घेऊन श्रद्धा मंदिर होऊन जात असतें!माझी आई अशीच आहे!🌹

वडील खोबरे अन खोबऱ्याची टणक कवटी असतात!आई खोबऱ्यातील गोड पाणी असते!आई आपल्या आजारी मुलांसाठी रात्र रात्र जागत असतें!आई रत्नपारखी असतें, परक्यालाही पारखून आपलेसे करीत असतें!आई सेवाव्रत्ती असतें!आई प्रेम स्नेहाचां मेघ असतें,धो..धो बरसून मोकळे होणारी असतें!निरभ्र होणारी असतें!आईला अष्टपैलूपद देवानेचं दिलेलं आहे!सर्व भूमिका हसत पार पाडणारी,सहन करणारी स्वतःचं दुखी-कष्टी मन कोणाला कधीही न सांगणारी आई महान असतें!आई कधी चहाच्या कपातील वाफ होते!जिभेला चव देत स्वतः हवेत एकजीव होऊन जाते!प्रेमाचे नाते पेहरणारी आई घराघरात असतें!मी आईच्या बसण्याच्या जागेकडे जागेकडे एक टक पाहत होतो!आई कात्रजला गेली,घराचा चंदन सुगंध घेऊन गेली होती!माझी आई अशीच आहे!🌹

बालपणापासून सत्य,शिव अन सुंदरतेची ओळख करून देणारी आई स्वतः ईश्वरी रूप असूनही ती विसरून गेलेली असतें!आईच्या दृष्टीत अन हृदयात सत्य निवासाला असतं!सत्य अस्सल पिवळे सोनं असतं!आई मुलांना याचं सत्याची ओळख करून देत असतें!मुलांवर संस्कार करीत असतें!वडील घराबाहेरील संस्कार देत असतात तर आई आयुष्यभर हृदयातलं अमृतरस वाटीत राहते!जन्मताच बाळाची नाळ कापल्यावर बाळाच्या मुखातून 'आई' नावाचा पहिला उच्चार बाहेर पडतो!म्हणूनचं आई देवस्वरूप दूत असतें!अखंड आयुष्यभर हृदयातून जिभेवर शब्द येत असतात 'आई'!.. माझी आई अशीच आहे!🌹

अंतःकरणापासून आईवर अपार निष्ठा,असणाऱ्या अनेक सुपुत्रांनी जीवनात अलौकिक गौरव प्राप्त केला आहे!स्वतःचं जीवन घडवीत असतांना इतरांचे जीवनही घडवीत जगदंविख्यात झालेत!आई अशीच असतें!पाण्याच्या निर्मळ,स्वच्छ प्रवाह प्रमाणे,वहात वहात सर्वांना संस्कारक्षम करून सोडते!स्वतः चिखल होऊन जगत असतें!आई श्रद्धेचं,पावित्र्याचं,सहानुभूती,
सहनशक्तीचं विद्यापीठ बनून जाते!परोपकाराची बीजे पेहरणारी आई आपलं आयुष्य प्रदान करीत असतें!माझी आई अशीच आहे!🌹

दळलेल्या गरम पीठात हात टाकून पाण्यात भिजवून मळून उत्तम भाकरी थापून तव्यावर भाजणारी आई आयुष्यभर चटका घेतं जगत असतें!आनंद, सुख, ममता, कोमलता, वाटीत असतें!स्वतः जळत उजेड देत असतें!आईची गोड अवीट वाणी कानांना मंत्रमुग्ध करीत असतें!आई आयुष्याचं पुण्य असतें,मुलांना सहज मिळतं म्हणून आईचं महत्व मुलं उशिराने जाणतात!माझी आई कात्रजला गेली!तिच्या जाण्याने घरातलं सुगंध निघून गेला होता!सर्वांच्या घरात आई अशीच असतें!माझी आई अशीच आहे!🌹

अंतःकरणापासून आईवर अपार निष्ठा,असणाऱ्या अनेक सुपुत्रांनी जीवनात अलौकिक गौरव प्राप्त केला आहे!स्वतःचं जीवन घडवीत असतांना इतरांचे जीवनही घडवीत जगदंविख्यात झाले आहेत!आई अशीच असतें!पाण्याच्या निर्मळ, स्वच्छ प्रवाह प्रमाणे,वहात वहात सर्वांना संस्कारक्षम करून सोडते!आई श्रद्धेचं,पावित्र्याचं,सहानुभूती, हळवेपणाचं,सहनशक्तीचं,मातृपणाची संस्कार विद्यापीठ बनून जाते!परोपकाराची बीजे पेहरणारी आई पवित्र श्रद्धेचा गाभारा असतें!.. माझ्या मंदिराचा शांत, शितल,
कनवाळू गाभारा कात्रजला गेला होता!गाभाऱ्यातील मूर्ती मंदिर सोडून कात्रजला गेली होती!घरोघरी आई रुपी सुंदर मूर्ती असतात!माझी आई अशीच आहे!पवित्र गाभाऱ्यातील सुंदर मूर्ती आहे!🌹

