सोमवार, १७ एप्रिल, २०२३

गांधी नेहरू विरुद्ध आंबेडकर कोण जिंकलं कोण हारलं?

👴🏻🤴🏻👨🏻‍🎓👴🏻🤴🏻👨🏻‍🎓👴🏻🤴🏻
   गांधी नेहरू विरुद्ध आंबेडकर
     कोण जिंकलं कोण हारलं?
  ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
        गांधी आणि आंबेडकर यांच्यात पहिला खटका सप्टेंबर ते डिसेम्बर 1931 ला लंडन येथे पार पडलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत उडाला. या परिषदेत सुरवातीलाचं गांधीजींनी भाषणात सांगितले की, अखिल भारतीय काँग्रेस हीं सर्व भारतीय लोकांचे प्रतिनिधित्व करते. त्या नंतर गांधीजींच्या या वाक्यावर तीन घटकनी आक्षेप घेतला. त्यात जिनानी सांगितले की, मुस्लिम लीग अल्पसंख्यांक मुस्लिमांसाठी काम करीत आहे. आम्ही त्यांचे प्रतिनिधी आहोत. संस्थानीकांच्या संघटनेने दावा केला की, आमच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाच प्रतिनिधित्व आम्ही करतो. त्या प्रदेशाचा काँग्रेसशी काही संबंध नाही. तर डॉ भीमरावं आंबेडकर यांनी सांगितले की, काँग्रेस फक्त उच्चं जातीच्या लोकांसाठी काम करते. दलितांचं प्रतिनिधित्व मी करतो. म्हणून दलित वर्गाचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलो आहे. त्यामुळे कुठलाही ठोस निर्णय न घेता हीं परिषद पार पडली.
        दुसरा प्रसंग होता लोकप्रतिनिधी गृहात दलितांच्या योग्य प्रतिनिधित्वा संबंधिचा संघर्ष गांधी आंबेडकर यांच्यात उभा राहिला. दलितांसाठी आंबेडकंरांना पृथक मतदारसंघ हवे होते तर गांधीना संयुक्त मतदार संघ हवे होते. पृथक मतदार संघात कोणावरही अन्याय नं होता दलित वर्गासाठी त्यांचं हित जपणारे आमदार खासदार निवडून आणता येत होते. तर संयुक्त राखीव मतदार संघात. Sc वर्ग जेमतेंम 20% पेक्षाही कमी आणि ईतर 80% पेक्षा जास्त मतदार येतात. म्हणजे उमेदवार फक्त दलित पण मतदार ईतर सर्व तें दलित हिताचा उमेदवार निवडून देऊचं शकत नाहीत. शिवाय sc किंवा st राखीव मतदार संघात इतरांना निवडणूक लढाविता येत नाही. म्हणजे हां त्यांच्यावर अन्याय आहे. असा अन्याय बाबासाहेबानी ठरविलेल्या मतदान पद्धतीत नव्हता. पण गांधीजीनी हट्ट केला बाबासाहेबहीं माघार घ्यायला तयार नव्हते. शेवटी गांधीजीनी आमरण उपोषण सुरु केले. त्यातून काही अनर्थ घडू नये म्हणून मग बाबासाहेबाना माघार घ्यावी लागली. इथे वरवर बाबासाहेब हरले आणि गांधी जिंकले अस वाटत असलं तरी, न्याय हरला आणि अन्याय जिंकला हे खरं आहे. तों पुणे करार  24 सप्टेंबर 1932 ला झाला. त्या करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू आले होते असं म्हणतात. मला आजही वाटते की, sc st वर्ग आणि ईतर प्रवर्ग तिघांवरहीं अन्याय करणारा पुणे करार आहे. राजकारणातील आरक्षण अजून लांबणार असेल तर पुणे करार रद्द करून बाबासाहेब आंबेडकर यांनी राखीव मतदार संघाचा जो मूळ मसुदा तयार केला होता तों लागू करावा. तों पुणे करार काय आहे तें बघू पुढच्या भागात. 
क्रमश:
👴🏻👨🏻‍🎓🙏🏻🎓🤴🏻 बापू हटकर
👴🏻🤴🏻👨🏻‍🎓👴🏻🤴🏻👨🏻‍🎓👴🏻🤴🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...