महाली चपाती लाटते
झोपडीत भाकर रांधतें
आई वासरूस चाटते
मायेने घरं ती थाटते..🌷

कधी आभाळ फाटते
 ....कधी जंगल पेटते 
........तेथे आई भेटते
   मज आभाळ वाटते!🌷

अशी माझी आई आहे!ती कात्रजला गेली आहे!!!
*************************
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
*************************
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-१३एप्रिल २०२३

सांग कोठे शे माडी तू सांग माले,दुख देनार नही मी तुना जीवले...

सांग कोठे शे माडी तू सांग माले,
दुख देनार नही मी तुना जीवले...


जवय बठेल व्हती चांगली घडी,
काय देवबानी अशी बनाडी,
काबर लई आम्हनी जलम देती माडी,
माय कायजीच तुले, दख येता व्हस व्हई ते पटकनी..
तुना बिगर सुनं सुनं लागस शे जरी आबादानी..

सांगा काय करू मी उपाय,
ज्याथुन परत भेटी मनी माय 


आई खरंच परत ये..
तुनाबिगर पोरका तुना लेकरे

आख्खं शे आम्हनाकडे फक्त तू नही आई..
जपतस तुना लेकरे तुनी देयेल मायममतानी पुण्याई

शब्दधनी मा. नानाभाऊ दादासाहेब ...
काय भारी मायममतानी श्रीमंती दि धाडी,
हरेकले आख्खास्थून प्रिय आई, माँ, माय मदर माडी... 🙏🏻🙏🏻🙏🏻

काम्रेड शरद पाटील यास्ले लाल सलाम लाल सलाम अहिराणी व्यक्ती लेख विशेष

खान्देश रत्न
  कामरेड शरद पाटील
    खान्देश म्हंजे खानम्सा वसेल देस. सातपुडा, सह्याद्रीन्या डोंगर रांगा, अजिंठाना डोंगर यास्ना मजारला खड्डाम्हा म्हंजे खानंम्हा खान्देश से. खानं म्हंजे खड्डा.हायी यक खान्देश नावनी व्युत्पत्ती से. तापी,गिरणा,पांझरा, बोरी आनि तिसन्या उपनद्यास्न मुबलक पानी राहे.रग्गड कमाया व्हयेत त्यामुये खान्देशम्हा सुबत्ता व्हती.
 खान्देशना इतिहास भी गवरवशाली से. हायी खान्देशनी खानंम्हा बराज नररत्ने जनमाले उनात.आज भी जगभरम्हा ज्यास्ना नावलौकिक व्हयेल से अस्या आसाम्या सेत. त्याम्हानज यक मोठ नावं म्हंजे " कामरेड शरद पाटील " त्यास्नी वयख करी ल्हीऊत.
   कामरेड शरद पाटील ह्या यक परख्यात प्राच्यविद्दापंडित, सत्यशोधक मार्क्सवादी इचारवंत. त्यास्ना जनम १७ सप्टेंबर १९२५ ले धुये तालुकाम्हाना कापडनाले सत्यशोधक कुटुबम्हा व्हयना. त्यास्ना वडिल तानाजी तुकाराम पाटील पह्यली पिढीम्हाना सत्यशोधक व्हतात.शरद पाटील यास्न प्राथमिक नी माध्यमिक शिक्सन धुयालेज व्हयन. सायम्हा अभ्यासू नी शिस्तवाला शिक्सक भेटामुये धाकलपनेज त्यास्ले सामाजिक बांधीलकी नी ध्येयवादनी प्रेरणा भेटनी. चित्रकलानी आवड बराबरज त्यास्ले अवांतर वाचननी गोडी लागनी. चित्रकलानी आवड आसामुये त्यास्नी यक साल बडोदाना कलाभवनम्हा पेंटिंग कोर्स कया. मंग सर जे.जे. स्कूल आँफ आर्टम्हा दाखल व्हयनात. तठे तिसरा वरिसले असताना राज्यभरना इद्दार्थी संपमुये त्यास्ले सिक्सन अपूर सोडन पड.
   धुयाले परत येवावर गव्हाणकर, अमर शेख,आण्णाभाऊ साठे ह्या शाहिरेस्ना सोबत - हावामुये १९४६ म्हा त्या कम्युनिस्ट पक्सना सभासद व्हयनात. त्यास्ले पह्यलेंग पक्सना मंबई हापेसम्हा स्टाफ आर्टिस्टन काम दिन्ह. सालभर नंतर धुयाले येवावर त्या गिरणी कामगार चयवयनं काम कराले लागनात. सरकारनी १९४८ म्हा सरकारनी जहाल कम्युनिष्टजवर कारवाईना बडगा उगारा तव्हय त्यास्ले खान्देशम्हाईन हद्दपार करेल व्हत. हद्दपारी संपानंतर त्या शेतकरी आघाडीम्हा काम कराले लागनात. त्यास्नी गोवामुक्ती आंदोलन तसज संयुक्त महाराष्ट्रनी चयवयम्हा भाग ल्हीना व्हता. 
  सन १९५६ ते ६० ह्या कायम्हा त्यास्नी उकाई धरनना इरोधम्हा चयवय उभारी. मातर त्यास्ले पक्सना पाठिंबा भेटना नही.आचार्य अत्रेस्नी त्यास्ले पाठींबा दिन्था. भारत चिन युद्धना येयखे कम्युनिस्ट भारत इरोधी सेत आसा आरोप व्हयना आनि कम्यनिष्टेस्नी धरपकड व्हयनी. तव्हय त्या औंरगाबाद नी नासिकनी जेलम्हा व्हतात.जेलम्हा त्यास्नी कार्ल मार्क्सना भांडवल / दास कँपिटल हाऊ ग्रंथ समजी ल्हीधा. भारतना समाज नी इतिहास हाऊ मार्क्सना तोकडा लिखान वरथाईन समजी ल्हेता येनार नही यान्ही खात्री पटावर त्यास्नी ह्या इषयवर सोता लिखान करान ठराव. संसोधन करासाठे बडोदाले गयात.तठे त्यास्नी १९६६ म्हा पंडित विद्दाभास्कर उपाध्याय यास्ना मार्गदर्शनखाल संस्कृत ना अभ्यास कया.
बडोदाथाईन परतावर त्यास्नी आदिवासी भागम्हा काम सुरु कय. पक्सनी जातिव्यवस्थाना इरोधम्हा लढा उभाराले नकार देवामुये पक्सम्हा वाद वाढनात. त्यामुये पक्षना राजिनामा देईसन आपला सहकारीज सोबत मार्क्सवाद, फुले, आंबेडकर वाद (माफुआं ) हायी इचारसरनीवर आधारित "सत्यशोधक कम्युनिस्ट पक्सनी" १९७८ म्हा स्थापना कयी. माफुआंना द्रुष्टीकोन येगयेगळा इषयेजवर मांडता येवाकरता त्यास्नी १९९२ म्हा सत्यशोधक मार्क्सवादी नावनं मासिक सुरु कय. त्यास्नी १९८२ ते १९९२ ह्या कायम्हा येगयेगया आंदोलने उभारी आदिवासीस्ना वन अतिक्रमणना लढा चालू ठेवा यासाठे त्यास्ले एसआरपीनी दडपशाहीले तोंड देन पडनं. 
  महाराष्ट्रनी साहित्य संस्कृतीनी चयवयम्हा कामरेड शरद पाटील यास्न योगदान महत्वान से. त्यास्नी इतिहास, संस्कृती, समाजकारण नी अर्थशास्त्र ह्या क्षेत्रम्हा लेखन कय. शेकडो लेख लिखात. न्यारा न्यारा इचारमंचेसवर जायी वादयी भासने दिधात. समाजम्हा वादये उठनात.
त्यासन प्रसिद्ध व्हयेल साहित्य दखा.
१ ) दासशूद्रांची गुलामगिरी खंड १ भाग १ व २
      जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व खंड २ ( १९९६ )
   जांत्यत भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती ( खंड ३ रा - २००३ )
प्रिमिटिव्ह कम्युनिझम मात्रुसत्ताक स्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद ( खंड ४ था-२०१२ )
 २) बुद्ध, भिख्खू आंनद, विशाखा १९८३
३) भारतीय तत्वज्ञान व नास्तिक मत १९८४
४) रामायण- महाभारतातील वर्णसंघर्ष १९८६
५) अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र १९८८
६) पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका१९८९
७) शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण- महंमदी की ब्राह्मणी १९९३
८) मार्क्सवाद -फुले - आंबेडकर वाद १९९३
९) स्री- शूद्रांचा राजा नाटक १९९८
१०) नामांतर औंरगाबाद व पुण्याचे २०११ 
       शरद पाटील यास्ना लेखनम्हा यकज ये ले भारतीय तत्वज्ञान, प्राच्यविद्दा, यान्हा समावेश आसामुये त्यास्न लिखान दूर्बोध न समजनार से आसा आरोप व्हस.त्यास्ना ह्या प्रचंड काममुये त्यास्ले महाराष्ट्र इतिहास परिषदना बा. सी. बेंद्रे महान इतिहासकार पुरस्कार तसज रा. ना. चव्हाण प्रतिष्टानना महर्षी विठ्ठल राक्षजी शिंदे पुरस्कार भेटेल सेत.
   कामरेड शरद पाटील हयातभर समाजम्हानी इषमता, शोषणना इरोधम्हा लढनात. आखेरले वयना ८९ वरिसले १२ एप्रिल २०१४ शनिवार रातले साडेदहा वाजता निधन पावनात. काही दिवसपासीन त्या ब्रेनहँमरेज मुये आजारी व्हतात. त्यास्ना मांघे बायको नजुबाई गावित, दोन पोरे यक पोरगी आसा परिवार से. त्यासना शेवटला दर्सनले चाहतास्नी रिघ लागेल व्हती. सजाडेल टँक्टरवर त्यास्ना देह ठेयेल व्हता. अंत्ययात्राम्हा सत्यशोधक इद्दार्थी संघटनानी क्रांतिकारक गिते म्हणात.
" काम्रेड शरद पाटीलको लाल सलाम लाल सलाम "
अस्या घोषनाजमुये परिसर दुमदुमना व्हता. त्यास्नावर अब्राह्मणी पद्धतखाल अंत्यसंस्कार झायात. त्यास्ले बायको नजुबाई गावित तसज प्रा. नचिकेत नी सरमद ह्या दोनी पोरेस्नी अग्निडाग दिन्हा. जमेल लोकेस्नी आसूस्नी श्रद्धांजली दिधी.
   काम्रेड शरद पाटील यास्ले लाल सलाम लाल सलाम.

त्रिकाल सत्य आणि कधी कालबाह्य न ठरणारा बाबासाहेबांचा विचार

🎓📚🎓📚🎓📚🎓📚
त्रिकाल सत्य आणि कधी कालबाह्य
  न ठरणारा बाबासाहेबांचा विचार!
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
             खरं तर हां लेख मी 14 एप्रिलसाठी लिहिला होता. पण 14 एप्रिलला सोशल मीडिया वर बाबासाहेब यांना अभिवादनं करणारे खूप संदेश असल्यामुळे हां लेख आता रात्री पाठवत आहे. 

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा

        तुमची बाजू सत्याची असेल आणि तुमच्या हातात कोणतीहीं साधन नसतील तर तुम्हाला तुमच्यावरील अन्याय निवांरण करण्यासाठी दिलेला महामंत्र आहे हां *शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा!*
        तुम्ही दुबळे आहात अन्याय करणारा प्रबळ आहे, तुमची बाजू खरी आहे, तर तुम्हाला न्यायासाठी त्याच्याशी संघर्ष करावाच लागेल. पण आलं मनात आणि उठले सुटले केला संघर्ष असं चालणार नाही. तस केलं तर ज्याच्याशी संघर्ष करायचा तों प्रबळ असेल त्यामुळे तों तुम्हाला संपवून टाकेल. म्हणून मग तुम्हाला समविचारी लोकांचे संघटन उभ करावं लागेल. पण अशिक्षित अनाडी लोकांचं संघटन करून चालणार नाही. अशी माणसं एकत्र केली तर ते संघटन होणार नाही, ती टोळी होईल. हीं अशिक्षितांची टोळी, स्वतःवरी अन्याय दूर करण्या पेक्षा इतरांवर अन्याय करत सुटतील. संख्या बळाच्या आडदांड पणाच्या जोरावर ते लुटालूट करतील. म्हणून हीं सर्व मंडळी सुशिक्षित असावी. त्यासाठी सर्वात आधी आपण शिक्षण घेतलं पाहिजे. इतरांना सुशिक्षित केलं पाहिजे. मग या सुशिक्षित लोकांचे संघटन करावं, अशा सुशिक्षिततांच्या संघटनेच्या माध्यमातून संघर्ष केला पाहिजे. तुम्ही नक्की जिंकाल. विजयी व्हाल. म्हणून *शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा* हा रामबाण उपाय आहे.

*महात्मा गांधी म्हणतात खेड्याकडे चला, डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शहरांकडे चला!*

 कोण चूक, कोण बरोबर?
माझ्या मते दोघे बरोबर.
         म गांधीच्या काळातील देश हां कृषी प्रधान भारत होता. भारताची सर्व अर्थ व्यवस्था शेतीवर अवलंबून होती. शेती हीं खेड्यातील लोक करत होते. कृषी प्रधान भारताची अर्थ व्यवस्था 80% शेतीवर अवलंबून असल्यामुळे खेड्याकडे चला हां गांधीजींचा सल्ला योग्य होता. पण त्या खेड्यात दलितांची स्थानं काय होत, याच भान कदाचित गांधीना नसावं किंवा त्याबाबत गांधीजीनी तसा विचार केला नसावा.
         पण बाबासाहेबांच तस नव्हत त्यांना प्रत्येक भारतीया सोबत दलित पीडिताची जास्त काळजी होती. ज्यांनी हजारो वर्ष केवळ अन्याय सहन केला होता त्या लोकांचा बाबासाहेब प्राध्यान्यानें विचार करत होते.
          त्यां दलितांचं खेड्यातील जगण अत्यंत वाईट होतं. गावातील सवर्ण समाज म्हणजे जे अस्पृश्य नाहीत. त्यांच्या पुढे दलितांच्या पिढ्यानं पिढ्या दबून होत्या अशा गावात वर मान करून बोलणं सोडा बघणंहीं शक्य नव्हते. तों बरोबरीच्या नात्यांने गावकऱ्याला राम राम किंवा नमस्कार सुद्धा घालू शकत नव्हता. जोहार मायबाप म्हणत होता. पाणी वरून टाकल जायचं. कोणाला स्पर्श झाला तर विटाळ व्हायचा. आणि मुख्य म्हणजे त्याच्याकडे स्वतःच असं उत्पन्नाच कोणतही साधन नव्हतं. मोल मजुरी करायची तर त्याला योग्य मोबदला नाही. अशा लोकांनी खेड्यात गुलामा सारखं का रहायचं? उलट शहरगावांत कोणताही पाटील जमीदार, वतनदार दबाव टाकू शकेल अशी परिस्थिती नसते. झोपडपट्टीत एखाद्या छोट्याशा झोपड्यात संसार थाटावा लागेलं पण गावात तरी कुठे एवढ्या माड्या हवेल्या होत्या या लोकांच्या? तिथही झोपडीच या झोपडीतून त्या झोपडी हाच फरक. शिवाय रोजगाराला कमतरता नाही. गुलामीच ओझं नाही. शहरात मुक्त आयुष्य जगता येत म्हणून बाबासाहेब म्हणत होते शहरा कडे चला तेही बरोबर होते.
        त्याकाळातील परिस्थितीचं अशी होती की, महात्मा गांधीजीं जे म्हणत होते ते खेड्याकडे चला हेही बरोबर आहे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते शहरांकडे चला. दोघेही आपापल्या जागी बरोबर होते.
       पण आता परिस्थिती बदलली आहे. सर्वांचा शहरांकडे जाण्याचा ओढा वाढला आहे. कारण शहरात सर्व प्रकारच्या सुविधा एका जागी उपलब्ध आहेत. शाळा, महाविद्यालये, दवाखानें, स्वछ रस्ते, रोजगार, मनोरंजनाची साधान, वीज, पाणी, गॅस बाजार सर्व सुविधा जागेवर मिळतात. त्यामुळे सर्वत्र शहरी करण वाढत आहे आणि खेडी ओस पडत आहेत. काही लोक शेतीच्या निमित्ताने खेड्यात रहात असले तरी त्यांची शहरातहीं घर आहेत. त्यात सर्व परिवार राहातो आणि कधी तरी हवा पालट करायला वीक एन्ड घालवायला खेड्यातील घरी येतो. इथे बाबासाहेब यांची दूरदृष्टी जिंकली अस वाटत. पुढच्या भागात बघू या गांधी-नेहरू विरुद्ध कोण जिंकलं कोण हरलं!
🎓📚🙏🏻📚🎓 बापू हटकर 
🎓📚🎓📚🎓📚🎓📚

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...